शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

‘जात’ आता जागतिक चिंतेचा विषय : धनराज डाहाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 00:52 IST

जातीचा संदर्भ हा व्यक्तिगत नसून तो, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीयसुद्धा आहे. या देशातील सर्व प्रश्नांचा संदर्भ हा जातीशी आहे. देशात जात पाळणारी जी व्यक्ती विदेशात गेली, तिथे सुद्धा जातीचे जंतू घेऊन गेली. त्यामुळे जात आता राष्ट्रीय विषय राहीला नसून तो जागतिक चिंतेचा विषय झाला आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. धनराज डाहाट यांनी येथे केले.

ठळक मुद्देमूकनायक शताब्दी समारोह

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जातीचा संदर्भ हा व्यक्तिगत नसून तो, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीयसुद्धा आहे. या देशातील सर्व प्रश्नांचा संदर्भ हा जातीशी आहे. देशात जात पाळणारी जी व्यक्ती विदेशात गेली, तिथे सुद्धा जातीचे जंतू घेऊन गेली. त्यामुळे जात आता राष्ट्रीय विषय राहीला नसून तो जागतिक चिंतेचा विषय झाला आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. धनराज डाहाट यांनी येथे केले.मुक्तिवाहिनी आणि रिपब्लिकन मुव्हमेंट यांच्या संयुक्त अभियान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समाजनिर्मितीचे प्रथम मुखपत्र मूकनायक’ शताब्दी समारोह अंतर्गत गुरुवारी डॉ. आंबेडकर सभागृह उरुवेला कॉलनी येथे डॉ. धनराज डाहाट यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.यावेळी ‘जाती अंताचे वर्तमान संदर्भ’ या विषयावर बोलताना डॉ. डाहाट म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशिवाय जाती विषयावर खरे संशोधन होऊ शकत नाही. डॉ. बाबासाहेबांनी जाती संदर्भात मूलभूत विचार मांडले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पष्टपणे म्हणतात की, ‘जातीच्या पायावर तुम्ही काहीही उभारू शकत नाही. राष्ट्र, नैतिकता उभारू शकत नाही उभारण्याचा प्रयत्न केला तरी त्याला तडे जातील. जातीच्या प्रश्नातून काहीही साध्य होणार नाही, असेही बाबासाहेब स्पष्ट करतात. जातीच्या प्रश्नाला बाबासाहेब हे बुद्ध तत्त्वज्ञानातून पाहतात. त्यामुळेच त्यांनी बौद्ध धम्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला. धर्मांतराबाबत बाबासाहेब म्हणतात की, जीवनाच्या मूलभूत जाणिवांमध्ये बदल, मूल्यांमध्ये बदल, विचारसरणी व दृष्टिकोनात संपूर्ण बदल म्हणजे धर्मांतरण होय.धर्मांतर हा शब्द योग्य वाटत नसेल तर नवजीवन असेही त्याला म्हणता येईल. याचा प्रत्यय धम्मदीक्षा सोहळ्यात घेतलेल्या २१ व्या प्रतिज्ञेत स्पष्टपणे दिसून येतो, असेही डॉ. डाहाट यांनी स्पष्ट केले.यावेळी ज्येष्ठ कवी इ.मो. नारनवरे यांनीही आपले विचार व्यक्त केले.नरेंद्र शेलार यांनी प्रास्ताविक व कार्यक्रमाची भूमिका विषद केली. संचालन का.रा. वालदेकर यांनी केले.यावेळी नरेश वाहाणे, एन.एल. नाईक, दादाकांत धनविजय, राहुल दहीकर, दिलीप सूर्यवंशी, प्राचार्य भाऊ वासनिक, डॉ. विनोद डोंगरे, संजय गोडघाटे, सेवक लव्हात्रे, श्रीराम बन्सोड, धर्मराज निमसरकर, शिवचरण थूल, नलिनी डहाट आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

 

 

 

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरnagpurनागपूर