शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
2
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
3
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
4
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
5
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
6
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
7
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
8
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
9
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
10
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
11
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
12
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
13
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
14
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
15
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
16
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
17
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
18
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
19
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
20
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 

सर्व सुविधायुक्त सरकारी रुग्णालये उभारणे काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 10:06 AM

वर्तमान व भविष्यातील गरज हेरून सर्व सुविधायुक्त सरकारी रुग्णालये उभारण्याची वेळ आली आहे. यासाठी राज्य सरकारने तातडीने पुढे यावे, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व पुष्पा गणेडीवाला यांनी शुक्रवारी सांगितले.

ठळक मुद्दे सरकारने पुढे येण्याची वेळ आल्याचे सांगितले

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आवश्यक आर्थिक तरतूद होत नसल्यामुळे असंख्य रुग्ण खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत नाहीत. अशावेळी सरकारी रुग्णालयांमध्ये महत्त्वाच्या वैद्यकीय सुविधा न मिळाल्यास त्यांना जीव गमवावा लागतो. त्यामुळे वर्तमान व भविष्यातील गरज हेरून सर्व सुविधायुक्त सरकारी रुग्णालये उभारण्याची वेळ आली आहे. यासाठी राज्य सरकारने तातडीने पुढे यावे, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व पुष्पा गणेडीवाला यांनी शुक्रवारी सांगितले.उच्च न्यायालयाने शुक्रवारी कोरोनासंदर्भातील प्रकरणावर महत्त्वपूर्ण निर्णय दिला. त्यात न्यायालयाने राज्य सरकारचे कान टोचले. सर्व रुग्णांना परवडणाऱ्या दरात वैद्यकीय उपचार उपलब्ध झाले पाहिजे. हे काम राज्य सरकारने करणे आवश्यक आहे. तेव्हाच गरजू रुग्णांना स्वत:चे प्राण वाचवता येतील. सध्या नागपूरमध्ये सर्वत्र रुग्णालये आहेत. परंतु, शहराच्या सीमेवर आवश्यक रुग्णालये नाहीत. त्यामुळे बाहेरच्या रुग्णांना वाहतूक समस्यांना तोंड देत शहरातील रुग्णालयात भरती व्हावे लागते. त्यात बरेचदा विलंब होऊन रुग्ण दगावतात. त्यामुळे बाहेरून येणाºया रुग्णांना शहरात प्रवेश करण्याची गरज भासायला नको. त्यांना शहराच्या सीमेवरच सर्व सुविधायुक्त सरकारी रुग्णालय उपलब्ध झाले पाहिजे याकडे न्यायालयाने लक्ष वेधले.शेजारच्या राज्यांतील रुग्ण नागपूरवर अवलंबूननागपूर शहर देशाच्या हृदयस्थळी वसले आहे. हे शहर परिवहन व दूरसंचार सुविधांनी देशाच्या इतर भागाशी भक्कमपणे जुळलेले आहे. त्यामुळे केवळ विदर्भच नाही तर, मध्य प्रदेश व छत्तीसगड या शेजारी राज्यातील रुग्णही नागपूरमध्ये वैद्यकीय उपचारासाठी येतात. त्यामुळे नागपूर मेडिकल हब झाले आहे, असे न्यायालयाने सांगितले.स्थानिक प्रशासनाकडे योजना नाहीनागपूरमध्ये सर्वत्र वैद्यकीय सुविधा पसरल्या आहेत. रुग्णालये असलेल्या घनदाट वस्त्यांमध्ये वाहतूक कोंडी व इतर समस्या भेडसावत आहेत. असे असताना स्थानिक प्रशासनाच्या डोक्यात काहीच प्रभावी योजना नाही, असे ताशेरे उच्च न्यायालयाने ओढले. कोरोनाबाधित रुग्ण घनदाट वस्त्यांमधील रुग्णालयात भरती होत असल्यामुळे आणि ते परिसरात वावरत असल्यामुळे कोरोना संक्रमण झपाट्याने वाढत आहे. ही परिस्थिती अतिशय गंभीर आहे असेही न्यायालय म्हणाले. 

 

 

 

 

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय