शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

मध्य रेल्वेच्या पंधरवड्यातून स्वच्छतेचा जागर, प्रवाशांशी व्यक्तिगत संवाद

By नरेश डोंगरे | Updated: September 22, 2023 16:03 IST

पथनाट्यातून समुपदेशन

नागपूर : मध्य रेल्वेच्या स्वच्छता पंधरवड्यातून रेल्वे प्रवाशांसोबत संवाद तसेच पथनाट्य आदीतून स्वच्छतेचा जागर केला जात आहे.

प्रवासाला जाता - येताना प्रवाशांना सर्वत्र साफसफाई दिसावी आणि प्रवासात प्रसन्नतेची अनुभूती मिळावी यासाठी मध्य रेल्वे तर्फे दरवर्षी 'स्वच्छता पंधरवडा' साजरा केला जातो. यंदा १६ सप्टेंबरपासून हा पंधरवडा सुरू झाला असून तो २ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. या निमित्ताने मध्य रेल्वेच्या सर्व विभागांनी रेल्वे स्थानकांच्या सर्व मुख्य भागांच्या स्वच्छतेच्या कामांवर लक्ष केंद्रित केले आहे.

नागपूर विभागातील सर्व स्थानकांवर स्वच्छता अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत असून स्वच्छता कर्मचाऱ्यांना सुरक्षा उपकरणे वापरण्याची आणि स्वच्छता करताना वैयक्तिक स्वच्छता राखण्याच्या आवश्यकतेबद्दल सल्ला देण्यात आला आहे. प्लॅस्टिक बॉटल क्रशिंग मशिनचा योग्य वापर लोकांना दाखवून देण्यात येत आहे. यंत्रसामग्री आणि उच्च दाबाच्या पाण्याच्या जेटचा योग्य वापर करून ट्रॅक स्वच्छ करण्यात आले आहे.

स्टेशन परिसरात पंखे, केबल्स आणि इतर उपकरणांची स्वच्छता राखण्यात यावी, रेल्वे स्थानकांची स्वच्छता आणि देखभाल आणि डबे, रिटायरिंग रूम, वेटिंग रूम, वसतिगृहे नीटनेटके आणि स्वच्छ ठेवण्याचे महत्त्व आणि पद्धती याविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी चर्चासत्र आणि समुपदेशन सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.प्रवाशांसोबत व्यक्तीगत संवाद साधून आणि पथनाट्याच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवून प्रवाशांना स्वच्छतेचे महत्व समजावून सांगितले जात आहे.

टॅग्स :railwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वे