शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

Buldhana Bus Accident : नातेवाईकांचा आक्रोश, जिवलगांची स्थिती जाणून घेण्यासाठी घटनास्थळाकडे धाव!

By योगेश पांडे | Updated: July 1, 2023 09:51 IST

कुणाची होती पहिलीच नोकरी तर कुणाचा होता प्रवेश

नागपूर : सिंदखेडराजाजवळ विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसच्या अपघातानंतर जिवलगांचे काय झाले असेल या विचाराने नातेवाईकांचा आक्रोश सुरू आहे. वर्धा व नागपूर जिल्ह्यातील बहुतांश प्रवासी असून ज्यांना माहिती कळाली त्यांच्या नातेवाईकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली आहे. आपल्या घरातील व्यक्ती नेमकी कशी आहे याचे नेमके उत्तर मिळत नसल्याने ते हवालदील झाले आहेत.

‘लोकमत’ला एमएच २९ बीई १८१९ या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची यादी प्राप्त झाली आहे. यातील प्रत्येक क्रमांकावर संपर्क केला असता बहुतांश क्रमांक बंद किंवा आऊट ऑफ रिच असल्याचे दर्शवत होते. ज्या क्रमांकांवर संपर्क झाला ते प्रवाशांच्या नातेवाईकांचेच होते. सर्वच नातेवाईकांनी ते घटनास्थळाकडे निघाले असल्याची माहिती दिली व त्यांच्या जिवलगांची स्थिती नेमकी कशी आहे याचीच ते विचारणा करत होते. जे लोक या अपघातातून बचावले आहेत, त्यांची यादी प्रशासनाकडून जाहीर न झाल्यामुळे घालमेल आणखी वाढली होती.

बहुतांश प्रवासी तरुणचदुर्दैवाची बाब म्हणजे या बसमध्ये बहुतांश प्रवासी तरुण विद्यार्थी किंवा नोकरदारच होते. ते पुण्याला नोकरीसाठी किंवा प्रवेशासाठी जात होते. वर्धा येथील तनिषा या विद्यार्थिनीला तर बारावीनंतर फर्ग्युसनसारख्या मोठ्या महाविद्यालयात प्रवेशाची संधी मिळाली होती व त्यासाठीच ती जात होती. तिची बहीण पुण्याला तिची प्रतिक्षा करत असतानाच अपघाताची वाईट बातमी धडकली. आपली बहीण नेमकी कशी आहे व कुठल्या दवाखान्यात दाखल आहे याचीच माहिती तिच्याकडून घेण्यात येत आहे. तर वर्धा येथील एका कुटुंबातील होतकरू विद्यार्थी तेजस हा पहिल्या नोकरीसाठी पुण्याला निघाला होता. त्याचे नातेवाईकदेखील घटनास्थळाकडे निघाले आहे.

टॅग्स :AccidentअपघातbuldhanaबुलडाणाSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग