शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

म्हाडा कॉलनीवर गुंडांचा हल्ला

By admin | Updated: May 21, 2015 02:18 IST

उत्तर नागपुरातील कुख्यात गुंड ‘यावा’चा मुलगा औरभ आणि कुटुंबीयांनी जरीपटका येथील म्हाडा कॉलनीवर हल्ला करून दहशत पसरवली.

नागपूर : उत्तर नागपुरातील कुख्यात गुंड ‘यावा’चा मुलगा औरभ आणि कुटुंबीयांनी जरीपटका येथील म्हाडा कॉलनीवर हल्ला करून दहशत पसरवली. शस्त्रांनी सज्ज यावाचा मुलगा व पुतण्याने एक डझनपेक्षा अधिक घरांवर हल्ला करून सामानांची व वाहनांची तोडफोड केली. महिला व पुरुषांना घरात घुसून मारहाण केली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. गुन्हेगारांशी संगनमत असल्याने पोलिसांनी या घटनेला गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे २४ तास उलटूनही आरोपी मोकाट आहेत. कुख्यात यावा याचा टेका नाका येथे जुगार अड्डा आहे. १५ दिवसांपूर्वी डीसीपी झोन चारच्या चमूने येथे धाड टाकली होती. म्हाडा कॉलनी येथील २७ वर्षीय संतोष यादव सोमवारी रात्री ९.३० वाजता त्याचा मित्र प्रकाश आणि मंजीतसोबत टेका नाका येथील पिंटूच्या पानटपरीवर गेला होता. तिथे यावाचा मुलगा व भाऊसुद्धा आला होता. त्यांनी संतोषच्या मित्रांना धक्का दिला होता. धक्का देण्याचे कारण विचारले असता दोघेही काहीही न बोलता निघून गेले होते. त्यानंतर संतोषही आपल्या घरी परत आला. रात्री १०.३० वजता यावाचा मुलगा, भाऊ आणि पुतण्या तसेच २० ते २५ साथीदार शस्त्रांसह म्हाडा कॉलनी येथे आले. त्यांनी घरासमोर असलेल्या संतोषच्या मित्राच्या स्वीप्ट कारची तोडफोड केली. यानंतर बानोरकर नावाच्या महिलेच्या घरात घुसून सामान व वाहनांची तोडफोड केली. शेख आरीफ यांच्याही घरातील सामानांची व वाहनांची तोडफोड केली. त्यांच्या घरासमोर असलेली इनोव्हा गाडीची तोडफोड केली. संतोष यादवच्या घरावरही हल्ला करून तोडफोड केली. हल्लेखोरांनी डझनभर घरांवर हल्ला केला. अर्धा तास ही तोडफोड सुरू होती. आरोपी नागरिकांना जीवे मारण्याची धमकी देऊन फरार झाले. पीएसआय योगिता श्रीखंडे यांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. यावाची मुले व भाऊ गुन्हेगार आहेत. वर्षभरापूर्वीच यावाच्या मुलाने जुगार अड्ड्याची तक्रार केल्यामुळे तीन तरुणांवर खुनी हल्ला केला होता. यानंतर अनेकदा त्याच्याविरुद्ध तक्रारी आल्या परंतु पोलिसांनी त्या सर्व दाबून ठेवल्या. यावाच्या जुगार अड्ड्याची माहिती आहे. हा हल्ला सुद्धा जुगार अड्ड्यासाठीच झाला. परंतु मागील काही दिवसांपासून जरीपटका परिसरात सुरू असलेल्या अराजकतेमुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (प्रतिनिधी)पोलिसांची भीती संपली यावाचे कुटुंबीय २० ते २५ साथीदारांसोबत शस्त्रांनी सज्ज होऊन टेका नाकावरून म्हाडा कॉलनीपर्यंत येऊन एखाद्या वस्तीवर हल्ला करतात आणि संपूर्ण वस्तीला धमकी देऊन परत जातात. यावरून त्यांची हिम्मत लक्षात घेता पोलिसांची कुठलीही भीती त्यांना राहिलेली नसल्याचे दिसून येते. तसेच पोलीस आयुक्त बदलल्यानंतरही शहरातील गुन्ेहगारीची परिस्थिती मात्र बदललेली नाही, हे स्पष्ट होते.