शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

केंद्र व राज्याने इंधनावरील कर कमी करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जागतिक बाजारपेठेवर इंधनाचे दर अवलंबून असल्याने नियंत्रणात ठेवण्यात अडचण येत आहे. आपण दोन तृतीयांशपेक्षा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : जागतिक बाजारपेठेवर इंधनाचे दर अवलंबून असल्याने नियंत्रणात ठेवण्यात अडचण येत आहे. आपण दोन तृतीयांशपेक्षा जास्त तेल आयात करतो. त्यावर केंद्र व राज्य सरकार आपापले कर लावते. परिणामी इंधनाच्या किंमती भरमसाट वाढतात. देशातील जनतेला पेट्रोल दरवाढीच्या संकटातून सोडवण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने समन्वय साधून कर कमी केला पाहिजे, असे मत माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केले. शुक्रवारी नागपूर पत्रकार क्लबमध्ये आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.

इंधनवाढीवर सरकारचे बारीक लक्ष आहे. दरवाढीच्या या संकटातून दिलासा देण्यासाठी सरकार प्रयत्नरत असून त्या अनुषंगाने विचार करीत आहे, असे प्रभू यांनी सांगितले. खासगीकरणाला चालना देण्याचे केंद्र सरकारचे धोरण योग्य आहे. खाजगी क्षेत्राचा देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठा वाटा आहे. अलीकडच्या काळात सार्वजनिक उपक्रमाच्या तुलतेन खासगी क्षेत्राने उल्लेखनीय काम केले. खाजगी क्षेत्राची वाढ झाली पाहिजे. त्यांच्यावर अनावश्यक निर्बंध कमी केले पाहिजे. जनतेचे हित व सुविधा तसेच सरकारची जबाबदारी कमी करण्याच्या उद्देशाने सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे खासगीकरण योग्य असल्याचे प्रभू यांनी स्पष्ट केले. येत्या काळात सार्वजनिक क्षेत्रातील कुठल्या कंपन्यांचे खासगीकरण केले जाईल याबाबत अर्थमंत्रालय लवकरच धोरण जाहीर करणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. केंद्र सरकारने भविष्याच्या दृष्टीने अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मोठे पाऊल उचलले आहे. या अर्थसंकल्पामुळे अर्थव्यवस्थेला नवी दिशा मिळेल असा विश्वास प्रभू यांनी व्यक्त केला. पत्रपरिषदेला शहराध्यक्ष आ.प्रवीण दटके, आ.गिरीश व्यास, प्रदेश प्रवक्ते चंदन गोस्वामी, मिलींद कानडे, योगेश बन, अनिरुद्ध पालकर, अशोक शनिवारी, प्रामुख्याने उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांबाबत बोलणे टाळले

शिवसेनेचे माजी नेते या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्याचे विश्लेषण कसे कराल अशी सुरेश प्रभू यांना विचारणा केली असता त्यांनी त्यावर ठोस बोलणे टाळले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज हयात असते तर, त्यांनीच उत्तर दिले असते, असे सूचक उत्तर मात्र दिले.

नदीजोड प्रकल्पाला गती मिळावी

स्वातंत्र्यानंतर आपल्या देशात नद्यांना आलेल्या पुरामुळे प्रचंड हानी झाली आहे. नदीजोड प्रकल्पातून ही समस्या नियंत्रणात येऊ शकते. नद्या जोड प्रकल्पाचा प्रमुख असताना मी ३५ नद्यांना जोडण्याचा कृती आराखडा अहवाल सर्वोच्च न्यायालयाला सादर केला. त्यावर आता अधिक वेगाने काम होणे अपेक्षित आहे, अशी अपेक्षा सुरेश प्रभू यांनी व्यक्त केली.