शहरं
Join us  
Trending Stories
1
छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
6
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
7
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
8
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
9
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
10
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
11
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
12
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
13
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
14
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
15
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
16
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
17
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
18
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
19
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
20
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
Daily Top 2Weekly Top 5

बीवीजीला दंड, जानेवारीच्या बिलमध्ये कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:56 IST

लोकमत इम्पॅक्ट लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अचानक ११३ कर्मचाऱ्यांना काढून टाकल्याने बीवीजीच्या कर्मचाऱ्यांनी काम करणे बंद केले. त्यामुळे ...

लोकमत इम्पॅक्ट

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : अचानक ११३ कर्मचाऱ्यांना काढून टाकल्याने बीवीजीच्या कर्मचाऱ्यांनी काम करणे बंद केले. त्यामुळे अर्ध्या शहरातील कचरा संकलन तीन दिवस पूर्णपणे ठप्प राहिले. परिस्थती रुळावर यायला आठवड्यापेक्षा अधिक वेळ लागला. यामुळे मनपा प्रशासनाला रोषणाला सामोरे जावे लागले. नागरिकांनाही मोठी अडचण सहन करावी लागली. या कारणाने घनकचरा व्यवस्थापन विभागाने कंपनीविरुद्ध अधिकाधिक दंडाची तरतूद केली आहे.

जानेवारीत कंपनीचे जे काही बिल तयार होईल, त्यातून १० टक्के रक्कम कपात करण्याचा प्रस्ताव घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून आयुक्तांना पाठवण्यात आला आहे. कारण मोठ्या प्रमाणावर दंडात्मक कारवाईचे अधिकार आयुक्तांकडे सुरक्षित आहेत. लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. दर महिन्याला जवळपास ५ कोटी रुपयांचे कचरा संकलनाचे बिल तयार होते. शहरात दोन कंपन्या आहेत. एका कंपनीला म्हणजेच २.५० कोटी रुपयाचे बिल बीवीजीचे निघते. अशा परिस्थितीत २५ लाख रुपयांच्या जवळपास दंड लागण्याची शक्यता आहे.

शहरातील कचरा संकलनाची व्यवस्था अधिक चांगली व्हावी, यासाठी दोन कचरा संकलन कंपनी तैनात करण्यात आली. नोव्हेंबर २०१९ मध्ये त्यांना काम देण्यात आले.ंझोन १ ते झोन ५ची जबाबदारी एजी एन्व्हायरो कंपनीला तर झोन ६ ते झोन १०ची जबाबदारी बीवीजी कंपनीला देण्यात आली.ंपरंतु १३ महिन्यात ७ ते ८ वेळा दोन्ही कंपन्यांतील कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. लहान लहान विषयावर काम बंद करण्याची प्रथा सुरुवातीपासूनच आहे. यामुळे कंपनीचे कामच समाधानकारक नाही, हे दिसून येते. एजी एन्वायरो कंपनीला १९५० रुपये प्रति टन आणि बीवीजी कंपनीला १८०० रुपये प्रति टन मनपा देत आहे. परंतु त्यामानाने काम होत नाही आहे. एजी एन्वायरो कंपनीनेही लॉकडाऊनच्या नावावर १२३ कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले.

बॉक्स

कर्मचाऱ्यांच्या परतण्यावरही शंका

बीवीजीने ज्या ११३ कर्मचाऱ्यांना कामावरून काढले. त्याबाबतची स्थिती स्पष्ट करण्यात यावी, असे मनपा प्रशासनातर्फे कंपनीला सांगण्यात आले आहे. परंतु कंपनी गोलमाल उत्तर देत आहे. त्यामुळे कर्मचारी परत येतील की नाही, हे स्पष्ट होत नाही आहे.