शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

'आज माझा वाढदिवस तर उद्या मृत्यू दिन साजरा करा'.. तो सहज बोलला आणि घरी जाताना त्याचा खून झाला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2022 20:38 IST

Nagpur News मित्रांसोबत वाढदिवस साजरा करून घरी परतणाऱ्या तरुणाचा आरोपींनी शस्त्रांनी वार करून खून केला. ही थरारक घटना मंगळवारी रात्री कोतवाली ठाण्यांतर्गत शिवाजीनगरात घडली.

ठळक मुद्देनशेत गुन्हेगारांचे कृत्य कोतवालीतील घटना, तीन आरोपींना अटक

 

नागपूर : मित्रांसोबत वाढदिवस साजरा करून घरी परतणाऱ्या तरुणाचा आरोपींनी शस्त्रांनी वार करून खून केला. ही थरारक घटना मंगळवारी रात्री कोतवाली ठाण्यांतर्गत शिवाजीनगरात घडली. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.

मनिष यादव (२५, शिवाजीनगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर आरोपीत गणेश उर्फ दादू मांडले (१९, भुतेश्वरनगर), नीलेश भुरे (२६, शिवाजीनगर) आणि श्याम वासनिक (१९, कुंभारटोली) यांचा समावेश आहे. मनिष महाल परिसरात फळाच्या दुकानात काम करतो. आरोपी गंगाबाई घाटावर अंत्यसंस्काराचे काम करतात. ते गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून, त्यांना नशेची सवय आहे. मंगळवारी मनिषचा वाढदिवस होता. मनिषने दुकान बंद करून आपल्या मित्रांसोबत वाढदिवस साजरा केला. मित्रांसोबत पार्टी केल्यानंतर मनिष घरी परतला. भोजन केल्यानंतर रात्री ११.४५ वाजता घरून निघाला. तो शिवाजीनगर चौकात पोहोचला. तेथे आरोपी गांजा पीत होते. मनिषचा आरोपींशी वाद झाला. दोघेही एकमेकांना शिवीगाळ करू लागले. दरम्यान, आरोपींनी धारदार शस्त्राने मनिषवर हल्ला केला. पोट, छातीवर वार करून गंभीर जखमी केल्यानंतर आरोपी फरार झाले. घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मनिषला रुग्णालयात नेले. तेथे त्यास मृत घोषित करण्यात आले. चौकशीत पोलिसांना मनिषचा आरोपींशी वाद झाल्याचे समजले. बुधवारी पहाटे पोलिसांनी आरोपींना अटक केली. शिवाजीनगरात खुलेआम मादक पदार्थांची विक्री होते. तेथे कुख्यात आरोपी राहतात. आरोपी अवैध धंद्यात सक्रिय आहेत. पोलीस कारवाई करीत नसल्यामुळे ते गुन्हेगारी घटना घडवून आणतात. गंगाबाई घाटावर सक्रिय असलेल्या आरोपींनी खून आणि दुसरे गंभीर गुन्हे केल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. येथील घटनांकडे पोलीस गंभीरतेने पाहत नाहीत.

गंमत खरी ठरली

मनिषने वाढदिवस साजरा करताना आज माझा वाढदिवस साजरा करा, उद्या मृत्यू दिन साजरा करा, असे मित्रांना म्हटले होते. त्याच्या खुनाची घटना समजल्यानंतर त्याचे शब्द खरे झाल्याचे मित्रांना वाटत आहे. सूत्रांनुसार मनिषचे लग्न ठरले आहे. १२ एप्रिलला त्याचे लग्न होणार होते. त्याची आरोपींशी ओळख नव्हती किंवा वादही नव्हता. क्षुल्लक वादातून आरोपींनी त्याचा खून केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी