शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

गडचिराेली जिल्ह्यात दारुनिर्मिती कारखान्याची परवानगी रद्द करा- अभय बंग

By निशांत वानखेडे | Updated: January 6, 2024 18:49 IST

५७ हजार नागरिकांच्या स्वाक्षरीचे सरकारला १०३१ प्रस्ताव सादर

नागपूर : तीस वर्षापासून दारुबंदी असलेल्या गडचिराेली जिल्ह्यात माेहफुलापासून दारु निर्मितच्या कारखान्याला जनविराेध वाढला आहे. दारु निर्मिती कारखान्याची परवानगर रद्द करावी म्हणून जिल्ह्यातील ८५० गावांमधून ५७,८९६ नागरिकांच्या स्वाक्षरी असलेले १००० च्यावर प्रस्ताव सरकारला सादर करण्यात आले आहेत.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व गडचिराेली जिल्हा दारुमुक्ती संघटनेचे अध्यक्ष पद्मश्री डाॅ. अभय बंग यांनी दारू निर्मिती कारखान्याचे भूमिपूजन हाेणे ही धक्कादायक बाब असल्याचे सांगत जिल्ह्यातील जनतेला अंधारात ठेवून कारखान्याची परवानगी देण्यावर आक्षेप घेतला. याविराेधात जिल्ह्यातील जनमत सरकारला कळावे म्हणून संघटनेने जिल्हाभरात अभियान राबविले. त्यानुसार जिल्ह्यातील ८४२ गावे, १२ शहरातील ११७ वार्ड, १७ आदिवासी इलाखा सभा व तालुका ग्रामसभा महासंघ व ५३ महाविद्यालयातील विद्यार्थी मिळून ५७,८९६ स्वाक्षऱ्यांचे १०३१ प्रस्ताव शनिवारी उपमुख्यमंत्री व गडचिराेली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात आले.

जिल्ह्यात माेहफुलापासून दारुनिर्मितीच्या कारखान्याची परवानगी ताबडताेब रद्द करावी, महिला बचत गटाच्या माध्यमातून माेहफुलापासून इतर उपयुक्त वस्तू तयार करून विक्री करावी, गडचिराेली जिल्ह्यात दारुबंदी अधिक प्रबळ करण्यासाठी सहकार्य करावे अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या. दारुबंदीचे लिखित समर्थन लाेकप्रतिनिधींनी दिले आहे. त्यामुळे वचनभंग करून दारुचे समर्थन व दारुबंदीला विराेध करणाऱ्या आमदार, खासदाराला जनता समर्थन देणार नाही, असे जाहीर करण्यात आल्याचे डाॅ. बंग यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मक आश्वासन दिल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष देवाजी ताेफा, शुभदा देशमुख, डाॅ. सतीश गाेगुलवार, सुबाेध दादा, गुरुदेव सेवा मंडळाचे डाॅ. शिवनाथ कुंभारे, भारती उपाध्याय, विजय खरवडे, लीलाताई कन्नाके आदी उपस्थित हाेते.

बंदी असूनही ५० काेटीची दारुविक्री

गडचिराेली जिल्ह्यात दारुबंदी असूनही वर्षाला ५० काेटी रुपयांची दारुविक्री झाल्याचे डाॅ. बंग यांनी स्पष्ट केले. दारुबंदी उठविलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात वर्षाला हजार काेटीची दारु विक्री हाेते तर निम्मी लाेकसंख्या असलेल्या गडचिराेली जिल्ह्यात बंदी नसती तर ५०० काेटीची दारुविक्री झाली असती, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे जिल्ह्यात निर्मिती करून बाहेर विक्री करू, असे म्हणणे चुकीचे आहे. कारखाना झाला तर जिल्ह्यात दारु पसरणार व बेकायदा विक्री वाढणार, अशी भीती आहे. कारखाना सुरु करण्याऐवजी दारुबंदी अधिक प्रबळ करा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली