शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

गडचिराेली जिल्ह्यात दारुनिर्मिती कारखान्याची परवानगी रद्द करा- अभय बंग

By निशांत वानखेडे | Updated: January 6, 2024 18:49 IST

५७ हजार नागरिकांच्या स्वाक्षरीचे सरकारला १०३१ प्रस्ताव सादर

नागपूर : तीस वर्षापासून दारुबंदी असलेल्या गडचिराेली जिल्ह्यात माेहफुलापासून दारु निर्मितच्या कारखान्याला जनविराेध वाढला आहे. दारु निर्मिती कारखान्याची परवानगर रद्द करावी म्हणून जिल्ह्यातील ८५० गावांमधून ५७,८९६ नागरिकांच्या स्वाक्षरी असलेले १००० च्यावर प्रस्ताव सरकारला सादर करण्यात आले आहेत.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व गडचिराेली जिल्हा दारुमुक्ती संघटनेचे अध्यक्ष पद्मश्री डाॅ. अभय बंग यांनी दारू निर्मिती कारखान्याचे भूमिपूजन हाेणे ही धक्कादायक बाब असल्याचे सांगत जिल्ह्यातील जनतेला अंधारात ठेवून कारखान्याची परवानगी देण्यावर आक्षेप घेतला. याविराेधात जिल्ह्यातील जनमत सरकारला कळावे म्हणून संघटनेने जिल्हाभरात अभियान राबविले. त्यानुसार जिल्ह्यातील ८४२ गावे, १२ शहरातील ११७ वार्ड, १७ आदिवासी इलाखा सभा व तालुका ग्रामसभा महासंघ व ५३ महाविद्यालयातील विद्यार्थी मिळून ५७,८९६ स्वाक्षऱ्यांचे १०३१ प्रस्ताव शनिवारी उपमुख्यमंत्री व गडचिराेली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात आले.

जिल्ह्यात माेहफुलापासून दारुनिर्मितीच्या कारखान्याची परवानगी ताबडताेब रद्द करावी, महिला बचत गटाच्या माध्यमातून माेहफुलापासून इतर उपयुक्त वस्तू तयार करून विक्री करावी, गडचिराेली जिल्ह्यात दारुबंदी अधिक प्रबळ करण्यासाठी सहकार्य करावे अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या. दारुबंदीचे लिखित समर्थन लाेकप्रतिनिधींनी दिले आहे. त्यामुळे वचनभंग करून दारुचे समर्थन व दारुबंदीला विराेध करणाऱ्या आमदार, खासदाराला जनता समर्थन देणार नाही, असे जाहीर करण्यात आल्याचे डाॅ. बंग यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मक आश्वासन दिल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष देवाजी ताेफा, शुभदा देशमुख, डाॅ. सतीश गाेगुलवार, सुबाेध दादा, गुरुदेव सेवा मंडळाचे डाॅ. शिवनाथ कुंभारे, भारती उपाध्याय, विजय खरवडे, लीलाताई कन्नाके आदी उपस्थित हाेते.

बंदी असूनही ५० काेटीची दारुविक्री

गडचिराेली जिल्ह्यात दारुबंदी असूनही वर्षाला ५० काेटी रुपयांची दारुविक्री झाल्याचे डाॅ. बंग यांनी स्पष्ट केले. दारुबंदी उठविलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात वर्षाला हजार काेटीची दारु विक्री हाेते तर निम्मी लाेकसंख्या असलेल्या गडचिराेली जिल्ह्यात बंदी नसती तर ५०० काेटीची दारुविक्री झाली असती, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे जिल्ह्यात निर्मिती करून बाहेर विक्री करू, असे म्हणणे चुकीचे आहे. कारखाना झाला तर जिल्ह्यात दारु पसरणार व बेकायदा विक्री वाढणार, अशी भीती आहे. कारखाना सुरु करण्याऐवजी दारुबंदी अधिक प्रबळ करा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली