शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
4
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
5
गुजरात पोलिसांची मोठी कावाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
6
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
7
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
8
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
9
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
10
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
11
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
12
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
13
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
14
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
15
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
16
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
17
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
18
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
19
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
20
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा

देशमुखांमधील भाऊबंदकी उफाळली : सलील यांनी साधला आशिष यांच्यावर नेम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 20:30 IST

गेल्या विधानसभा निवडणुकीपासून देशमुख कुटुंबात पडलेली दरी मिटण्याची चिन्हे नाहीत. भाजपाचे आ. आशिष देशमुख यांनी भाजपा नेत्यांच्या कार्यशैलीवर उघडपणे वार करणे सुरू केले असताना त्यांचे चुलतभाऊ राष्ट्रवादीचे युवा नेते सलील देशमुख यांनी त्यांच्या बोडअळीच्या शासकीय मदतीवरून लक्ष्य केले आहे.

ठळक मुद्देनागपुरातील काटोल - नरखेड तालुका बोंड अळी पॅकेजमधून वगळला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या विधानसभा निवडणुकीपासून देशमुख कुटुंबात पडलेली दरी मिटण्याची चिन्हे नाहीत. भाजपाचे आ. आशिष देशमुख यांनी भाजपा नेत्यांच्या कार्यशैलीवर उघडपणे वार करणे सुरू केले असताना त्यांचे चुलतभाऊ राष्ट्रवादीचे युवा नेते सलील देशमुख यांनी त्यांच्या बोडअळीच्या शासकीय मदतीवरून लक्ष्य केले आहे. आशिष देशमुख यांच्या दुर्लक्षामुळेच काटोल - नरखेड तालुका बोंडअळी पॅकेजमधून वगळण्यात आला, असा आरोप सलील यांनी केली आहे. या प्रकारामुळे देशमुखांमधील भाऊबंदकी पुन्हा एकदा उफाळल्याचे चित्र आहे.गेल्या विधानसभा निवडणुकीत आशिष देशमुख यांनी भाजपाचे तिकीट घेत स्वत:चे काका व राष्ट्रवादीचे माजी मंत्री अनिल देशमुख यांना पराभूत केले होते. तेव्हापासून या देशमुख कुटुंबात वेबनाव निर्माण झाला होता. मात्र, असे असले तरी निवडणुकीनंतरही एकमेकांवर उघडपणे दोषारोप करणे दोन्ही बाजूंनी टाळले जात होते. आता मात्र, सलील देशमुख यांनी थेट आ. आशिष यांच्यावर नेम साधत आव्हान दिले आहे. सलील यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी आत्मबळ यात्रा करणारे काटोलचे आमदार आशिष देशमुख यांना स्वत:च्या मतदार संघाचाच विसर पडला आहे. येथील सर्व समस्यांकडे त्यांनी दुर्लक्ष केले असून जनतेला वाऱ्यावर सोडले आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या बोंडअळीच्या पॅकेजमधून काटोल व नरखेड तालुक्याला वगळण्यात आले आहे. शासकीय सर्वेक्षण होत असताना आमदार म्हणून याकडे लक्ष देण्याची गजर होती. मात्र, आशिष यांनी संपूर्ण दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांना फटका बसणार आहे. त्यांचा हा नाकर्तेपणा शेतकऱ्यांच्या जीवावर उठला असल्याची बोचरी टीकाही सलील यांनी केली आहे.आ. आशिष देशमुख यांनी मतदारसंघातील समस्यांचा अभ्यास करुन आवाज उठविणे अपेक्षित आहे. परंतु त्यांनी जनतेलाच वाऱ्यावर सोडले आहे. कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांना होताना दिसत नाही. ज्यावेळी कर्जमाफीची घोषणा केली तेव्हा त्यांनीच मतदारसंघात ९० टक्के शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला, असे बॅनर लावले होते. ही कर्जमाफी माझ्यामुळेच झाली असे दाखवित स्वत:चा सत्कार करून घेतला होता. आता कोणत्या शेतकऱ्यांचा साताबारा कोरा झाला, हे त्यांनी सांगावे. काटोल व नरखेड तालुक्यातील शेतकरी तूर खरेदी कधी होणार याची वाट पाहत आहे. मागील वर्षी त्यांनी नरखेड येथे तूर खरेदी केंद्राचे उद्घाटन केले होते, तेच केंद्र चार दिवसात बंद पडले होते, ते परत सुरू करण्यासाठी त्यांनी काहीच प्रयत्न केले नाही. केवळ पोस्टरबाजी करुन मतदारसंघाचा विकास झाल्याचे दाखविण्याचे त्यांचे काम सुरू असल्याचा आरोप सुध्दा सलील देशमुख यांनी केला. विदर्भाच्या मागणीसोबत आपल्या मतदारसंघाकडेही लक्ष द्या, असा टोलाही सलील यांनी लगावला आहे.

टॅग्स :Ashish Deshmukhआशीष देशमुखSalil Deshmukhसलील देशमुख