शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सीए अर्थव्यवस्थेचे संरक्षक आणि भागीदार, पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल यांचे मत 

By मोरेश्वर मानापुरे | Updated: March 9, 2024 16:55 IST

पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल ; नवीन पात्र सीएंसोबत संवाद सत्र.

मोरेश्वर मानापुरे , नागपूर : सीए हे अर्थव्यवस्थेचा कणा, सुरक्षेचे भागीदार आणि आर्थिक गुन्हे रोखणारे संरक्षक असल्याचे मत पोलीस आयुक्त रवींद्र सिंघटल यांनी येथे केले.आयसीएआयच्या नागपूर सीए शाखेतर्फे नवीन पात्र सीएंसोबत संवाद सत्राचे आयोजन चिटणवीस सेंटर, सिव्हिल लाइन्स येथे करण्यात आले. मुख्य अतिथी म्हणून सिंघल यांनी नवीन सीएंचे अभिनंदन करून त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी आयसीएआयचे माजी अध्यक्ष सीए जयदीप शहा आणि नागपूर सीए संस्थेचे अध्यक्ष सीए अक्षय गुल्हाने उपस्थित होते.

सिंघल म्हणाले, सीए हा नैतिक व्यवसाय आहे. ते राष्ट्रीय उभारणीचे भागीदार असून सरकार आणि नागरिक यांच्यामध्ये सेतूचे काम करतात. कोर्स पूर्ण करण्यासाठी खूप संयम आणि चिकाटी आवश्यक आहे. एकदा पात्र झाला तर आकाशही मर्यादा नसते. जयदीप शहा म्हणाले, सीएंनी जीवनात यशस्वी होण्यासाठी आपले कौशल्य आणि ज्ञान अद्ययावत करत राहावे.

सीए अक्षय गुल्हाणे म्हणाले, यशाचा आनंद साजरा करताना आई-वडिलांचा त्याग विसरू नये. त्यांनी सर्व नवीन पात्र चार्टर्ड अकाउंटंट्सचे अभिनंदन केले आणि भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सतत ज्ञान अद्ययावत करण्यासाठी संस्थेच्या भविष्यातील कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची प्रेरणा दिली. प्रादेशिक परिषद सदस्य सीए अभिजीत केळकर यांनी आता खरी शिकण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि नवीन पात्र सदस्यांसमोर मोठी आव्हाने आहेत. या प्रसंगी ज्येष्ठ सीए अनिरुद्ध शेणवई, सीए गिरीश वझलवार, सीए सुधीर सुराणा, सीए अश्विनी एस अग्रवाल, सीए राजेश अग्रवाल, सीए चारुदत्त मराठे, सीए रमेश शहा, सीए नारायण डेंबले, सीए हेमंत लोढा उपस्थित होते.

संचालन उपाध्यक्ष सीए दिनेश राठी यांनी केले. शाखा सचिव सीए स्वरूपा वझलवार यांनी आभार मानले. कोषाध्यक्ष सीए दीपक जेठवानी, डब्ल्यूआयसीएएसए अध्यक्ष सीए तृप्ती भट्टड, माजी अध्यक्ष सीए संजय एम. अग्रवाल, सीए जितेन जितेंद्र सागलानी, नवीन पात्र सीए आणि त्यांचे पालक उपस्थित होते.

टॅग्स :nagpurनागपूर