शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
2
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
3
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
4
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
5
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
6
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
7
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
8
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
9
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
10
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
11
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
12
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
13
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
14
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
15
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
16
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
17
सातपाटी किनाऱ्यावर १७ वर्षीय मुलाचा समुद्रात बुडून मृत्यू, पाच मित्र बचावले!
18
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
19
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
20
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाला देणार आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 01:09 IST

State Election Commission order Challenge सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला माध्यम बनवून राज्य निवडणूक आयोग स्वत:चे मत लादत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाला न्यायालयात आव्हान देण्यात येणार आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे.

ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात दाखल करणार पुनर्विचार याचिका

 लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला माध्यम बनवून राज्य निवडणूक आयोग स्वत:चे मत लादत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाला न्यायालयात आव्हान देण्यात येणार आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे.

शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे जि.प. सदस्य सलील देशमुख, दिनेश बंग, माजी गटनेते चंद्रशेखर कोल्हे यांनी रविभवन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. याप्रसंगी चंद्रशेखर कोल्हे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने ओबीसीचे आरक्षण पूर्णपणे कमी करण्यास सांगितले नाही. आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांवर गेली असल्याने मर्यादेवरील जागा सर्वसाधारण वर्गातून भरण्यास सांगितले आहे. परंतु आयोगाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातील काही मुद्यांवर राज्य निवडणूक आयोगाने आपले मत लादून सर्व जागा सर्वसाधारण वर्गातून भरण्यास सांगितले. हा ओबीसींवर अन्याय आहे. आयोगाच्या आदेशाला न्यायालयात आव्हान देण्यात येईल. त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाबाबत पुनर्विचार याचिका दाखल करण्यात येणार आहे. याची तयारी सुरू असून लवकरच न्यायालयात जाणार आहे. पत्रपरिषदेला प्रकाश नागपुरे, बबन आव्हाडे, अनिल ठाकरे, निशिकांत नागमोते, नीलिमा ठाकरे, सुचिता ठाकरे, रश्मी आरघोडे, अ‍ॅड. रितेश धावडा, देवका बोडखे, बापू चरडे, सतीश रेवतकर आदी उपस्थित होते.

 या परिस्थितीस भाजपच जबाबदार

भाजप सरकारच्या काळापासूनच हे प्रकरण न्यायालयात सुरू आहे. जि.प.मध्ये भाजपाची सत्ता असताना अडीच वर्ष मुदतवाढ देण्यात आली. भाजपकडून न्यायालयात योग्यरीत्या बाजू मांडण्यात आली नाही. ओबीसींची माहितीही गोळा करण्यात आली नाही. आरक्षणाच्या विरोधात न्यायालयात जाणारेही भाजपचे व्यक्ती होते. या परिस्थितीसाठी संपूर्णपणे भाजप जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला.

 तरीही सदस्यत्व रद्द केले

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार सुरुवातीला जिल्ह्यातील १६ जि.प. सदस्य व ६ पंचायत समितीच्या १५ सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले. नंतर राज्य निवडणूक आयोगाने त्या सर्व जागा खुल्या वर्गात करून उरलेल्या ७ पंचायत समितीतील ओबीसी सदस्यांचेही सदस्यत्व रद्द केले. विशेष म्हणजे तिथे संपूर्ण आरक्षण ५० टक्क्यांच्या आत आरक्षण होते. त्यामुळे सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयNCPराष्ट्रवादी काँग्रेस