शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
4
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
5
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
6
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
7
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
8
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
9
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
10
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
11
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
12
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
13
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
14
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

फिलिपिन्समधील विद्यार्थ्यांची हाक...ने मजसी मातृभूमीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 12:30 AM

फिलिपिन्समध्ये झालेल्या ‘कोरोना’च्या चक्रव्यूहात फसल्याने महाराष्ट्रातील सुमारे ४० हून अधिक विद्यार्थी अस्वस्थ झाले. ‘ने मजसी परत मातृभूमीला’ अशीच आर्तसाद विद्यार्थ्यांनी घातली आहे.

ठळक मुद्देमूळचे महाराष्ट्राचे विद्यार्थी ‘सिंगापूर’मध्ये अडकले : नागपुरातील विद्यार्थ्याचादेखील समावेशउड्डाणाची परवानगी नसल्याने ‘बोर्डिंग पास’देखील फाडले

योगेश पांडे/लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : फिलिपिन्समध्ये झालेल्या ‘कोरोना’च्या चक्रव्यूहात फसल्याने महाराष्ट्रातील सुमारे ४० हून अधिक विद्यार्थी अस्वस्थ झाले. अशा प्रसंगात कुटुंबीयांसह राहावे या विचारातून सर्वांनी मायदेशाकडे धाव घेतली. त्यांच्या विमानाचे उड्डाण झाले अन् त्या कालावधीत फिलिपिन्ससह मलेशियातून येणारी विमाने रद्द करण्यात आली. नाईलाजाने त्यांना अगोदर मलेशिया व त्यानंतर सिंगापूरला अडकावे लागले. मुंबईला परतण्यासाठी त्यांच्या हाती ‘बोर्डिंग पास’देखील आला. मात्र नव्या नियमांचा हवाला देत तोदेखील फाडण्यात आला. दिवसभरापासून ते सिंगापूरच्या चांगी विमानतळावर अडकून आहेत. आता पुढे काय करायचे, याची कुठलीही दिशा स्पष्ट नाही अन् परत फिलिपिन्सला जायची हिंमत नाही. अशा स्थितीत ‘ने मजसी परत मातृभूमीला’ अशीच आर्तसाद विद्यार्थ्यांनी घातली आहे.फिलिपिन्समध्ये ‘कोरोना’चा कहर वाढल्याने तेथे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी तातडीने भारतात परतण्याचा निर्णय घेतला. काही विद्यार्थी दिल्लीमार्गे तर काही मुंबईमार्गे परतायला सुरुवात झाली. १७ मार्च रोजी महाराष्ट्रातील ४० हून अधिक विद्यार्थी निघाले. त्यांचे विमान मलेशियामार्गे मुंबईला येणार होते. मात्र मलेशियातील विमानांना भारतात प्रवेश नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्या वेळी सर्व विद्यार्थी विमानातच होते. मलेशियाला पोहोचल्यावर त्यांनी ही बाब कळाली. त्यानंतर सिंगापूरमार्गे मुंबईकडे जाता येईल असे त्यांना सांगण्यात आले. तब्बल १९ तासांनंतर ते क्वालालांपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाहून निघाले व बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास सिंगापूरच्या चांगी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. तेथे काही विद्यार्थ्यांना सुरुवातीला ‘बोर्डिंग पास’ देण्यात आला. परंतु ‘एअर इंडिया’ने फिलिपिन्स व मलेशियातून येणाºया प्रवाशांना नेण्यास नकार दिल्याचे त्यांना कळाले. काही वेळातच त्यांच्याकडून ‘बोर्डिंग पास’ घेऊन फाडण्यात आले. आता विद्यार्थी ना फिलिपिन्सला परतू शकत आहेत व ‘एअर इंडिया’च्या धोरणांनुसार मुंबईलादेखील येऊ शकत नाहीत. सिंगापूरमध्येदेखील जास्त वेळ राहू शकणार नाहीत. त्यामुळे आता आम्ही काय करावे, असा प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित करण्यात येत आहे. यासंदर्भात त्यांनी ‘व्हिडिओ’देखील काढून केंद्र सरकारला मदतीचे आवाहन केले आहे.विशेष विमानाची सोय करावी‘फिलिपिन्स’मध्ये वैद्यकीय शिक्षण घेणारा दुर्वेश अविनाश गाणार हा विद्यार्थीदेखील अडकला आहे. चांगी विमानतळावर आम्ही अडकलो असून आता काय करावे हे काहीच कळत नाही. आम्ही भारतीय दूतावासालादेखील संपर्क केला. परंतु तिकडूनदेखील अद्याप काही ठोस उत्तर आलेले नाही. आमच्या घरचे लोक काळजी करत असून केंद्र सरकारने त्वरित आमची मदत करावी, असे दुर्वेशने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. सिंगापूरमधून मुंबईला विमाने येऊ दिली जात आहेत. त्यामुळे आम्हाला मुंबईत येण्याची परवानगी द्यावी. असे शक्य नसेल तर सरकारने विशेष विमानाची सोय करावी व आम्हाला ‘एअरलिफ्ट’ करावे, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे. क्वालालांपूर विमानतळावर त्यांच्या जेवणाची सोय करण्यात आली होती. मात्र चांगी विमानतळावर पाण्याशिवाय त्यांना काहीही देण्यात आले नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याStudentविद्यार्थी