शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

८६ हजार हेक्टरवर क्षेत्र झुडपी जंगलाच्या व्याख्येतून वगळण्याला आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 21:47 IST

नागपूर, वर्धा, गडचिरोली, गोंदिया, भंडारा व चंद्रपूर या सहा जिल्ह्यांमधील ८६ हजार ४०९ हेक्टर परिसराला झुडुपी जंगलाच्या व्याख्येतून वगळण्याच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. यासंदर्भात कन्झर्वेशन अ‍ॅक्शन ट्रस्टने जनहित याचिका दाखल केली आहे.

ठळक मुद्देहायकोर्टात याचिका : सहा जिल्ह्यांतील झुडपी जंगलाचा परिसर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर, वर्धा, गडचिरोली, गोंदिया, भंडारा व चंद्रपूर या सहा जिल्ह्यांमधील ८६ हजार ४०९ हेक्टर परिसराला झुडुपी जंगलाच्या व्याख्येतून वगळण्याच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. यासंदर्भात कन्झर्वेशन अ‍ॅक्शन ट्रस्टने जनहित याचिका दाखल केली आहे.झुडपी जंगलाला वन कायद्याद्वारे संरक्षण देण्यात आले आहे. असे असताना झुडपी जंगलाच्या जमिनीचा विकासकामांसाठी वापर करता यावा याकरिता केंद्र सरकारचे अतिरिक्त वन महानिरीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली होती. त्यात नागपूर विभागीय आयुक्तांचा समावेश होता. राज्य सरकारने त्या समितीचा अहवाल स्वीकारला आहे. वन व्यवस्थापनास अयोग्य असल्याच्या कारणावरून ८६ हजार ४०० हेक्टर परिसराला झुडुपी जंगलाच्या व्याख्येतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात नागपूर जिल्ह्यातील १७ हजार ३९९ हेक्टर, वर्धा जिल्ह्यातील ११ हजार हेक्टर, गडचिरोली जिल्ह्यातील ७ हजार ४०२ हेक्टर, गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील ३५ हजार ८३१ हेक्टर तर, चंद्रपूर जिल्ह्यातील १४ हजार ६०६ हेक्टर झुडपी जंगलाचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीशिवाय असा निर्णय घेता येत नाही असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.सरकारला नोटीसउच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांनी बुधवारी प्रकरणावर सुनावणी केल्यानंतर वन विभागाचे प्रधान सचिव व अन्य प्रतिवादींना नोटीस बजावून यावर उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला. याचिकाकर्त्यांतर्फे वरिष्ठ अधिवक्ता सी. एस. कप्तान व अ‍ॅड. पृथ्वीराज चव्हाण यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयforestजंगल