शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

जाणीवपूर्वक देशविरोधी वातावरण तयार करणाऱ्यांविरुद्ध जनआंदोलन उभारा - उपराष्ट्रपती जगदीप धनखड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2023 10:29 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा शताब्दी महोत्सव

नागपूर : ‘२०४७ पर्यंत भारत जगातील पहिली मोठी अर्थव्यवस्था असणारा देश व्हावा, या दिशेने वाटचाल सुरू आहे. मात्र, जगात काही लोक हे जाणीवपूर्वक भारतविराेधी वातावरण (ॲन्टी इंडिया नॅरेटिव्ह) तयार करत आहेत. तेव्हा नागरिकांनी अशा लोकांविरुद्ध जनआंदोलन उभारावे,’ असे आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी येथे केले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सव समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल रमेश बैस होते. उपराष्ट्रपतींच्या पत्नी डॉ. सुदेश धनखड, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विशेष अतिथी होते. कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी व प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे व्यासपीठावर उपस्थित होते.

उपराष्ट्रपती म्हणाले, ‘लोकसभा व राज्यसभा ही लोकशाहीची मंदिरे आहेत. परंतु, लोकशाहीलाच तिलांजली देण्याचे काम सुरू आहे. देशभरातील लोकप्रतिनिधी हे संसदेत निवडून येतात. त्यामुळे येथे लोकांच्या विषयावर चर्चा, संवाद होणे अपेक्षित आहेत. परंतु, तेच होताचा दिसून येत नाही.’ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी विद्यापीठाच्या गौरवाशाली इतिहासावर प्रकाश टाकला. यावेळी विद्यापीठाच्या ‘शतदीपपूर्ती’ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी स्वागतपर भाषण केले.

नवीन शैक्षणिक धोरण उद्यमशील व सर्जनशील - राज्यपाल बैस

राज्यपाल रमेश बैस म्हणाले, ब्रिटिशांचे शैक्षणिक धोरण हे केवळ नोकर करण्यापुरते होते. परंतु, देशाचे पहिल्यांदाच उद्योजकता, नाविन्य, संशोधन, सर्जनशील विचार आणि क्रिटिकल थिंकिंगवर भर देणारे शैक्षणिक धोरण आणले गेले आहे. यावेळी जैवतंत्रज्ञान विभागाचे माजी प्राध्यापक डॉ. एच. एफ. दगिनवाला, ‘हल्दीराम’ समूहाचे संस्थापक अध्यक्ष शिवकिशन अग्रवाल, ‘यशवंत ग्रामीण शिक्षण संस्था, वर्धा’चे अध्यक्ष, प्राध्यापक सुरेश देशमुख, ‘संपूर्ण बांबू केंद्र’च्या अध्यक्ष डॉ. निरूपमा देशपांडे आणि साहित्य व कला यासाठी हरिश्चंद्र बोरकर यांना ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवन साधना पुरस्कार’ जाहीर करत त्यांचे अभिनंदन केले.

विद्यापीठ गीताविनाच शताब्दी महोत्सव

या भारतात बंधुभाव नित्य वसू दे , दे वरचि असा दे... राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे हे भजन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे विद्यापीठ गीत आहे. विद्यापीठाचा प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात या गीतानेच होते. परंतु शताब्दी महोत्सव समारंभ विद्यापीठ गीताविनाच पार पडला. उपराष्ट्रपती कार्यालयाकडे कार्यक्रमात एकूण तीन गीतांची यादी पाठवण्यात आली होती. त्यात राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत आणि विद्यापीठ गीत यांचा समावेश होता. कार्यक्रमाच्या प्रोटोकॉलनुसार विद्यापीठ गीत कार्यक्रमातून वगळण्यात आल्याचे सांगितले जाते.

टॅग्स :Educationशिक्षणRashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ