शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

नागपूर जिल्ह्यातल्या डेगमा गावात पाच वर्षांनी बससेवा पुन्हा सुरू; ग्रामस्थांचा आनंदोत्सव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 10:43 IST

पाच वर्षांनंतर गावात एसटी बस पोहोचली अन् ग्रामस्थांच्या आनंदाला उधाण आले. हे वास्तव आहे हिंगणा तालुक्यातील डेगमा (बु.) या गावातील.

ठळक मुद्देपुरेसे प्रवासी मिळत नसल्याने बससेवा बंद होती

आॅनलाईन लोकमतनागपूर: गावात येणारी राज्य परिवहन महामंडळाची बस अचानक पाच वर्षांपूर्वी बंद झाली. त्यामुळे गावातून बाहेरगावी शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसोबतच इतर कामासाठी जाणाऱ्या नागरिकांना खासगी वाहनांचाच आधार घ्यावा लागत. ही बाब लक्षात घेता बस सुरू करावी, अशी मागणी नागरिकांनी लावून धरली. अखेर पाच वर्षांनंतर गावात एसटी बस पोहोचली अन् ग्रामस्थांच्या आनंदाला उधाण आले. हे वास्तव आहे हिंगणा तालुक्यातील डेगमा (बु.) या गावातील.डेगमा येथे साधारणत: पाच वर्षांपूर्वीपर्यंत एसटी महामंडळाची बस येत होती. मात्र प्रवासी पुरेसे मिळत नसल्याने तोट्यात असलेली बसफेरी एसटी महामंडळाने बंद केली. परिणामी एसटी बसफेरी बंद होताच विद्यार्थ्यांसोबतच नागरिकांना इतर कामासाठी बाहेरगावी जाण्यासाठी पायपीट करण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यासाठी खासगी वाहनांचा आधारही घेतला जात.दुसरीकडे एसटी बसफेरी बंद होताच या भागात अवैध प्रवासी वाहतुकीला सुगीचे दिवस आले. गावातून दुसऱ्या गावात जाण्यासाठी नागरिकांना बऱ्याचदा कितीतरी वेळ बसून राहावे लागत अन्यथा पायीवारी करावी लागत.ही अडचण लक्षात घेता नागरिकांनी बसफेरी पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली. त्या मागणीबाबत जिल्हा परिषद सदस्य उज्ज्वला बोढारे यांनी एसटी महामंडळाशी पत्रव्यवहार केला.त्या मागणीचा पाठपुरावा केला. त्यानंतर अखेर सोमवार (दि. ३०)पासून बसफेरी सुरू करण्यात आली. गावात सोमवारी बसफेरी पोहोचताच ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला. सकाळी १० व सायंकाळी ५ वाजता अशा दोन बसफेऱ्या डेगमासाठी सुरू करण्यात आल्या आहेत. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे.डेगमा मार्गावर कोकर्डी, माथनी ही गावे असून बसफेरी सुरू झाल्याने डेगमासोबतच या दोन्ही गावातील विद्यार्थ्यांना, नागरिकांना फायदा होईल. त्यामुळे प्रत्येक बसफेरीसाठी आवश्यक अशी प्रवासीसंख्या मिळून बसफेरी नियमित सुरू राहील, असा विश्वास जिल्हा परिषद सदस्य उज्ज्वला बोढारे यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)

तर बसफेरी सुरू राहील!डेगमा येथील बसफेरी कमी प्रवासीसंख्येमुळे बंद करण्यात आली होती. नागरिकांची मागणी लक्षात घेता पुन्हा दोन बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या. या बसफेरीला पुरेसे प्रवासी मिळाले तर बसफेरी कायम सुरू राहील.- सुधीर पंचभाई,विभागीय नियंत्रक,राज्य परिवहन महामंडळ

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ