शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

सीएबी विधेयकामुळे संविधानाच्या तत्वांना आघात : गणेश देवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 00:11 IST

मोदी सरकार अर्थव्यवस्थेतील भयंकर अपयशापासून लक्ष विचलित करण्यासाठी देश पेटवत असल्याचा घणाघाती आरोप ज्येष्ठ विचारवंत डॉ. गणेश देवी यांनी केला.

ठळक मुद्देनागरिकत्त्व सुधारणा कायद्याविरोधात नागपुरातही आंदोलन

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : धर्म जोडण्यासाठी असतो, विभागण्यासाठी नाही. धर्माचे राजकारण करण्याला संविधान परवानगी देत नाही. मात्र धर्माच्या नावावर समाजाचे विभाजन करण्याचे षडयंत्र मनात ठेवून केंद्र सरकारने नागरिकत्त्व सुधारणा विधेयक (सीएबी) आणि नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन (एनआरसी) हे कायदे आणले आहेत. हे विधेयक संविधान विरोधी असून संविधानाच्या मूळ तत्वांना आघात पोहचविणारे आहेत. मोदी सरकार अर्थव्यवस्थेतील भयंकर अपयशापासून लक्ष विचलित करण्यासाठी देश पेटवत असल्याचा घणाघाती आरोप ज्येष्ठ विचारवंत डॉ. गणेश देवी यांनी केला.नागरिकात्व सुधारणा विधेयक तसेच एनआरसीविरोधात आसाम व दिल्लीनंतर संपूर्ण देशात आंदोलनाचे लोन पसरत चालले आहेत. सोमवारी विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नागपुरातही राष्ट्र सेवा दल, दक्षिणायन, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, आम आदमी पार्टी, जामिया संघटना व सर्व सेवा संघ अशा विविध संघटनांनी मिळून सीएबी विरोधात आंदोलन केले. कॉटन मार्केट परिसरातील महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांसमोर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी डॉ. देवी यांनी केंद्र सरकारवर हल्ला चढविला. याप्रसंगी प्रभू राजगडकर, अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील, अमिताभ पावडे, प्रज्ज्वला तट्टे, अतुल देशमुख, राजेंद्र झाडे, जगजित सिंह, शालिनी अरोरा, सविता सिंघल, रत्ना ढोरे, नरेंद्र पालांदूरकर, संजय बोंडे, सर्व सेवा संघाचे विद्रोही आदी प्रमुख विचारकांसह सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक वर्ग आणि विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी डॉ. देवी यांच्या नेतृत्वात उपस्थित सर्वांनी नागरिकत्त्व सिद्ध करण्यासाठी कुठलेही कागदपत्र सादर न करण्याची शपथ घेतली. अविनाश पाटील यांनीही केंद्र सरकारला लक्ष्य केले. धर्माच्या नावावर समाजाचे विभाजन करण्याचे काम सरकार करीत आहे. आपण सर्वांनी एकत्र राहून त्यांचे षडयंत्र हानून पाडू, भारतीय एकता धर्मनिरपेक्ष आहे, हे त्यांना दाखवून द्यावे लागेल, अशी भावना त्यांनी मांडली. इतर विचारवंतांनीही आपले विचार व्यक्त करीत सीएबी विरोधात भावना मांडल्या. १९ ला देशव्यापी आंदोलननागरिकत्त्व सुधारणा विधेयकाविरोधात देशभरात आंदोलन केले जाणार आहे. यादिवशी नागपुरातही कॉटन मार्केट परिसरात याच स्थळी उपस्थित राहून देशव्यापी आंदोलनाचा भाग होणार असल्याचे अमिताभ पावडे यांनी सांगितले. नागरिकांनी संविधानविरोधी विधेयकाविरोधात उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकagitationआंदोलन