शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

मोतिबिंदूमुक्त महाराष्ट्र योजनेलाच ग्रहण! केवळ ३४ टक्के शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2022 14:14 IST

दरवर्षी मोतिबिंदूमुळे अंधत्व येणाऱ्यांची सरासरी काढल्यास त्याची टक्केवारी ७२ टक्क्यांवर आहे. एकट्या महाराष्ट्रात सुमारे १७ लाख मोतिबिंदू रुग्णांच्या शस्त्रक्रिया प्रलंबित आहेत.

ठळक मुद्देसर्वाधिक शस्त्रक्रिया करणाऱ्यांमध्ये पूर्व विदर्भातील चार जिल्हे

सुमेध वाघमारे

नागपूर : महाराष्ट्र मोतिबिंदूमुक्त करण्यासाठी सरकारने मोहीम हाती घेतली आहे. परंतु या माेहिमेलाच ग्रहण लागले आहे. २०१८ - १९ या कालावधीत राज्यातील ३५ जिल्ह्यांनी मिळून ७९ टक्के मोतिबिंदू शस्त्रक्रिया केल्या असताना, २०२१ - २२ मध्ये केवळ ३४ टक्के शस्त्रक्रिया झाल्या आहेत. यामुळे ‘राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमा’ला शस्त्रक्रियेची गरज असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

दरवर्षी मोतिबिंदूमुळे अंधत्व येणाऱ्यांची सरासरी काढल्यास त्याची टक्केवारी ७२ टक्क्यांवर आहे. एकट्या महाराष्ट्रात सुमारे १७ लाख मोतिबिंदू रुग्णांच्या शस्त्रक्रिया प्रलंबित आहेत. यातील सुमारे ५ लाख रुग्णांवर तातडीने मोतिबिंदूची शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे. त्यासाठी ‘राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमां’तर्गत दरवर्षी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या व एनजीओ हॉस्पिटल्सना मोतिबिंदू शस्त्रक्रियेचे लक्ष्य दिले जाते.

आरोग्य विभागाने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार मार्च २०१८ ते एप्रिल २०१९ या कालावधीत १ लाख ६५ हजार ६९९ शस्त्रक्रियांचे लक्ष्य देण्यात आले होते. त्यापैकी ७९ टक्के म्हणजे, १ लाख ३१ हजार ५५५ शस्त्रक्रिया झाल्या, तर मार्च २०२१ ते एप्रिल २०२२ या कालावधीत २ लाख शस्त्रक्रियांचे लक्ष्य देण्यात आले होते. मात्र, ३४ टक्केच म्हणजे, ६७,६५५ शस्त्रक्रिया झाल्या आहेत.

- शस्त्रक्रियेत गडचिरोली जिल्हा प्रथम

राज्यात गेल्या वर्षी मोतिबिंदूच्या सर्वाधिक शस्त्रक्रिया झालेल्या पहिल्या ५ जिल्ह्यांमध्ये नागपूर विभागातील म्हणजे, पूर्व विदर्भातील ४ जिल्ह्यांचा समावेश आहे. यात गडचिरोली जिल्ह्याने १४४ टक्के शस्त्रक्रिया करून पहिला क्रमांक प्राप्त केला. गोंदिया जिल्ह्याने ११५ टक्के शस्त्रक्रिया करून दुसरा क्रमांक, भंडारा जिल्ह्याने ८२ टक्के शस्त्रक्रिया करुन तिसरा क्रमांक, चंद्रपूर जिल्ह्याने ७४ टक्के शस्त्रक्रिया करून चौथा क्रमांक, तर औरंगाबाद जिल्ह्याने ७२ टक्के शस्त्रक्रिया करून पाचवा क्रमांक प्राप्त केला आहे.

-पुणे, मुंबई, नागपूरसारखे मोठे जिल्हे ५० टक्क्यांच्या खाली

मोतिबिंदूच्या शस्त्रक्रियेत राज्यातील मोठ्या जिल्ह्यांची कामगिरी ५० टक्क्यांच्या खाली राहिली आहे. नागपूर ४३ टक्के, नाशिक ३४ टक्के, सोलापूर ३२ टक्के, पुणे २९ टक्के, मुंबई २४ टक्के, कोल्हापूर १७ टक्के, ठाणे १३ टक्के तर, जळगाव जिल्ह्यात ८ टक्केच शस्त्रक्रिया झाल्या आहेत.

टॅग्स :Healthआरोग्यGovernmentसरकार