शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

सरकारच्या भूमिकेपेक्षा नोकरशाहीने भूमिका बदलावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 11:29 IST

उद्याची स्थिती भयावह दिसायला लागल्याने कामगारांचे जत्थे आज संचारबंदी मोडून गावाकडे निघाले आहेत. सरकारच्या भूमिकेपेक्षा नोकरशाहीची भूमिका वेगळी असून ती बदलावी, अशी अपेक्षा डॉ. हरीश धुरट यांनी व्यक्त केली.

गोपालकृष्ण मांडवकरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उद्याची स्थिती भयावह दिसायला लागल्याने कामगारांचे जत्थे आज संचारबंदी मोडून गावाकडे निघाले आहेत. सरकारच्या भूमिकेपेक्षा नोकरशाहीची भूमिका वेगळी असून ती बदलावी, अशी अपेक्षा डॉ. हरीश धुरट यांनी व्यक्त केली.ते म्हणाले,जीवनावश्यक वस्तूच्या क्षेत्रात हमाल कामगारांनी कोणत्याही परिस्थितीत काम करावे, अशी अट आहे तर सध्याच्या लॉकडाऊन व संचारबंदीच्या दिवसात पाचपेक्षा अधिक लोकांनी एकत्र येऊ नये असे बंधन आहे. जीवनावश्यक वस्तू अंतर्गत येणारे धान्य ट्रक, रेल्वेमधून उतरविण्यासाठी ५० ते १०० वर मजुरांची गरज पडते, ही वस्तुस्थिती आहे. या दिवसात व्यापारी आणि कारखानदार प्रशासनाने दिलेल्या परवानगीचा दुरुपयोग करीत आहेत. नागपूर शहरातील दोन औद्योगिक प्रतिष्ठानांमध्ये असे प्रकार घडले. माथाडी कामगारांना डावलून अन्य मजूर आणून माल उरतविला गेला. या दिवसात असे घडत असेल तर, अन्यायकारक आहे.कामगारांच्या स्थलांतराची वाईट अवस्था आहे. लॉकडाऊन होताच अनेक कारखानदार, ठेकेदारांनी देणेघेणे नसल्यासारखे कामगारांना बाहेर काढले. त्यामुळे मजूर गावाकडे निघाले. रस्त्यावर आले. त्यांची व्यवस्था सरकारने संबंधित यंत्रणेच्या माध्यमातूनच करायला हवी होती. मात्र त्या आधीच या कामगारांना बाहेर काढले गेले. १५ दिवस काम मिळाले नाही तर जगायचे कसे, हा त्यांच्यापुढचा प्रश्न आहे.देशतील स्थिती पहिल्यांदाच विपरीतडॉ. धुरट म्हणाले, आजची देशतील स्थिती पाहिल्यावर एवढी भीती यापूर्वी कधीच वाटली नाही. प्लेगच्या वेळी १९२० मध्ये भारत, भूतान, ब्रह्मदेश, पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश मिळून १५० कोटी जनता होती. त्यातील ५० कोटी जनतेला प्लेगची लागण झाली. एकाच आठवड्यात ५ कोटी मेले. त्यानंतर मुंबईत स्वतंत्र रुग्णालय उघडले. प्लेगनंतर कॉलरा कोलकतामधून आला व देशभर पसरला. अनेकजण बिना औषधाने मेले. लिप्टन कंपनी आल्यावर यावर औषध मिळाले. स्वाईन फ्लू तर यापेक्षाही वाईट होता. पण या वेळी तर भयावह चित्र आहे. कोरोनामुळे भूकबळीने मरणाऱ्यांच्या धोका अधिक आहे. हातावर पोट असणाऱ्यांनी कसे जगावे, यावर मानवी दृष्टीने उत्तर आजतरी सापडत नाही

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस