शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

'आज माझा वाढदिवस तर उद्या मृत्यू दिन साजरा करा'.. तो सहज बोलला आणि घरी जाताना त्याचा खून झाला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2022 20:38 IST

Nagpur News मित्रांसोबत वाढदिवस साजरा करून घरी परतणाऱ्या तरुणाचा आरोपींनी शस्त्रांनी वार करून खून केला. ही थरारक घटना मंगळवारी रात्री कोतवाली ठाण्यांतर्गत शिवाजीनगरात घडली.

ठळक मुद्देनशेत गुन्हेगारांचे कृत्य कोतवालीतील घटना, तीन आरोपींना अटक

 

नागपूर : मित्रांसोबत वाढदिवस साजरा करून घरी परतणाऱ्या तरुणाचा आरोपींनी शस्त्रांनी वार करून खून केला. ही थरारक घटना मंगळवारी रात्री कोतवाली ठाण्यांतर्गत शिवाजीनगरात घडली. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.

मनिष यादव (२५, शिवाजीनगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर आरोपीत गणेश उर्फ दादू मांडले (१९, भुतेश्वरनगर), नीलेश भुरे (२६, शिवाजीनगर) आणि श्याम वासनिक (१९, कुंभारटोली) यांचा समावेश आहे. मनिष महाल परिसरात फळाच्या दुकानात काम करतो. आरोपी गंगाबाई घाटावर अंत्यसंस्काराचे काम करतात. ते गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून, त्यांना नशेची सवय आहे. मंगळवारी मनिषचा वाढदिवस होता. मनिषने दुकान बंद करून आपल्या मित्रांसोबत वाढदिवस साजरा केला. मित्रांसोबत पार्टी केल्यानंतर मनिष घरी परतला. भोजन केल्यानंतर रात्री ११.४५ वाजता घरून निघाला. तो शिवाजीनगर चौकात पोहोचला. तेथे आरोपी गांजा पीत होते. मनिषचा आरोपींशी वाद झाला. दोघेही एकमेकांना शिवीगाळ करू लागले. दरम्यान, आरोपींनी धारदार शस्त्राने मनिषवर हल्ला केला. पोट, छातीवर वार करून गंभीर जखमी केल्यानंतर आरोपी फरार झाले. घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मनिषला रुग्णालयात नेले. तेथे त्यास मृत घोषित करण्यात आले. चौकशीत पोलिसांना मनिषचा आरोपींशी वाद झाल्याचे समजले. बुधवारी पहाटे पोलिसांनी आरोपींना अटक केली. शिवाजीनगरात खुलेआम मादक पदार्थांची विक्री होते. तेथे कुख्यात आरोपी राहतात. आरोपी अवैध धंद्यात सक्रिय आहेत. पोलीस कारवाई करीत नसल्यामुळे ते गुन्हेगारी घटना घडवून आणतात. गंगाबाई घाटावर सक्रिय असलेल्या आरोपींनी खून आणि दुसरे गंभीर गुन्हे केल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. येथील घटनांकडे पोलीस गंभीरतेने पाहत नाहीत.

गंमत खरी ठरली

मनिषने वाढदिवस साजरा करताना आज माझा वाढदिवस साजरा करा, उद्या मृत्यू दिन साजरा करा, असे मित्रांना म्हटले होते. त्याच्या खुनाची घटना समजल्यानंतर त्याचे शब्द खरे झाल्याचे मित्रांना वाटत आहे. सूत्रांनुसार मनिषचे लग्न ठरले आहे. १२ एप्रिलला त्याचे लग्न होणार होते. त्याची आरोपींशी ओळख नव्हती किंवा वादही नव्हता. क्षुल्लक वादातून आरोपींनी त्याचा खून केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी