शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेसाठी लवकर निश्चित करावा उमेदवार; काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा सूर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 12:12 IST

लोकसभा निवडणुकांतील पराभवामुळे निराश झालेल्या काँग्रेसने आता विधानसभेची तयारी सुरू केली आहे. याअंतर्गतच मुंबईत प्रदेश काँग्रेस कार्यालयात जिल्हानिहाय आढावा बैठकांत नागपूर जिल्ह्यासंदर्भात मंथन झाले.

ठळक मुद्देमुंबईत नागपूर जिल्ह्यातील १२ जागांबाबत मंथन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणुकांतील पराभवामुळे निराश झालेल्या काँग्रेसने आता विधानसभेची तयारी सुरू केली आहे. याअंतर्गतच मुंबईत प्रदेश काँग्रेस कार्यालयात जिल्हानिहाय आढावा बैठकांत नागपूर जिल्ह्यासंदर्भात मंथन झाले. नागपूर जिल्ह्यातील १२ जागांबाबत सविस्तर चर्चा झाली. जर विधानसभा निवडणुकांत चांगली कामगिरी करायची असेल तर सर्वच जागांवर लवकरात लवकर उमेदवार निश्चित करावा, अशी भूमिका यावेळी शहर व जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली.काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या पुढाकारातून बैठकांचे सत्र आयोजित करण्यात आले. या बैठकीत लोकसभा निवडणुकांमधील अपयश, ‘डॅमेज कंट्रोल’सोबतच येणाºया काळातील रणनीतीवर चर्चा करण्यात आली. विविध मुद्यांवर स्थानिक पदाधिकाऱ्यांचे मतदेखील जाणून घेण्यात आले. शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकांचा अहवाल मांडला. त्यासोबत शहरातील सहा विधानसभा मतदारसंघात निवडणुकांच्या दृष्टीने आखण्यात आलेल्या आराखड्याबाबत माहिती दिली. या जागांवर लोकसभेतील कामगिरीवरदेखील त्यांनी प्रकाश टाकला. उत्तर नागपुरात काँग्रेसला मताधिक्य मिळाले. याचे श्रेय दुसऱ्या फळीतील नेता व कार्यकर्त्यांना आहे. निवडणुकांत यश मिळवायचे असेल तर लवकरात लवकर उमेदवारांची नावे घोषित व्हावी. जर असे झाले तर उमेदवाराची मानसिक तयारी होते व ते विविधांगी विचार करून मतदारांपर्यंत पोहोचू शकतात, असा सूर या बैठकीत होता. जर पक्ष उमेदवारांच्या नावाची घोषणा करू शकत नसेल तर कमीतकमी उमेदवाराला खासगीत निरोप द्यावा, असेदेखील एका पदाधिकाऱ्याने मत व्यक्त केले.

पटोले, जिल्हाध्यक्ष अनुपस्थितबैठकीत काँग्रेस शहराध्यक्ष विकास ठाकरे, रामटेक लोकसभा मतदारसंघातील पराभूत उमेदवार किशोर गजभिये, प्रदेश सचिव उमाकांत अग्निहोत्री, अतुल लोंढे, अनंतराव घारड, अमोल देशमुख, हुकूमचंद आमधरे, माजी आमदारएस. क्यू. जमा इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. मात्र जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, नागपूर मतदारसंघातील पराभूत उमेदवार नाना पटोले हे अनुपस्थित होते. मुळक यांच्या अनुपस्थितीतच ग्रामीण भागातील सहा जागांवर चर्चा झाली.

टॅग्स :congressकाँग्रेस