शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

नागपूर जिल्ह्यातल्या डेगमा गावात पाच वर्षांनी बससेवा पुन्हा सुरू; ग्रामस्थांचा आनंदोत्सव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 10:43 IST

पाच वर्षांनंतर गावात एसटी बस पोहोचली अन् ग्रामस्थांच्या आनंदाला उधाण आले. हे वास्तव आहे हिंगणा तालुक्यातील डेगमा (बु.) या गावातील.

ठळक मुद्देपुरेसे प्रवासी मिळत नसल्याने बससेवा बंद होती

आॅनलाईन लोकमतनागपूर: गावात येणारी राज्य परिवहन महामंडळाची बस अचानक पाच वर्षांपूर्वी बंद झाली. त्यामुळे गावातून बाहेरगावी शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसोबतच इतर कामासाठी जाणाऱ्या नागरिकांना खासगी वाहनांचाच आधार घ्यावा लागत. ही बाब लक्षात घेता बस सुरू करावी, अशी मागणी नागरिकांनी लावून धरली. अखेर पाच वर्षांनंतर गावात एसटी बस पोहोचली अन् ग्रामस्थांच्या आनंदाला उधाण आले. हे वास्तव आहे हिंगणा तालुक्यातील डेगमा (बु.) या गावातील.डेगमा येथे साधारणत: पाच वर्षांपूर्वीपर्यंत एसटी महामंडळाची बस येत होती. मात्र प्रवासी पुरेसे मिळत नसल्याने तोट्यात असलेली बसफेरी एसटी महामंडळाने बंद केली. परिणामी एसटी बसफेरी बंद होताच विद्यार्थ्यांसोबतच नागरिकांना इतर कामासाठी बाहेरगावी जाण्यासाठी पायपीट करण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यासाठी खासगी वाहनांचा आधारही घेतला जात.दुसरीकडे एसटी बसफेरी बंद होताच या भागात अवैध प्रवासी वाहतुकीला सुगीचे दिवस आले. गावातून दुसऱ्या गावात जाण्यासाठी नागरिकांना बऱ्याचदा कितीतरी वेळ बसून राहावे लागत अन्यथा पायीवारी करावी लागत.ही अडचण लक्षात घेता नागरिकांनी बसफेरी पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली. त्या मागणीबाबत जिल्हा परिषद सदस्य उज्ज्वला बोढारे यांनी एसटी महामंडळाशी पत्रव्यवहार केला.त्या मागणीचा पाठपुरावा केला. त्यानंतर अखेर सोमवार (दि. ३०)पासून बसफेरी सुरू करण्यात आली. गावात सोमवारी बसफेरी पोहोचताच ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला. सकाळी १० व सायंकाळी ५ वाजता अशा दोन बसफेऱ्या डेगमासाठी सुरू करण्यात आल्या आहेत. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे.डेगमा मार्गावर कोकर्डी, माथनी ही गावे असून बसफेरी सुरू झाल्याने डेगमासोबतच या दोन्ही गावातील विद्यार्थ्यांना, नागरिकांना फायदा होईल. त्यामुळे प्रत्येक बसफेरीसाठी आवश्यक अशी प्रवासीसंख्या मिळून बसफेरी नियमित सुरू राहील, असा विश्वास जिल्हा परिषद सदस्य उज्ज्वला बोढारे यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)

तर बसफेरी सुरू राहील!डेगमा येथील बसफेरी कमी प्रवासीसंख्येमुळे बंद करण्यात आली होती. नागरिकांची मागणी लक्षात घेता पुन्हा दोन बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या. या बसफेरीला पुरेसे प्रवासी मिळाले तर बसफेरी कायम सुरू राहील.- सुधीर पंचभाई,विभागीय नियंत्रक,राज्य परिवहन महामंडळ

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ