शहरं
Join us  
Trending Stories
1
वाद चिघळणार! ठाण्यात शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण; भाजपाच्या माजी नगरसेवकावर आरोप
2
मतविभाजनाची भीती! ठाकरे गटाकडून काँग्रेसची मनधरणी, बड्या नेत्याची वर्षा गायकवाडांशी चर्चा 
3
गौतम गंभीरचे प्रयोग टीम इंडियाला झेपेना; दीड वर्षात नंबर ३ वर खेळवले तब्बल सात फलंदाज
4
TATA ची 'ही' कंपनी ५० टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार, यापूर्वी TCS मधून १२ हजार कर्मचाऱ्यांना दिलेला नारळ
5
आई आमदार बनली, पण मंत्रिपद मुलाला मिळालं; नितीश कुमारांच्या नव्या सरकारमध्ये संधी, सगळेच हैराण
6
Cyber Crime: दिवसा भारतीय, रात्री अमेरिकन नागरिकांवर सायबर हल्ला; नवी मुंबईतून २० जणांना अटक!
7
दरवर्षी जमा करा १.५ लाख, मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; मुलीच्या भविष्यासाठी सुरक्षित आहे सरकारी स्कीम
8
Uddhav Thackeray: "बाबा, मला मारले म्हणत दिल्लीला गेले" अमित शाह- एकनाथ शिंदे यांच्या भेटीवरून ठाकरेंचा टोला
9
Mumbai: मुंबईकरांसाठी खुशखबर...! नव्या इमारतीतील घरांसाठी नोंदणी शुल्क माफ
10
BJP vs Shinde Sena: मुद्रांक शुल्क सवलतीच्या निर्णयावरून शिंदेसेना-भाजपमध्ये क्रेडिट वॉर सुरू!, कोण काय बोलतंय? वाचा
11
आजचे राशीभविष्य - २१ नोव्हेंबर २०२५, कार्यपूर्ती, यश आणि कीर्ती मिळविण्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस
12
Elections: मुंबईत ११.८० लाख तर, ठाण्यात ४.२१ लाख मतदार वाढले; महिला मतदारांची संख्या अधिक!
13
SC: राज्यपाल, राष्ट्रपतींना विधेयकांच्या मंजुरीसाठी डेडलाइन देता येणार नाही, न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
14
India- Israel: भारत-इस्रायल समृद्धीचे नवे पर्व सुरू, मुक्त व्यापारासाठी उभयतांत सहमती
15
काँग्रेस सिद्धारामय्यांना हटवणार? कर्नाटकात CM पदावरून पुन्हा वाद पेटला, डीके गटातील आमदारांनी दिल्लीत तळ ठोकला
16
चीन-जपान तणावात भारताची 'बल्ले-बल्ले'! झाला बंपर फायदा, बाजार 11% नं वधारला; आता ट्रम्प टॅरिफचं 'नो-टेंशन'!
17
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
18
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
19
विशेष लेख: मिस्टर/मिसेस 'पसेंटेज' आणि बंगल्यावरचे 'ठेके'
20
लेख: बिन भिंतींच्या उघड्या शाळेत तुमचे स्वागत आहे...
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र व राज्य शासनाचे धोरण कामगारविरोधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 00:42 IST

केंद्र व राज्य शासन सातत्याने कामगारविरोधी धोरणे राबवित असून यामुळे देशातील औद्योगिक क्षेत्राचा माहोल ढासळत चालला आहे. या धोरणांमुळे कामगारांची स्थिती वाईट झाली असून भविष्यात ‘बंधुआ’ कामगार होण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. त्यामुळे संघटित, असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या देशातील ४० कोटी कामगारांनी एकत्रित येऊन सरकारच्या धोरणाविरोधात उभे होण्याचे आवाहन राष्ट्रीय मजदूर काँग्रेस व त्यांच्या संलग्नित संस्थांनी केले आहे.

ठळक मुद्देबंधुआ मजदूर करण्याचा आरोप ४० कोटी श्रमिकांना एकजूट होण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : केंद्र व राज्य शासन सातत्याने कामगारविरोधी धोरणे राबवित असून यामुळे देशातील औद्योगिक क्षेत्राचा माहोल ढासळत चालला आहे. या धोरणांमुळे कामगारांची स्थिती वाईट झाली असून भविष्यात ‘बंधुआ’ कामगार होण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. त्यामुळे संघटित, असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या देशातील ४० कोटी कामगारांनी एकत्रित येऊन सरकारच्या धोरणाविरोधात उभे होण्याचे आवाहन राष्ट्रीय मजदूर काँग्रेस व त्यांच्या संलग्नित संस्थांनी केले आहे.संघटनेच्या महाराष्ट्र शाखेचे संघटन सचिव रवींद्र यावलकर यांनी सांगितले की, केंद्र शासनाच्या पावलावर पाऊल ठेवत महाराष्ट्र मध्यप्रदेश व गुजरात राज्याच्या शासनाने असे कामगारविरोधी कायदे पारित केले आहेत. नव्या कायद्यानुसार ३०० कर्मचारी कार्यरत असलेल्या उद्योग संस्थांना कुठलीही परवानगी न घेता कंपनी बंद क रण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. यापूर्वीचे धोरण १०० कर्मचाºयांवर मर्यादित होते. नव्या कायद्यानुसार कंपनी मालक कधीही आपली संस्था बंद करून कामगारांना घरी पाठवण्याचे अधिकार दिले आहेत. यामुळे कामगारांवर अचानक बेरोजगार होण्याचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. दुसऱ्या एका कायद्यानुसार कोणत्याही संस्थेत कामगारांची संघटना स्थापन करण्यासाठी ३० टक्के कामगारांची सदस्यता आवश्यक करण्यात आली आहे. यापूर्वी ही मर्यादा १५ टक्केवर होती. याशिवाय संघटना स्थापन करताना संस्थेतील कर्मचाऱ्यांचे असणे आवश्यक आहे. श्रम क्षेत्रात काम करणारे या संघटनेचे नेतृत्व करण्यास पात्र राहणार नाहीत. न्यायालयाबाहेर सामंजस्य करण्याचे धोरणही राबविण्यात आले आहे. हे सर्व कायदे मालकांचे हित लक्षात घेऊन करण्यात आले असून कामगारांना मारक ठरणार असल्याचे यावलकर म्हणाले. या धोरणांविरोधात कामगारांना एकजूट करण्यासाठी अभियान राबविण्यात येत असून महाराष्ट्र नॅशनल युनियन बीएसएनएल वर्कर्स कार्याध्यक्ष दिलीप कोसारे व जिल्हा सचिव सूर्यकांत शेंडेकर यांना जबाबदारी सोपविण्यात आल्याचे यावलकर यांनी पत्रकाद्वारे स्पष्ट केले.

टॅग्स :Employeeकर्मचारीnagpurनागपूर