शहरं
Join us  
Trending Stories
1
 ‘चाणक्य’चा मविआला धक्का, इंडिया टुडेच्या पोलनेही टेन्शन वाढवलं, महायुती जिंकणार तब्बल एवढ्या जागा
2
Exit Poll Result: बारामतीसह इतर ठिकाणीही अजित पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या जागांचा 'असा' आहे अंदाज
3
सांगली लोकसभेत मोठा धमाका होणार; कोण आघाडीवर? एक्झिट पोलचे आकडे आले समोर
4
T20 WC 24, IND vs BAN Live : हार्दिक पांड्याचा रूद्रावतार; पंतचे अर्धशतक, भारतासाठी खुशखबर
5
देशात पुन्हा एकदा मोदी सरकार, पण ४०० पार नाही जाणार, एक्झिट पोलचा अंदाज 
6
कोल्हापूर, हातकणंगलेत कोण आघाडीवर? महायुतीला धक्का? एक्झिट पोलमध्ये कोण आघाडीवर
7
वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ अमेरिकेत दाखल; गावस्करांना पाहून बाबरनं काय केलं? Video
8
दिल्लीत आप-काँग्रेस आघाडी, केजरीवाल यांचं सहानुभूतीचं राजकारण निष्प्रभ, भाजपा पुन्हा मारणार बाजी
9
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजपा पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा 
10
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: देशात 'मोदी 3.0' चीच हवा, महाराष्ट्रात मात्र 'कट टू कट' जागा
11
IND vs BAN Live : वर्ल्ड कपची तयारी सुरू! विराट कोहली आज बाकावर; रोहितसोबत संजू मैदानात
12
दिनेश कार्तिकचा क्रिकेटला 'पूर्णविराम', स्टार खेळाडूची निवृत्ती, टीम इंडियाचा खरा 'इम्पॅक्ट'
13
Exit Poll: महाराष्ट्रात मोठी उलथापालथ; महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी, असे आहेत आकडे
14
IND vs BAN Live : ...म्हणून विराट कोहली सराव सामना खेळत नाही; रोहित शर्मानं सांगितलं कारण
15
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर
16
मोठी बातमी: दक्षिण भारतातील एक्झिट पोलचे आकडे समोर; कोणाला, किती जागा?
17
Exit Poll : बीडमध्ये पंकजा मुंडेंकडे आघाडी तर नगरमध्ये भाजपला मोठा धक्का!
18
शेवटच्या क्षणी काँग्रेसने विचार बदलला; 'एक्झिट पोल'बाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
19
‘इंडिया’ आघाडी २९५ हून अधिक जागा जिंकेल, एक्झिट पोलचे आकडे येण्यापूर्वी खर्गेंचा मोठा दावा 
20
शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबत तटकरेंचा खळबळजनक दावा; मात्र अजित पवार म्हणाले...

संघ मुख्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा; सर्व नागरिकांनी संविधानाचे अध्ययन करावे - सरसंघचालक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2024 3:48 PM

आजच्या स्थितीत संविधानाचे सर्वांनी अध्ययन करणे आवश्यक आहे. असे झाले तरच समता व स्वतंत्रता या दोन्ही गोष्टी एकत्रित आणण्यासाठी आवश्यक असलेला बंधुभाव वाढेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी केले.

नागपूर : संविधानात दिलेल्या तत्वांवर आधारित आचरण व व्यवहार हा जास्त महत्त्वाचा असल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले होते. आजच्या स्थितीत संविधानाचे सर्वांनी अध्ययन करणे आवश्यक आहे. असे झाले तरच समता व स्वतंत्रता या दोन्ही गोष्टी एकत्रित आणण्यासाठी आवश्यक असलेला बंधुभाव वाढेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महाल येथील मुख्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांनी तिरंगा फडकवत ध्वजवंदन केले. त्यावेळी ते बोलत होते.

४० वर्षांअगोदर जर कुणी भारत प्रगतीपथावर चालेल असे म्हटले तर लोक आपली खिल्ली उडवायचे. मात्र आज देश सर्वच क्षेत्रांत अग्रेसर आहे. देशातील प्रत्येक नागरिकाची ही आशा आहे ही देश विश्वगुरू झाला पाहिजे. ती आपल्या देशाची क्षमतादेखील आहे. आपल्या देशात २२ जानेवारी व आज एक नव्या वातावरणाची निर्मिती झाली आहे. मात्र देशाप्रति असलेली ही भावना केवळ एका दिवसासाठी नको. संविधानातील मुख्य तत्वांचा सर्वांनी अभ्यास केला पाहिजे, असे आवाहन सरसंघचालकांनी केले.

यावेळी विविध प्रचारक, स्वयंसेवक व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. सुरक्षादलाच्या जवानांनीदेखील तिरंग्याला सलामी दिली.

टॅग्स :Republic Dayप्रजासत्ताक दिन २०२४Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ