शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
6
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
7
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
8
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
9
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
11
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
12
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
13
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
14
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
15
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
16
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
17
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
18
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
19
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
20
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...

इलनाचे अध्यक्ष व त्यांच्या मुलावरील गुन्हा रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:11 IST

- संघटनेची मागणी : करण्यात आलेली कारवाई ही राजकीय हेतूने प्रेरित - वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्यावर झालेला हा आघात कसा ...

- संघटनेची मागणी : करण्यात आलेली कारवाई ही राजकीय हेतूने प्रेरित

- वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्यावर झालेला हा आघात कसा खपवून घ्यायचा

नवी दिल्ली / लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राजधानीमध्ये २६ जानेवारी रोजी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅली आणि या दरम्यान झालेल्या हिंसाचाराचे वृत्तांकन केल्यामुळे भारतीय भाषिक समाचारपत्र संघटन (इलना)चे अध्यक्ष परेश नाथ व त्यांचा मुलगा अनंत नाथ यांच्या विरोधात अनेक एफआयआर नोंदविण्यात आल्या आहेत. या प्रकाराचा तीव्र निषेध करत या प्राथमिकी रद्द करण्याची मागणी संघटनेने केली आहे. हा प्रकार म्हणजे प्रेसच्या स्वातंत्र्यावर कुठाराघात असून, भारतीय वृत्तपत्रांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न असून, निषेधार्ह असल्याची भावना संघटनेने व्यक्त केली आहे.

इलना द्वारे जारी करण्यात आलेल्या निवेदनात, परेश नाथ व त्यांच्या मुलाच्या विरोधात दिल्ली हिंसाचारासंदर्भात केलेल्या वृत्तांकनाबाबत नोंदविण्यात आलेली एफआयआर पूर्णत: खोट्या तक्रारीवर आधारित आहे. तसेच यात राजकीय स्वार्थ दडला आहे. अशा तऱ्हेने प्राथमिकी नोंदवणे म्हणजे संविधानांतर्गत वृत्तपत्रांना प्रदान करण्यात आलेल्या स्वातंत्र्यावर मोठा आघात आहे. ही एफआयआर रद्द करावी आणि संविधानाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्याचे संरक्षण व्हावे. जेणेकरून प्रत्येक संपादक व पत्रकार निर्भिडपणे सत्य घटनेचे वृत्तांकन देशातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करेल.

‘एकाच गुन्ह्यात वारंवार एफआयआर नोंदवली जाऊ शकत नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने २००१ मध्ये टीटी एन्थोनी वर्सेज स्टेट प्रकरणात दिला होता. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश चंद्रचुड यांनीही नुकत्याच एका महत्त्वाच्या प्रकरणात अशाच प्रकारचे वक्तव्य केले आहे. मल्टीपल एफआयआर फ्रिडम ऑफ प्रेसला पूर्णत: नागरिकांना देशाच्या प्रशासकीय कामकाजाबाबत माहिती जाणून घेण्यास आणि पत्रकारांना एक जागृक समाजाची घडी कायम ठेवण्याच्या मौलिक अधिकारांना नष्ट करून देईल, असे चंद्रचूड म्हणाले होते. आणखी खेदजनक बाब म्हणजे, वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्यांच्या प्रकरणांत जगभरातील १८० देशांमध्ये भारताचा क्रमांक दोन घर खाली घसरून १४२वर पोहोचला आहे. अशा तऱ्हेच्या घटना भारताला आणखी मागे ढकलण्याचे कार्य करत आहेत. वृत्तपत्रे आपल्या महान लोकतंत्राचा चौथा स्तंभ आहेत आणि त्याची अस्तिता व रक्षा आपणा सर्वांच्या हातात आहे’ असेही या निवेदनात म्हटले गेले आहे.

.........