शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

सरकारच्या भूमिकेपेक्षा नोकरशाहीने भूमिका बदलावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 11:29 IST

उद्याची स्थिती भयावह दिसायला लागल्याने कामगारांचे जत्थे आज संचारबंदी मोडून गावाकडे निघाले आहेत. सरकारच्या भूमिकेपेक्षा नोकरशाहीची भूमिका वेगळी असून ती बदलावी, अशी अपेक्षा डॉ. हरीश धुरट यांनी व्यक्त केली.

गोपालकृष्ण मांडवकरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उद्याची स्थिती भयावह दिसायला लागल्याने कामगारांचे जत्थे आज संचारबंदी मोडून गावाकडे निघाले आहेत. सरकारच्या भूमिकेपेक्षा नोकरशाहीची भूमिका वेगळी असून ती बदलावी, अशी अपेक्षा डॉ. हरीश धुरट यांनी व्यक्त केली.ते म्हणाले,जीवनावश्यक वस्तूच्या क्षेत्रात हमाल कामगारांनी कोणत्याही परिस्थितीत काम करावे, अशी अट आहे तर सध्याच्या लॉकडाऊन व संचारबंदीच्या दिवसात पाचपेक्षा अधिक लोकांनी एकत्र येऊ नये असे बंधन आहे. जीवनावश्यक वस्तू अंतर्गत येणारे धान्य ट्रक, रेल्वेमधून उतरविण्यासाठी ५० ते १०० वर मजुरांची गरज पडते, ही वस्तुस्थिती आहे. या दिवसात व्यापारी आणि कारखानदार प्रशासनाने दिलेल्या परवानगीचा दुरुपयोग करीत आहेत. नागपूर शहरातील दोन औद्योगिक प्रतिष्ठानांमध्ये असे प्रकार घडले. माथाडी कामगारांना डावलून अन्य मजूर आणून माल उरतविला गेला. या दिवसात असे घडत असेल तर, अन्यायकारक आहे.कामगारांच्या स्थलांतराची वाईट अवस्था आहे. लॉकडाऊन होताच अनेक कारखानदार, ठेकेदारांनी देणेघेणे नसल्यासारखे कामगारांना बाहेर काढले. त्यामुळे मजूर गावाकडे निघाले. रस्त्यावर आले. त्यांची व्यवस्था सरकारने संबंधित यंत्रणेच्या माध्यमातूनच करायला हवी होती. मात्र त्या आधीच या कामगारांना बाहेर काढले गेले. १५ दिवस काम मिळाले नाही तर जगायचे कसे, हा त्यांच्यापुढचा प्रश्न आहे.देशतील स्थिती पहिल्यांदाच विपरीतडॉ. धुरट म्हणाले, आजची देशतील स्थिती पाहिल्यावर एवढी भीती यापूर्वी कधीच वाटली नाही. प्लेगच्या वेळी १९२० मध्ये भारत, भूतान, ब्रह्मदेश, पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश मिळून १५० कोटी जनता होती. त्यातील ५० कोटी जनतेला प्लेगची लागण झाली. एकाच आठवड्यात ५ कोटी मेले. त्यानंतर मुंबईत स्वतंत्र रुग्णालय उघडले. प्लेगनंतर कॉलरा कोलकतामधून आला व देशभर पसरला. अनेकजण बिना औषधाने मेले. लिप्टन कंपनी आल्यावर यावर औषध मिळाले. स्वाईन फ्लू तर यापेक्षाही वाईट होता. पण या वेळी तर भयावह चित्र आहे. कोरोनामुळे भूकबळीने मरणाऱ्यांच्या धोका अधिक आहे. हातावर पोट असणाऱ्यांनी कसे जगावे, यावर मानवी दृष्टीने उत्तर आजतरी सापडत नाही

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस