शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

देशमुखांमधील भाऊबंदकी उफाळली : सलील यांनी साधला आशिष यांच्यावर नेम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 20:30 IST

गेल्या विधानसभा निवडणुकीपासून देशमुख कुटुंबात पडलेली दरी मिटण्याची चिन्हे नाहीत. भाजपाचे आ. आशिष देशमुख यांनी भाजपा नेत्यांच्या कार्यशैलीवर उघडपणे वार करणे सुरू केले असताना त्यांचे चुलतभाऊ राष्ट्रवादीचे युवा नेते सलील देशमुख यांनी त्यांच्या बोडअळीच्या शासकीय मदतीवरून लक्ष्य केले आहे.

ठळक मुद्देनागपुरातील काटोल - नरखेड तालुका बोंड अळी पॅकेजमधून वगळला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या विधानसभा निवडणुकीपासून देशमुख कुटुंबात पडलेली दरी मिटण्याची चिन्हे नाहीत. भाजपाचे आ. आशिष देशमुख यांनी भाजपा नेत्यांच्या कार्यशैलीवर उघडपणे वार करणे सुरू केले असताना त्यांचे चुलतभाऊ राष्ट्रवादीचे युवा नेते सलील देशमुख यांनी त्यांच्या बोडअळीच्या शासकीय मदतीवरून लक्ष्य केले आहे. आशिष देशमुख यांच्या दुर्लक्षामुळेच काटोल - नरखेड तालुका बोंडअळी पॅकेजमधून वगळण्यात आला, असा आरोप सलील यांनी केली आहे. या प्रकारामुळे देशमुखांमधील भाऊबंदकी पुन्हा एकदा उफाळल्याचे चित्र आहे.गेल्या विधानसभा निवडणुकीत आशिष देशमुख यांनी भाजपाचे तिकीट घेत स्वत:चे काका व राष्ट्रवादीचे माजी मंत्री अनिल देशमुख यांना पराभूत केले होते. तेव्हापासून या देशमुख कुटुंबात वेबनाव निर्माण झाला होता. मात्र, असे असले तरी निवडणुकीनंतरही एकमेकांवर उघडपणे दोषारोप करणे दोन्ही बाजूंनी टाळले जात होते. आता मात्र, सलील देशमुख यांनी थेट आ. आशिष यांच्यावर नेम साधत आव्हान दिले आहे. सलील यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी आत्मबळ यात्रा करणारे काटोलचे आमदार आशिष देशमुख यांना स्वत:च्या मतदार संघाचाच विसर पडला आहे. येथील सर्व समस्यांकडे त्यांनी दुर्लक्ष केले असून जनतेला वाऱ्यावर सोडले आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या बोंडअळीच्या पॅकेजमधून काटोल व नरखेड तालुक्याला वगळण्यात आले आहे. शासकीय सर्वेक्षण होत असताना आमदार म्हणून याकडे लक्ष देण्याची गजर होती. मात्र, आशिष यांनी संपूर्ण दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांना फटका बसणार आहे. त्यांचा हा नाकर्तेपणा शेतकऱ्यांच्या जीवावर उठला असल्याची बोचरी टीकाही सलील यांनी केली आहे.आ. आशिष देशमुख यांनी मतदारसंघातील समस्यांचा अभ्यास करुन आवाज उठविणे अपेक्षित आहे. परंतु त्यांनी जनतेलाच वाऱ्यावर सोडले आहे. कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांना होताना दिसत नाही. ज्यावेळी कर्जमाफीची घोषणा केली तेव्हा त्यांनीच मतदारसंघात ९० टक्के शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला, असे बॅनर लावले होते. ही कर्जमाफी माझ्यामुळेच झाली असे दाखवित स्वत:चा सत्कार करून घेतला होता. आता कोणत्या शेतकऱ्यांचा साताबारा कोरा झाला, हे त्यांनी सांगावे. काटोल व नरखेड तालुक्यातील शेतकरी तूर खरेदी कधी होणार याची वाट पाहत आहे. मागील वर्षी त्यांनी नरखेड येथे तूर खरेदी केंद्राचे उद्घाटन केले होते, तेच केंद्र चार दिवसात बंद पडले होते, ते परत सुरू करण्यासाठी त्यांनी काहीच प्रयत्न केले नाही. केवळ पोस्टरबाजी करुन मतदारसंघाचा विकास झाल्याचे दाखविण्याचे त्यांचे काम सुरू असल्याचा आरोप सुध्दा सलील देशमुख यांनी केला. विदर्भाच्या मागणीसोबत आपल्या मतदारसंघाकडेही लक्ष द्या, असा टोलाही सलील यांनी लगावला आहे.

टॅग्स :Ashish Deshmukhआशीष देशमुखSalil Deshmukhसलील देशमुख