शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

सीएबी विधेयकामुळे संविधानाच्या तत्वांना आघात : गणेश देवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 00:11 IST

मोदी सरकार अर्थव्यवस्थेतील भयंकर अपयशापासून लक्ष विचलित करण्यासाठी देश पेटवत असल्याचा घणाघाती आरोप ज्येष्ठ विचारवंत डॉ. गणेश देवी यांनी केला.

ठळक मुद्देनागरिकत्त्व सुधारणा कायद्याविरोधात नागपुरातही आंदोलन

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : धर्म जोडण्यासाठी असतो, विभागण्यासाठी नाही. धर्माचे राजकारण करण्याला संविधान परवानगी देत नाही. मात्र धर्माच्या नावावर समाजाचे विभाजन करण्याचे षडयंत्र मनात ठेवून केंद्र सरकारने नागरिकत्त्व सुधारणा विधेयक (सीएबी) आणि नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन (एनआरसी) हे कायदे आणले आहेत. हे विधेयक संविधान विरोधी असून संविधानाच्या मूळ तत्वांना आघात पोहचविणारे आहेत. मोदी सरकार अर्थव्यवस्थेतील भयंकर अपयशापासून लक्ष विचलित करण्यासाठी देश पेटवत असल्याचा घणाघाती आरोप ज्येष्ठ विचारवंत डॉ. गणेश देवी यांनी केला.नागरिकात्व सुधारणा विधेयक तसेच एनआरसीविरोधात आसाम व दिल्लीनंतर संपूर्ण देशात आंदोलनाचे लोन पसरत चालले आहेत. सोमवारी विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नागपुरातही राष्ट्र सेवा दल, दक्षिणायन, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, आम आदमी पार्टी, जामिया संघटना व सर्व सेवा संघ अशा विविध संघटनांनी मिळून सीएबी विरोधात आंदोलन केले. कॉटन मार्केट परिसरातील महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांसमोर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी डॉ. देवी यांनी केंद्र सरकारवर हल्ला चढविला. याप्रसंगी प्रभू राजगडकर, अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील, अमिताभ पावडे, प्रज्ज्वला तट्टे, अतुल देशमुख, राजेंद्र झाडे, जगजित सिंह, शालिनी अरोरा, सविता सिंघल, रत्ना ढोरे, नरेंद्र पालांदूरकर, संजय बोंडे, सर्व सेवा संघाचे विद्रोही आदी प्रमुख विचारकांसह सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक वर्ग आणि विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी डॉ. देवी यांच्या नेतृत्वात उपस्थित सर्वांनी नागरिकत्त्व सिद्ध करण्यासाठी कुठलेही कागदपत्र सादर न करण्याची शपथ घेतली. अविनाश पाटील यांनीही केंद्र सरकारला लक्ष्य केले. धर्माच्या नावावर समाजाचे विभाजन करण्याचे काम सरकार करीत आहे. आपण सर्वांनी एकत्र राहून त्यांचे षडयंत्र हानून पाडू, भारतीय एकता धर्मनिरपेक्ष आहे, हे त्यांना दाखवून द्यावे लागेल, अशी भावना त्यांनी मांडली. इतर विचारवंतांनीही आपले विचार व्यक्त करीत सीएबी विरोधात भावना मांडल्या. १९ ला देशव्यापी आंदोलननागरिकत्त्व सुधारणा विधेयकाविरोधात देशभरात आंदोलन केले जाणार आहे. यादिवशी नागपुरातही कॉटन मार्केट परिसरात याच स्थळी उपस्थित राहून देशव्यापी आंदोलनाचा भाग होणार असल्याचे अमिताभ पावडे यांनी सांगितले. नागरिकांनी संविधानविरोधी विधेयकाविरोधात उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकagitationआंदोलन