शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

सरकारच्या भूमिकेपेक्षा नोकरशाहीने भूमिका बदलावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 11:29 IST

उद्याची स्थिती भयावह दिसायला लागल्याने कामगारांचे जत्थे आज संचारबंदी मोडून गावाकडे निघाले आहेत. सरकारच्या भूमिकेपेक्षा नोकरशाहीची भूमिका वेगळी असून ती बदलावी, अशी अपेक्षा डॉ. हरीश धुरट यांनी व्यक्त केली.

गोपालकृष्ण मांडवकरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उद्याची स्थिती भयावह दिसायला लागल्याने कामगारांचे जत्थे आज संचारबंदी मोडून गावाकडे निघाले आहेत. सरकारच्या भूमिकेपेक्षा नोकरशाहीची भूमिका वेगळी असून ती बदलावी, अशी अपेक्षा डॉ. हरीश धुरट यांनी व्यक्त केली.ते म्हणाले,जीवनावश्यक वस्तूच्या क्षेत्रात हमाल कामगारांनी कोणत्याही परिस्थितीत काम करावे, अशी अट आहे तर सध्याच्या लॉकडाऊन व संचारबंदीच्या दिवसात पाचपेक्षा अधिक लोकांनी एकत्र येऊ नये असे बंधन आहे. जीवनावश्यक वस्तू अंतर्गत येणारे धान्य ट्रक, रेल्वेमधून उतरविण्यासाठी ५० ते १०० वर मजुरांची गरज पडते, ही वस्तुस्थिती आहे. या दिवसात व्यापारी आणि कारखानदार प्रशासनाने दिलेल्या परवानगीचा दुरुपयोग करीत आहेत. नागपूर शहरातील दोन औद्योगिक प्रतिष्ठानांमध्ये असे प्रकार घडले. माथाडी कामगारांना डावलून अन्य मजूर आणून माल उरतविला गेला. या दिवसात असे घडत असेल तर, अन्यायकारक आहे.कामगारांच्या स्थलांतराची वाईट अवस्था आहे. लॉकडाऊन होताच अनेक कारखानदार, ठेकेदारांनी देणेघेणे नसल्यासारखे कामगारांना बाहेर काढले. त्यामुळे मजूर गावाकडे निघाले. रस्त्यावर आले. त्यांची व्यवस्था सरकारने संबंधित यंत्रणेच्या माध्यमातूनच करायला हवी होती. मात्र त्या आधीच या कामगारांना बाहेर काढले गेले. १५ दिवस काम मिळाले नाही तर जगायचे कसे, हा त्यांच्यापुढचा प्रश्न आहे.देशतील स्थिती पहिल्यांदाच विपरीतडॉ. धुरट म्हणाले, आजची देशतील स्थिती पाहिल्यावर एवढी भीती यापूर्वी कधीच वाटली नाही. प्लेगच्या वेळी १९२० मध्ये भारत, भूतान, ब्रह्मदेश, पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश मिळून १५० कोटी जनता होती. त्यातील ५० कोटी जनतेला प्लेगची लागण झाली. एकाच आठवड्यात ५ कोटी मेले. त्यानंतर मुंबईत स्वतंत्र रुग्णालय उघडले. प्लेगनंतर कॉलरा कोलकतामधून आला व देशभर पसरला. अनेकजण बिना औषधाने मेले. लिप्टन कंपनी आल्यावर यावर औषध मिळाले. स्वाईन फ्लू तर यापेक्षाही वाईट होता. पण या वेळी तर भयावह चित्र आहे. कोरोनामुळे भूकबळीने मरणाऱ्यांच्या धोका अधिक आहे. हातावर पोट असणाऱ्यांनी कसे जगावे, यावर मानवी दृष्टीने उत्तर आजतरी सापडत नाही

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस