शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
4
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
5
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
6
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
7
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
8
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
9
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
10
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
11
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
12
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
13
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
14
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
15
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
16
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
17
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
18
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
19
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
20
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई

विधानसभेसाठी लवकर निश्चित करावा उमेदवार; काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा सूर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 12:12 IST

लोकसभा निवडणुकांतील पराभवामुळे निराश झालेल्या काँग्रेसने आता विधानसभेची तयारी सुरू केली आहे. याअंतर्गतच मुंबईत प्रदेश काँग्रेस कार्यालयात जिल्हानिहाय आढावा बैठकांत नागपूर जिल्ह्यासंदर्भात मंथन झाले.

ठळक मुद्देमुंबईत नागपूर जिल्ह्यातील १२ जागांबाबत मंथन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणुकांतील पराभवामुळे निराश झालेल्या काँग्रेसने आता विधानसभेची तयारी सुरू केली आहे. याअंतर्गतच मुंबईत प्रदेश काँग्रेस कार्यालयात जिल्हानिहाय आढावा बैठकांत नागपूर जिल्ह्यासंदर्भात मंथन झाले. नागपूर जिल्ह्यातील १२ जागांबाबत सविस्तर चर्चा झाली. जर विधानसभा निवडणुकांत चांगली कामगिरी करायची असेल तर सर्वच जागांवर लवकरात लवकर उमेदवार निश्चित करावा, अशी भूमिका यावेळी शहर व जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली.काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या पुढाकारातून बैठकांचे सत्र आयोजित करण्यात आले. या बैठकीत लोकसभा निवडणुकांमधील अपयश, ‘डॅमेज कंट्रोल’सोबतच येणाºया काळातील रणनीतीवर चर्चा करण्यात आली. विविध मुद्यांवर स्थानिक पदाधिकाऱ्यांचे मतदेखील जाणून घेण्यात आले. शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकांचा अहवाल मांडला. त्यासोबत शहरातील सहा विधानसभा मतदारसंघात निवडणुकांच्या दृष्टीने आखण्यात आलेल्या आराखड्याबाबत माहिती दिली. या जागांवर लोकसभेतील कामगिरीवरदेखील त्यांनी प्रकाश टाकला. उत्तर नागपुरात काँग्रेसला मताधिक्य मिळाले. याचे श्रेय दुसऱ्या फळीतील नेता व कार्यकर्त्यांना आहे. निवडणुकांत यश मिळवायचे असेल तर लवकरात लवकर उमेदवारांची नावे घोषित व्हावी. जर असे झाले तर उमेदवाराची मानसिक तयारी होते व ते विविधांगी विचार करून मतदारांपर्यंत पोहोचू शकतात, असा सूर या बैठकीत होता. जर पक्ष उमेदवारांच्या नावाची घोषणा करू शकत नसेल तर कमीतकमी उमेदवाराला खासगीत निरोप द्यावा, असेदेखील एका पदाधिकाऱ्याने मत व्यक्त केले.

पटोले, जिल्हाध्यक्ष अनुपस्थितबैठकीत काँग्रेस शहराध्यक्ष विकास ठाकरे, रामटेक लोकसभा मतदारसंघातील पराभूत उमेदवार किशोर गजभिये, प्रदेश सचिव उमाकांत अग्निहोत्री, अतुल लोंढे, अनंतराव घारड, अमोल देशमुख, हुकूमचंद आमधरे, माजी आमदारएस. क्यू. जमा इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. मात्र जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, नागपूर मतदारसंघातील पराभूत उमेदवार नाना पटोले हे अनुपस्थित होते. मुळक यांच्या अनुपस्थितीतच ग्रामीण भागातील सहा जागांवर चर्चा झाली.

टॅग्स :congressकाँग्रेस