शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

इलनाचे अध्यक्ष व त्यांच्या मुलावरील गुन्हा रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:11 IST

- संघटनेची मागणी : करण्यात आलेली कारवाई ही राजकीय हेतूने प्रेरित - वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्यावर झालेला हा आघात कसा ...

- संघटनेची मागणी : करण्यात आलेली कारवाई ही राजकीय हेतूने प्रेरित

- वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्यावर झालेला हा आघात कसा खपवून घ्यायचा

नवी दिल्ली / लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राजधानीमध्ये २६ जानेवारी रोजी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅली आणि या दरम्यान झालेल्या हिंसाचाराचे वृत्तांकन केल्यामुळे भारतीय भाषिक समाचारपत्र संघटन (इलना)चे अध्यक्ष परेश नाथ व त्यांचा मुलगा अनंत नाथ यांच्या विरोधात अनेक एफआयआर नोंदविण्यात आल्या आहेत. या प्रकाराचा तीव्र निषेध करत या प्राथमिकी रद्द करण्याची मागणी संघटनेने केली आहे. हा प्रकार म्हणजे प्रेसच्या स्वातंत्र्यावर कुठाराघात असून, भारतीय वृत्तपत्रांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न असून, निषेधार्ह असल्याची भावना संघटनेने व्यक्त केली आहे.

इलना द्वारे जारी करण्यात आलेल्या निवेदनात, परेश नाथ व त्यांच्या मुलाच्या विरोधात दिल्ली हिंसाचारासंदर्भात केलेल्या वृत्तांकनाबाबत नोंदविण्यात आलेली एफआयआर पूर्णत: खोट्या तक्रारीवर आधारित आहे. तसेच यात राजकीय स्वार्थ दडला आहे. अशा तऱ्हेने प्राथमिकी नोंदवणे म्हणजे संविधानांतर्गत वृत्तपत्रांना प्रदान करण्यात आलेल्या स्वातंत्र्यावर मोठा आघात आहे. ही एफआयआर रद्द करावी आणि संविधानाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्याचे संरक्षण व्हावे. जेणेकरून प्रत्येक संपादक व पत्रकार निर्भिडपणे सत्य घटनेचे वृत्तांकन देशातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करेल.

‘एकाच गुन्ह्यात वारंवार एफआयआर नोंदवली जाऊ शकत नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने २००१ मध्ये टीटी एन्थोनी वर्सेज स्टेट प्रकरणात दिला होता. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश चंद्रचुड यांनीही नुकत्याच एका महत्त्वाच्या प्रकरणात अशाच प्रकारचे वक्तव्य केले आहे. मल्टीपल एफआयआर फ्रिडम ऑफ प्रेसला पूर्णत: नागरिकांना देशाच्या प्रशासकीय कामकाजाबाबत माहिती जाणून घेण्यास आणि पत्रकारांना एक जागृक समाजाची घडी कायम ठेवण्याच्या मौलिक अधिकारांना नष्ट करून देईल, असे चंद्रचूड म्हणाले होते. आणखी खेदजनक बाब म्हणजे, वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्यांच्या प्रकरणांत जगभरातील १८० देशांमध्ये भारताचा क्रमांक दोन घर खाली घसरून १४२वर पोहोचला आहे. अशा तऱ्हेच्या घटना भारताला आणखी मागे ढकलण्याचे कार्य करत आहेत. वृत्तपत्रे आपल्या महान लोकतंत्राचा चौथा स्तंभ आहेत आणि त्याची अस्तिता व रक्षा आपणा सर्वांच्या हातात आहे’ असेही या निवेदनात म्हटले गेले आहे.

.........