शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

जाणीवपूर्वक देशविरोधी वातावरण तयार करणाऱ्यांविरुद्ध जनआंदोलन उभारा - उपराष्ट्रपती जगदीप धनखड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2023 10:29 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा शताब्दी महोत्सव

नागपूर : ‘२०४७ पर्यंत भारत जगातील पहिली मोठी अर्थव्यवस्था असणारा देश व्हावा, या दिशेने वाटचाल सुरू आहे. मात्र, जगात काही लोक हे जाणीवपूर्वक भारतविराेधी वातावरण (ॲन्टी इंडिया नॅरेटिव्ह) तयार करत आहेत. तेव्हा नागरिकांनी अशा लोकांविरुद्ध जनआंदोलन उभारावे,’ असे आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी येथे केले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सव समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल रमेश बैस होते. उपराष्ट्रपतींच्या पत्नी डॉ. सुदेश धनखड, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विशेष अतिथी होते. कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी व प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे व्यासपीठावर उपस्थित होते.

उपराष्ट्रपती म्हणाले, ‘लोकसभा व राज्यसभा ही लोकशाहीची मंदिरे आहेत. परंतु, लोकशाहीलाच तिलांजली देण्याचे काम सुरू आहे. देशभरातील लोकप्रतिनिधी हे संसदेत निवडून येतात. त्यामुळे येथे लोकांच्या विषयावर चर्चा, संवाद होणे अपेक्षित आहेत. परंतु, तेच होताचा दिसून येत नाही.’ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी विद्यापीठाच्या गौरवाशाली इतिहासावर प्रकाश टाकला. यावेळी विद्यापीठाच्या ‘शतदीपपूर्ती’ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी स्वागतपर भाषण केले.

नवीन शैक्षणिक धोरण उद्यमशील व सर्जनशील - राज्यपाल बैस

राज्यपाल रमेश बैस म्हणाले, ब्रिटिशांचे शैक्षणिक धोरण हे केवळ नोकर करण्यापुरते होते. परंतु, देशाचे पहिल्यांदाच उद्योजकता, नाविन्य, संशोधन, सर्जनशील विचार आणि क्रिटिकल थिंकिंगवर भर देणारे शैक्षणिक धोरण आणले गेले आहे. यावेळी जैवतंत्रज्ञान विभागाचे माजी प्राध्यापक डॉ. एच. एफ. दगिनवाला, ‘हल्दीराम’ समूहाचे संस्थापक अध्यक्ष शिवकिशन अग्रवाल, ‘यशवंत ग्रामीण शिक्षण संस्था, वर्धा’चे अध्यक्ष, प्राध्यापक सुरेश देशमुख, ‘संपूर्ण बांबू केंद्र’च्या अध्यक्ष डॉ. निरूपमा देशपांडे आणि साहित्य व कला यासाठी हरिश्चंद्र बोरकर यांना ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवन साधना पुरस्कार’ जाहीर करत त्यांचे अभिनंदन केले.

विद्यापीठ गीताविनाच शताब्दी महोत्सव

या भारतात बंधुभाव नित्य वसू दे , दे वरचि असा दे... राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे हे भजन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे विद्यापीठ गीत आहे. विद्यापीठाचा प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात या गीतानेच होते. परंतु शताब्दी महोत्सव समारंभ विद्यापीठ गीताविनाच पार पडला. उपराष्ट्रपती कार्यालयाकडे कार्यक्रमात एकूण तीन गीतांची यादी पाठवण्यात आली होती. त्यात राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत आणि विद्यापीठ गीत यांचा समावेश होता. कार्यक्रमाच्या प्रोटोकॉलनुसार विद्यापीठ गीत कार्यक्रमातून वगळण्यात आल्याचे सांगितले जाते.

टॅग्स :Educationशिक्षणRashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ