शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
3
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
4
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
5
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
6
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
7
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
8
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
9
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
10
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
11
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
12
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
13
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
14
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
15
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
16
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
17
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
18
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
19
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
20
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?

शिक्षकांच्या संख्यानिश्चितीबाबत आकडेमोड सुरू

By admin | Updated: May 24, 2014 01:01 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील महाविद्यालयात नेमके किती किमान कायमस्वरूपी शिक्षक हवेत हे निश्चित झालेले नाही. एकीकडे अजूनही प्रवेशबंदीचा तिढा सुटला नसताना दुसरीकडे यासंदर्भात

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील महाविद्यालयात नेमके किती किमान कायमस्वरूपी शिक्षक हवेत हे निश्चित झालेले नाही. एकीकडे अजूनही प्रवेशबंदीचा तिढा सुटला नसताना दुसरीकडे यासंदर्भात विद्वत परिषदेदरम्यान नेमण्यात आलेल्या दोन्ही समित्यांच्या सदस्यांची वेगाने आकडेमोड सुरू आहे. विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या पारंपरिक व व्यावसायिक महाविद्यालयांतील कायमस्वरूपी शिक्षकांची संख्यानिश्चिती करण्यासाठी तसेच प्रवेशबंदीसारखी प्रकरणे परत होऊ नयेत याकरिता कायमस्वरूपी धोरणच आखण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एकही नियमित शिक्षक नसल्याच्या कारणावरून नागपूर विद्यापीठाने गेल्या वर्षी २५० महाविद्यालयांवर प्रवेशबंदी घातली होती. संबंधित प्रकरण न्यायालयात आहे. मागील आठवड्यात झालेल्या विद्वत परिषदेच्या बैठकीत किमान शिक्षकसंख्येच्या मुद्यावर बरीच चर्चा झाली. प्रत्येक अभ्यासक्रमाला एकच शिक्षक असला तरी पुरेसे आहे, अशा महाविद्यालयांना मान्यता देण्यात यावी अशी भूमिका काही सदस्यांनी मांडली. परंतु विद्यार्थ्यांप्रमाणे शिक्षकांच्या मुद्यावरदेखील गुणवत्तेचा विचार व्हायलाच हवा, असे मत व्यक्त करण्यात आले. अखेर किमान शिक्षकसंख्या निर्धारित करण्यासाठी दोन समिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला. व्यावसायिक महाविद्यालयांतील शिक्षकसंख्या ठरविण्यासाठी डॉ. कीर्तीवर्धन दीक्षित यांच्या अध्यक्षतेखाली तर बिगर व्यावसायिक महाविद्यालयांसाठी प्र-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. या समितीला ३० मे पर्यंत अहवाल सादर करायचा आहे. यानुसार या समितींकडून निरनिराळे नियम, कायदे व नेमकी आवश्यकता इत्यादी मुद्दे विचारात घेऊन आकडेमोड सुरू आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने पारंपरिक अभ्यासक्रमांत विद्यार्थी संख्येनुसार किती शिक्षक असावेत हे स्पष्ट केले आहे. शिवाय २००९ च्या अधिनियमानुसार प्रत्येक महाविद्यालयात निर्धारित संख्येच्या किमान निम्मे शिक्षक नियुक्त केलेच पाहिजेत, अशी तरतूद केली आहे. महाविद्यालयांना संलग्नीकरण मिळाल्यानंतर पहिल्या वर्षी प्रवेशक्षमता तुलनेने कमी असते तर द्वितीय व तृतीय वर्षाला शिक्षकांचे वर्कलोड ठरवून देण्यात आलेले असते. परंतु तरीदेखील विषयनिहाय किमान एक शिक्षक नियुक्त करणे आवश्यक आहे. शिवाय त्यातही भाषा व इतर विषयांकरिता किती शिक्षक असावेत, त्यावर धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज असल्याचे समितीचे मत आहे. त्यानुसार शाखा व अभ्यासक्रमनिहाय किमान शिक्षक संख्या ठरविण्यात येत असल्याची माहिती विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे यांनी दिली. भूतकाळात जे काही झाले त्याचा विचार न करता भविष्यकाळात अडचणी निर्माण होऊ नये याकरिता कायमस्वरूपी धोरण निश्चित करण्यावर गंभीरतेने विचार सुरू आहे असे त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी)