लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘सीबीएसई’तर्फे (सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा अनपेक्षितपणे गुरुवारी दुपारी निकाल जाहीर झाला. यंदादेखील उत्तीर्णांमध्ये विद्यार्थिनींचे प्रमाण जास्त असून विज्ञान, मानव्यशास्त्र व वाणिज्य शाखेतील अव्वल क्रमांक पटकाविणाऱ्यांमध्ये मुलीच आघाडीवर राहिली आहेत. शहरातून प्रथम येण्याचा मान हा विज्ञान शाखेतील श्रेयशी साहा या विद्यार्थिनीने पटकाविला. जैन इंटरनॅशनल स्कूल येथील श्रेयशी हिला ९८.६० टक्के गुण प्राप्त झाले.
विज्ञान शाखा१ श्रेयसी साहा जैन इंटरनॅशनल स्कूल ९८.६० %२ सार्थक आडे जैन इंटरनॅशनल स्कूल ९७.४० %३ सत्यप्रकाश करशर्मा केंद्रीय विद्यालय, वायुसेनानगर, ९७.०० %३ कशा सिंह बी.पी.भवन्स विद्यामंदिर, श्रीकृष्णनगर ९७.०० %४ मयंक चांडक सेंट झेव्हियर्स हायस्कूल, हिंगणा मार्ग ९६.८० %५ अंकुशा झंवर बी.पी.भवन्स विद्यामंदिर, श्रीकृष्णनगर ९६.६० %५ प्रबल गुप्ता केंद्रीय विद्यालय, वायुसेना नगर ९६.६० %६ अद्वैत देशपांडे जैन इंटरनॅशनल स्कूल ९६.४० %
वाणिज्य शाखा१ तन्मय चिंडालिया बी.पी.भवन्स विद्यामंदिर, सिव्हिल लाईन्स ९७.४० %१ निधी पुनिया बी.पी.भवन्स विद्यामंदिर, सिव्हिल लाईन्स ९७.४० %२ रजत वर्मा बी.पी.भवन्स विद्यामंदिर, सिव्हिल लाईन्स ९७.२० %३ ईशिता वर्मा बी.पी.भवन्स विद्यामंदिर, सिव्हिल लाईन्स ९७.०० %२ साक्षी नांदूरकर बी.पी.भवन्स विद्यामंदिर, श्रीकृष्णनगर ९६.४० %३ पार्थ देसाई सेंटर पॉईंट, काटोल रोड ९६.२० %४ अर्चित दालमिया सेंटर पॉईंट, काटोल रोड ९६.०० %५ मोहन वेन्सियानी बी.पी.भवन्स विद्यामंदिर, श्रीकृष्णनगर ९५.८० %६ श्रुती श्रीवास्तव सेंटर पॉईंट, काटोल रोड ९५.६० %
मानव्यशास्त्र शाखा १ ईशा रेड्डी बी.पी.भवन्स विद्यामंदिर, श्रीकृष्णनगर ९७.२० %२ लुबना डोंगरे सेंटर पॉईंट स्कूल, काटोल रोड ९७.०० %३ सचिन पटेल केंद्रीय विद्यालय, वायुसेनानगर ९७.०० %४ अल्हाद राऊत सेंटर पॉईंट स्कूल, काटोल रोड ९६.६० %५ आकांक्षा मिश्रा सेंटर पॉईंट स्कूल, काटोल रोड ९६.०० %६ मयूर दुर्गे बी.पी.भवन्स विद्यामंदिर, श्रीकृष्णनगर ९५.६० %
यंदा विज्ञानची बाजीमागील काही वर्षांपासून वाणिज्य शाखेतील विद्यार्थी अव्वल येत असल्याचे दिसून आले. मात्र यंदा विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी अव्वल स्थान पटकाविले. वाणिज्यमध्येदेखील विद्यार्थ्यांना मिळालेली गुणांची टक्केवारी चांगली आहे.‘मेट्रो’ शहरांप्रमाणे नागपुरात देखील वाणिज्य शाखेला मागणी वाढत असून, अनेक गुणवंत विद्यार्थी इकडे वळत आहेत. येणाऱ्या काळात वाणिज्य शाखेवर विद्यार्थ्यांचा जास्त भर नक्कीच दिसून येईल, असा विश्वास अनेक शाळांच्या मुख्याध्यापकांनी बोलून दाखविला.
बहुतांश शाळांचे निकाल १०० टक्केशहरातील बहुतांश शाळांचे निकाल १०० टक्के लागले. काही शाळांमध्ये ‘टॉपर्स’चा टक्का मात्र खालावला व ९० टक्के गुण मिळविणारे कमी विद्यार्थी दिसून आले. शाळांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, बी.पी.भवन्स विद्यामंदिर (सिव्हिल लाईन्स), बी.पी.भवन्स विद्यामंदिर (श्रीकृष्णनगर),सेंटर पॉईंट (काटोल रोड), जैन इंटरनॅशनल स्कूल, केंद्रीय विद्यालय (वायुसेनानगर) या शाळांमध्ये सर्वात जास्त ‘टॉपर्स’ आहेत.