शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

मोतिबिंदूमुक्त महाराष्ट्र योजनेलाच ग्रहण! केवळ ३४ टक्के शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2022 14:14 IST

दरवर्षी मोतिबिंदूमुळे अंधत्व येणाऱ्यांची सरासरी काढल्यास त्याची टक्केवारी ७२ टक्क्यांवर आहे. एकट्या महाराष्ट्रात सुमारे १७ लाख मोतिबिंदू रुग्णांच्या शस्त्रक्रिया प्रलंबित आहेत.

ठळक मुद्देसर्वाधिक शस्त्रक्रिया करणाऱ्यांमध्ये पूर्व विदर्भातील चार जिल्हे

सुमेध वाघमारे

नागपूर : महाराष्ट्र मोतिबिंदूमुक्त करण्यासाठी सरकारने मोहीम हाती घेतली आहे. परंतु या माेहिमेलाच ग्रहण लागले आहे. २०१८ - १९ या कालावधीत राज्यातील ३५ जिल्ह्यांनी मिळून ७९ टक्के मोतिबिंदू शस्त्रक्रिया केल्या असताना, २०२१ - २२ मध्ये केवळ ३४ टक्के शस्त्रक्रिया झाल्या आहेत. यामुळे ‘राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमा’ला शस्त्रक्रियेची गरज असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

दरवर्षी मोतिबिंदूमुळे अंधत्व येणाऱ्यांची सरासरी काढल्यास त्याची टक्केवारी ७२ टक्क्यांवर आहे. एकट्या महाराष्ट्रात सुमारे १७ लाख मोतिबिंदू रुग्णांच्या शस्त्रक्रिया प्रलंबित आहेत. यातील सुमारे ५ लाख रुग्णांवर तातडीने मोतिबिंदूची शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे. त्यासाठी ‘राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमां’तर्गत दरवर्षी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या व एनजीओ हॉस्पिटल्सना मोतिबिंदू शस्त्रक्रियेचे लक्ष्य दिले जाते.

आरोग्य विभागाने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार मार्च २०१८ ते एप्रिल २०१९ या कालावधीत १ लाख ६५ हजार ६९९ शस्त्रक्रियांचे लक्ष्य देण्यात आले होते. त्यापैकी ७९ टक्के म्हणजे, १ लाख ३१ हजार ५५५ शस्त्रक्रिया झाल्या, तर मार्च २०२१ ते एप्रिल २०२२ या कालावधीत २ लाख शस्त्रक्रियांचे लक्ष्य देण्यात आले होते. मात्र, ३४ टक्केच म्हणजे, ६७,६५५ शस्त्रक्रिया झाल्या आहेत.

- शस्त्रक्रियेत गडचिरोली जिल्हा प्रथम

राज्यात गेल्या वर्षी मोतिबिंदूच्या सर्वाधिक शस्त्रक्रिया झालेल्या पहिल्या ५ जिल्ह्यांमध्ये नागपूर विभागातील म्हणजे, पूर्व विदर्भातील ४ जिल्ह्यांचा समावेश आहे. यात गडचिरोली जिल्ह्याने १४४ टक्के शस्त्रक्रिया करून पहिला क्रमांक प्राप्त केला. गोंदिया जिल्ह्याने ११५ टक्के शस्त्रक्रिया करून दुसरा क्रमांक, भंडारा जिल्ह्याने ८२ टक्के शस्त्रक्रिया करुन तिसरा क्रमांक, चंद्रपूर जिल्ह्याने ७४ टक्के शस्त्रक्रिया करून चौथा क्रमांक, तर औरंगाबाद जिल्ह्याने ७२ टक्के शस्त्रक्रिया करून पाचवा क्रमांक प्राप्त केला आहे.

-पुणे, मुंबई, नागपूरसारखे मोठे जिल्हे ५० टक्क्यांच्या खाली

मोतिबिंदूच्या शस्त्रक्रियेत राज्यातील मोठ्या जिल्ह्यांची कामगिरी ५० टक्क्यांच्या खाली राहिली आहे. नागपूर ४३ टक्के, नाशिक ३४ टक्के, सोलापूर ३२ टक्के, पुणे २९ टक्के, मुंबई २४ टक्के, कोल्हापूर १७ टक्के, ठाणे १३ टक्के तर, जळगाव जिल्ह्यात ८ टक्केच शस्त्रक्रिया झाल्या आहेत.

टॅग्स :Healthआरोग्यGovernmentसरकार