शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जुन्या वादातून कॅबचालकाची चाकूने भोसकून हत्या

By योगेश पांडे | Updated: May 17, 2024 16:58 IST

Nagpur : यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली ही घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जुन्या वादातून एका तरुण कॅबचालकाची दोन आरोपींनी मध्यरात्रीच्या सुमारास चाकूने भोसकून हत्या केली. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

यश विष्णू गोनेकर (२१, म्हाडा क्वॉर्टर, कपिलनगर) असे मृतकाचे नाव आहे. तर शेख अरबाज शेख ईकबाल (म्हाडा कॉलनी) व असलम उर्फ गुड्डू मकसूद अन्सारी (म्हाडा कॉलनी) हे आरोपी आहेत. काही दिवसांअगोदर यश व अरबाजचे भांडण झाले होते. त्यानंतर अरबाजने घरी जाऊन यशची माफी मागितली होती. गुरुवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास यश ओलाची ट्रीप आली म्हणून घराबाहेर निघाला. रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास फरदीन सेलिब्रेशन हॉलजवळ आरोपींनी त्याला अडवले व त्याच्या मांडीवर तसेच पार्श्वभागात चाकू भोसकला. यात यश गंभीर जखमी झाला. त्याला अगोदर मेयो इस्पितळात नेण्यात आले. त्यानंतर त्याच्या कुटुंबियांना या घटनेची माहिती देण्यात आली. त्याच्या कुटुंबियांनी विचारणा केली असता त्याने आरोपींची नावे सांगितली. त्याला उपचारासाठी मेडिकलमध्ये नेण्यात आले असता त्याचा मृत्यू झाला. त्याचे वडील विष्णू यांच्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस दोन्ही आरोपींचा शोध घेत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर