शहरं
Join us  
Trending Stories
1
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
2
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
3
"पाच टप्प्यांतच भाजपा तीनशेपार, तर काँग्रेस…’’,  अमित शाहांचा मोठा दावा 
4
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
5
"माझ्या संयमाची परीक्षा घेऊ नको..." प्रज्वल रेवन्नाला आजोबा देवेगौडांचा इशारा
6
अपचनाच्या त्रासापासून आता होईल सुटका; जेवताना 'ही' 3 पथ्यं नक्की पाळा
7
ना गळ्यात 'भाजपा'चा गमछा, ना भाषणात मोदींचा उल्लेख... Maneka Gandhi यांच्या प्रचारसभेत दिसला Varun Gandhi यांच्यातील बदल
8
Narendra Modi : "काँग्रेसचं सरकार 7 जन्मात येणार नाही; गाय दूध देत नाही तोवर तूप खाण्यासाठी..."
9
"नेहमी बोलणाऱ्या सुप्रिया सुळे पुणे अपघातावर गप्प का आहेत?" नितेश राणेंचा सवाल
10
"4 जून रोजी भरपूर पाणी जवळ ठेवा...", प्रशांत किशोर यांचा टीकाकारांवर निशाणा
11
PHOTOS : लोकसभा निवडणुकीत कलाकारांची एन्ट्री; म्हणाले, 'अब की पार 400 पार' निश्चित
12
IPL क्वालिफायर २ अन् फायनल लढतीत पावसाचा बाधा; सामना रद्द झाल्यास कोण जिंकणार ट्रॉफी?
13
T20 WC मध्ये टीम इंडियाला घाबरू नका, त्यांना १० वर्षात...; इंग्लंडच्या माजी खेळाडूने उगाच डिवचले
14
"कुणी कितीही बोललं तरी बटण..."; भाजपने मतदारांना पैसे वाटल्याचा शरद पवार गटाचा आरोप
15
जानकरांकडून महायुतीला ४२ जागांचा अंदाज, पण आठवलेंचा रिव्हर्स गियर; म्हणाले...
16
डोंबिवली एमआयडीसीत भीषण स्फोट; केमिकल कंपनीत बॉयलर फुटल्याने लागली आग
17
Swami Samartha: रोजच्या पूजेत 'या' गोष्टींचा समावेश केला तर स्वामी समर्थांची निश्चितच होईल कृपा!
18
Adani चं मोठं यश, पहिल्यांदाच सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री घेणार समूहाची 'ही' कंपनी?
19
Rituals: महिलांचा मासिक धर्म सुरु असताना जोडप्याने एकत्र राहू नये असे शास्त्र सांगते; पण का? वाचा!
20
थरारक! ५ मिनिटांत ६००० फूट विमान खाली आलं; साक्षात मृत्यू डोळ्यासमोर उभा राहिला

‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’च्या नावे दलाल सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2019 11:21 AM

सरकारी योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळो अथवा न मिळो, पण दलात मात्र त्या योजनेतून कसा लाभ मिळविता येईल, यासाठी सक्रिय झाले.

ठळक मुद्देदोन लाख रुपये मिळण्याचा करताहेत दावा विभाग म्हणतोय या योजनेत लाभच मिळत नाही

सैयद मोबीन/ मंगेश व्यवहारे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सरकारी योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळो अथवा न मिळो, पण दलात मात्र त्या योजनेतून कसा लाभ मिळविता येईल, यासाठी सक्रिय झाले. केंद्र सरकारने देशभरात ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ हे अभियान राबविले आहे. पण या अभियानाचा चुकीचा प्रचार आणि प्रसाद दलालांच्या माध्यमातून होत आहे. त्यात सामान्यजन फसले जात आहे. ग्रामीण भागात त्यासाठी ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या नावाने काही फॉर्म वाटण्यात आले आहे. ८ ते ३२ वयाच्या मुलीला प्रधानमंत्री यांच्याकडून दोन लाख रुपये मिळणार आहे असे सांगितले जात आहे. त्या फॉर्मच्या झेरॉक्ससाठी ५ रुपये घेतल्यानंतर, फॉर्म भरून मंत्रालयात पोस्ट करण्यासाठी २०० ते ५०० रुपये वसूल केले जात आहे. लोकमतने यासंदर्भात चौकशी केली असता हा फसवेगिरीचा प्रकार उघडकीस आला आहे. महिला व बाल कल्याण मंत्रालयाची अशी कुठलीही योजना नाही. पण दलाल या माध्यमातून आपले खिसे भरताहेत.

उत्तर प्रदेशातून झाली होती सुरुवातमंत्रालयातील सूत्रानुसार फॉर्म वाटपाची सुरुवात उत्तर प्रदेशातून झाली होती. उत्तर प्रदेशात यासंदर्भात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सीबीआयकडे या प्रकरणाची चौकशी सोपविण्यात आली आहे. त्याचबरोबर हरियाणा, उत्तराखंड, पंजाब, हिमाचल प्रदेश, दिल्ली येथे सुद्धा हे फॉर्म वाटप झाले आहे. बिहार, राजस्थान, केरळ व पश्चिम बंगाल येथून सुद्धा फॉर्म मंत्रालयात पोहचले आहे. आता महाराष्ट्रातून हे फॉर्म मोठ्या प्रमाणात वितरित होत आहे. आमच्या विभागाकडे स्पीड पोस्टाने असे लाखो फॉर्म प्राप्त झाले आहे.

मंत्रालयाने वेबसाईटवर नोटिफिकेशन केले जाहीरयासंदर्भात केंद्र सरकारच्या महिला व बाल कल्याण मंत्रालयाने आपल्या वेबसाईटवर एक नोटिफिकेशन जाहीर केले आहे. त्यात स्पष्ट केले की, ही स्कीम मंत्रालयाकडून राबविली जात आहे. हे फॉर्म फेक आहे. यात ‘बेटी बचाओ, बेटी बढाओ’ स्कीमचा मुख्य उद्देश पीसीपीएनडीटी अ‍ॅक्ट सक्तीने लागू करणे, मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे आणि महिलांचे सशक्तीकरण करणे हा आहे. ही कुठल्याही लाभाची योजना नाही.

योजनेचा उद्देश अजिबात आर्थिक नाहीमहाराष्ट्रात २०१५ पासून ही योजना राबविण्यात येत आहे. यात २०१८-१९ मध्ये नागपूर जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये मुलींचा जन्मदर वाढविणे, प्रसुतीपुर्वी गर्भलिंग निदानाला प्रतिबंध घालणे, मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे, तिच्या सुरक्षेची काळजी घेणे. या बाबतीत जनजागृती कार्यक्रम राबवायचा आहे. यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेत एक ‘कृतिगट’ तयार करण्यात आला आहे. महिला व बाल विकास विभागाबरोबर इतर काही विभागाच्या समन्वयातून हा कार्यक्रम राबवायचा आहे. यात कुठलेही आर्थिक लाभ मिळणार नाही. त्यामुळे जनतेमध्ये योजनेसंदर्भात काही फॉर्म वाटप होत असेल, आमिष दाखविण्यात येत असेल तर त्यांनी बळी पडू नये. परिसरातील अंगणवाडी सेविका, बाल विकास प्रकल्प कार्यालय अथवा जिल्हा महिला व बाल कल्याण विभागाकडे संपर्क साधून योजनेची माहिती घ्यावी.- भागवत तांबे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बाल विकास विभाग 

टॅग्स :Governmentसरकार