शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

पैशाचे सोंग घेता येत नाही ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्यात वीज बिल माफीवरून राजकारण तापले असताना ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी यासंदर्भात आणखी एक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्यात वीज बिल माफीवरून राजकारण तापले असताना ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी यासंदर्भात आणखी एक वक्तव्य केले आहे. कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत कुणाला जास्त वीज देयक आले असेल तर त्यांच्यासाठी सवलत, हप्ते यांची तरतूद करण्यात आली होती. माफीसाठी पैसा लागतो व पैशाचे सोंग घेता येत नाही. कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक तुटवड्यामुळे आम्हाला थोडे माघारी यावे लागले आहे, असे नितीन राऊत यांनी सांगितले. गुरुवारी नागपुरात प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.

राज्यातील तिन्ही वीज कंपन्या या कुणाच्या तरी ग्राहक आहेत. यात बँका, कोल इंडिया इत्यादींचा समावेश आहे. त्यांनादेखील पैसा द्यावाच लागतो. वीजबिलमाफीचा निर्णय हा राज्य शासनाचा विषय आहे. राज्याने संपूर्ण तिजोरी कोरोनाच्या संकटासाठी खुली केली आहे. आरोग्याला जास्त महत्त्व देणे ही गरज आहे. विरोधी पक्ष मोर्चे काढण्याचा प्रयत्न करतो. मात्र क्रूड तेलाचे भाव खाली आले असतानादेखील पेट्रोल-डिझेल जुन्याच भावाने का मिळत आहे. केंद्राकडे आमचे जीएसटीचे २८ हजार कोटी अडकले आहेत. विरोधक वीजमाफी द्या म्हणतात. मात्र त्यांच्याच कार्यकाळात राज्याची तिजोरी रिकामी झाली व राज्यावर ४ लाख कोटींचे कर्ज झाले, असा आरोप राऊत यांनी केला.

संपूर्ण आघाडीचे सरकार तिन्ही पक्षांचे सरकार आहे, आमच्यात काहीच समस्या नाही. भाजपने पाच वर्षे सत्ता भोगली. १०८ आमदार निवडून आले. मात्र आता त्यांच्यात चलबिचल आहे व आमदार सांभाळण्याची कुवत नाही. त्यामुळेच त्यांना काँग्रेसचा पुळका येत आहे. त्यांना विरोधी पक्षाचेच काम चांगल्या पद्धतीने करता येते व त्यांनी तेच केले पाहिजे, असे राऊत म्हणाले.