शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

Budget 2020: अर्थसंकल्प अपेक्षाभंग करणारा - विजय दर्डा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2020 03:27 IST

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प अपेक्षाभंग करणारा असून, त्यातून औद्योगिक किंवा अर्थव्यवस्थेला गती मिळण्याची शक्यता कमी आहे

नागपूर : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प अपेक्षाभंग करणारा असून, त्यातून औद्योगिक किंवा अर्थव्यवस्थेला गती मिळण्याची शक्यता कमी आहे, अशी प्रतिक्रिया माजी राज्यसभा सदस्य व लोकमतचे चेअरमन विजय दर्डा यांनी व्यक्त केली आहे.सीतारामन यांनी प्राप्तिकराचे दर कमी करताना शिताफीने 80-सी कलमाखाली स्टँडर्ड डिडक्शन, एचआरए, पीएफ या सवलती काढून घेतल्या आहेत. त्यामुळे याचा फायदा फक्त ५ लाख ते १५ लाख करपात्र उत्पन्न असलेल्या करदात्यांनाच होईल. इतर करदात्यांना त्याचा फारसा फायदा होणार नाही.

डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स (डीडीटी) हटविल्याबद्दल दर्डा यांनी आनंद व्यक्त केला. यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या छोट्या गुंतवणूकदारांचा तसेच म्युच्युअल फंड आणि विदेशी गुंतवणूकदारांना फायदा होईल. परंतु कंपनीचे प्रवर्तक असलेल्या श्रीमंत व्यक्तींना द्यावा लागणारा प्राप्तिकर ३४ टक्क्यांवरून ४३ टक्के झाला आहे. त्यामुळे संपत्ती निर्माण करणाºया उद्योगपतींचा कर बोजा वाढणार आहे. त्यामुळे गुंतवणूक होणार नाही व रोजगार निर्मितीलाही खीळ बसेल.

सीतारामन यांनी १० कोटीपेक्षा अधिक उलाढाल असणाºया कंपन्यांच्या विक्रीवर ०.०१ टक्का ट्रान्झक्शन टॅक्स लावला आहे. याचा तोटा हिंदुस्तान युनिलिव्हरसारख्या बड्या कंपन्यांना होणार आहे. कारण कर ५० लाखापेक्षा अधिक वार्षिक विक्रीवर वसूल करायचा आहे. त्यामुळे त्याचा बोजा डिस्ट्रीब्युटर्स, स्टॉकिस्टस्, डीलर्स या सर्वांवर पडणारा आहे व करभरणा करणे अत्यंत किचकट होणार आहे.

विदेशात राहणारे भारतीय गुंतवणुकीचा मोठा स्रोत आहे. परंतु या अर्थसंकल्पात अनिवासी भारतीयांची व्याख्या बदलून विदेशातील वास्तव्य १८० दिवसांऐवजी २४० दिवस केले आहे. अशी व्यक्ती उरलेले दिवस जर इतर कुठल्याही देशात राहत असेल तर ती व्यक्ती निवासी भारतीय ठरवली जाईल व तिला विदेशातील उत्पन्नावर भारतात प्रचलित दराने प्राप्तिकर भरावा लागेल. यामुळे देशात अनिवासी भारतीयांची गुंतवणूक थांबेल.या अर्थसंकल्पामुळे मोठ्या गुंतवणुकीला चालना मिळेल ही अपेक्षा फोल ठरली आहे व म्हणून उद्योग व अर्थव्यवस्थेला गती मिळण्याची शक्यता कमी आहे.

टॅग्स :budget 2020बजेटbudget expert speaksबजेट तज्ञांचा सल्लाNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनMaharashtraमहाराष्ट्रVijay Dardaविजय दर्डा