शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

‘बीकॉम’ चे प्रकरण तज्ज्ञ समितीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 23:40 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने बी.कॉम अंतिम वर्षाच्या प्रश्नपत्रिकेत तीन प्रश्न चुकीचे आल्याचे प्रकरण विषय तज्ज्ञांच्या समितीकडे सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. समितीच्या निर्णयानंतरच विद्यार्थ्यांना चुकीच्या प्रश्नाचे गुण द्यायचे की पुन्हा परीक्षा घ्यायची याचा निर्णय घेतला जाणार आहे.

ठळक मुद्देनागपूर विद्यापीठाने घेतला निर्णय : विद्यार्थ्यांनी केला कुलगुरुंना घेराव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने बी.कॉम अंतिम वर्षाच्या प्रश्नपत्रिकेत तीन प्रश्न चुकीचे आल्याचे प्रकरण विषय तज्ज्ञांच्या समितीकडे सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. समितीच्या निर्णयानंतरच विद्यार्थ्यांना चुकीच्या प्रश्नाचे गुण द्यायचे की पुन्हा परीक्षा घ्यायची याचा निर्णय घेतला जाणार आहे.बी.कॉम. च्या विद्यार्थ्यांनी या प्रश्नावर शुक्रवारी कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांना घेराव घातला. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिकेत आलेल्या चुकीच्या प्रश्नांची माहिती दिली. विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर कुलगुरूंनी संबंधित निर्णय घेतला. बीकॉम अंतिम वर्षाच्या फायनान्शियल अकाऊंटिंग- ३ या विषयाच्या तीन प्रश्नांमध्ये घोळ असल्याचे समोर आले होते. पेपर सेटरने एका गाईडमधून प्रश्न चोरी केले असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता. ही चोरी लपविण्यासाठी प्रश्नातील आकड्यांमध्ये हेराफेरी करण्यात आल्याचा दावाही विद्यार्थ्यांनी केला होता. प्रश्न क्रमांक २ (सी) व प्रश्न क्रमांक ३ (सी) मध्येही घोळ होता.या संबंधी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नीरज खटी यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, विद्यार्थ्यांची तक्रार प्राप्त झाली आहे. लवकरच हे प्रकरण विषय तज्ज्ञ समितीकडे पाठविले जाईल. समितीच्या सूचनेनुसार निर्णय घेतला जाईल.अधिकारीही मानत आहे चूक परीक्षा विभागातील काही अधिकाऱ्यांनी संबंधित प्रश्नपत्रिका पाहून त्यातील तीन प्रश्नात चुका असल्याचे मान्य केले. आकड्यांची हेराफेरी करण्यात ही चूक झाल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. प्रश्नपत्रिकेला अंतिम रुप देताना आकड्यांचा ताळमेळ साधण्यात आलेला नाही, असेही यावरून दिसते.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठStudentविद्यार्थी