शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यासाठी शिंदे मुख्यमंत्री, आमच्यासाठी फडणवीसच सर्वस्व; गणेश नाईकांचे ठाण्यात सूचक वक्तव्य
2
पाकिस्तान, पाकिस्तानसारखा खेळला! विजयासाठी आयर्लंडसमोर टाकाव्या लागल्या धापा
3
सीईटीची साईट क्रॅश, प्रचंड मनस्ताप; नागपूरचे साैम्या दीक्षित व पार्थ असाटी यांना १०० टक्के
4
पाकिस्तानची विझण्यापूर्वीची फडफड! गोलंदाजांना सूर गवसला, पण क्षेत्ररक्षणात गचाळपणा दिसला 
5
काँग्रेसला इतक्या जागा कशा मिळाल्या? चौकशी व्हावी, राहुल गांधींवर रामदास आठवलेंचा पलटवार
6
'...अन्यथा मी राजकारण सोडेन', वायभासे कुटुंबियांचे सांत्वन करताना पंकजा मुंडेंना अश्रू अनावर
7
लोकसभेत बालेकिल्ले राखले, आता विधानसभेच्या तयारीला लागा; CM शिंदेंचे शिवसैनिकांना निर्देश
8
“NDA सरकार कोसळून इंडिया आघाडीचे सरकार येईल, प्रणिती शिंदे मंत्री होतील”; काँग्रेसचा दावा
9
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
10
निखळ सौंदर्य.. निरागस हास्य.. पिवळ्या फ्लोरल फ्रॉकमध्ये आलिया भटचा 'क्यूट' लूक (Photos)
11
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
12
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
13
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
14
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
15
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

कॅन्सरचे प्री-डिटेक्शन व 'क्रोमोझोमल रिपेअर' होईल शक्य?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2020 12:57 AM

भीती वाटणाऱ्या कॅन्सरचे आजारपूर्व निदान आणि हा आजार पुन्हा बळावू देणार नाही, असे रासायनिक मोलिक्यूल नागपूरचे डॉ. राजदीप देवीदास उताणे यांनी संशोधित केले आहे.

ठळक मुद्देनागपूरचे राजदीप उताणे यांचे पेटेन्टसाठी प्रयत्न : मान्यताप्राप्त संस्थांची मान्यता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कॅन्सर म्हटला की सर्वाधिक जीवघेणा आणि आजही लोकांच्या मनात धडकी भरविणाऱ्यामध्ये गणला जाणारा आजार आहे. लवकर निदान झाल्यानंतर उपचार शक्य असले तरी ही उपचाराची प्रक्रिया अनेकदा रुग्णांना त्रासदायकच असते. शिवाय उपचारानंतरही आजार पुन्हा बळावण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र या भीती वाटणाऱ्या कॅन्सरचे आजारपूर्व निदान आणि हा आजार पुन्हा बळावू देणार नाही, असे रासायनिक मोलिक्यूल नागपूरचे डॉ. राजदीप देवीदास उताणे यांनी संशोधित केले आहे. या पद्धतीद्वारे थेट कॅन्सरमुळे डॅमेज झालेल्या क्रोमोझोमचे संपूर्ण रिपेअर करण्याची क्षमता असल्याचा दावा त्यांनी केला असून या संशोधनाचे पेटेन्ट मिळविण्याचे प्रयत्नही त्यांनी चालविले आहेत.डॉ. राजदीप उताणे हे रसायनशास्त्राचे अभ्यासक असून नुकतेच त्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या प्राध्यापिका डॉ. सुजाता देव यांच्या मार्गदर्शनात आचार्य पदवी प्राप्त केली आहे. विशेष म्हणजे हे संशोधन त्यांच्या पीएच.डी. अभ्यासाचा विषय होता. ‘ग्रीन अ‍ॅप्रोच टूवर्ड्स सिन्थेसिस ऑफ बॉयोलॉजिकल पोटेन्ट मोलिक्यूल : वन फिलील नॅप्थॅलिन अ‍ॅन्ड देअर डेरिव्हेटीव्ह्ज’ असा हा विषय. संशोधनाला ‘अ‍ॅन्टिजिनोटॉक्सिटी’ असे त्यांनी नाव दिले आहे. यासाठी ‘वन फिनील नॅप्थॅलिन’ हे नवे गुणसूत्र त्यांनी उपयोगात आणले आहे. मायक्रोव्हेव सॉनिकेशन या ग्रीन टेक्निकचा उपयोग करून हे सिन्थेसिस मोलिक्यूल तयार केल्याचे त्यांनी सांगितले. याच मॉलिक्यूलसाठी त्यांनी मुंबईच्या संस्थेत पेटेन्ट मिळविण्यासाठी नोंद केली आहे. या रासायनिक पद्धतीद्वारे कॅन्सरचे पूर्व निदान तर शक्य आहे, मात्र त्यानंतर आजारामुळे नष्ट झालेले क्रोमोझोम पूर्वीच्या क्रोमोझोमप्रमाणेच रिपेअर करण्याची क्षमताही या प्रक्रियेमध्ये असल्याचे सांगत यामुळे उपचारानंतर आजार बळावण्याची शक्यताच बंद होणार, असा दावा डॉ. उताणे यांनी केला आहे. भोपाळच्या पिनॅकल बॉयोमेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट येथे या पद्धतीवर यशस्वी प्रयोग करण्यात आला असून ‘अ‍ॅनिमल इथिकल कमिटी’चीही मान्यता मिळाल्याची माहिती डॉ. उताणे यांनी दिली. हे संशोधन मानवी उपयोगात येण्यासाठी लांब प्रक्रिया पार करावी लागते, मात्र मानवी उपयोगात आल्यास मोठी क्रांती होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.प्लास्टिक विलगीकरणाचेही संशोधनकचऱ्यामध्ये जमा होणारे प्लास्टिक त्यांच्या स्तरानुसार वेगवेगळ्या प्रकारचे असते. जमा कचऱ्यातून त्याचे विलगीकरण करणे ही कठीण आणि वेळखाऊ प्रक्रिया असते. मात्र डॉ. राजदीप उताणे यांनी यावर ‘फ्लूईड लिक्विड सेपरेशन मेथड’ (एफएलएस मेथड)चा उपाय शोधला आहे. या रासायनिक द्रवाद्वारे हाय डेन्सिटी आणि लो डेन्सिटी प्लास्टिकचे विलगीकरण सहज आणि कमी वेळात करणे शक्य असल्याचा दावा त्यांनी केला आहे. ही प्रक्रिया १०० टक्के कार्यक्षम असून एका कंपनीत उपयोगातही आणली जात असल्याचे त्यांनी सांगितले.एमएससीमध्ये चार सुवर्णपदकेडॉ. राजदीप उताणे यांच्यातील कुशाग्र बुद्धिमत्ता आधीच दिसून आली आहे. एम.एस.सी. मध्ये रसायनशास्त्र विषयात त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून चार सुवर्णपदके प्राप्त केली आहेत. विशेष म्हणजे नेटच्या परीक्षेतही त्यांनी ऑल इंडिया रॅकिंगमध्ये द्वितीय येण्याचा मान प्राप्त केला. नॅनो सायन्स आणि नॅनो टेक्नालॉजीच्या पदव्युत्तर पदविकेत त्यांनी विद्यापीठाचे मेरिट प्राप्त केले आहे. सध्या ते संत गाडगेबाबा महाविद्यालय, हिंगणा येथे सहायक प्राध्यापक म्हणून सेवारत आहेत.

टॅग्स :cancerकर्करोगResearchसंशोधन