शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

तुटली का रे...

By admin | Updated: September 20, 2014 01:57 IST

शिवसेना-भाजप यांची २५ वर्षापासूनची युती तुटणार,

भाजप-सेनेचे कार्यकर्ते अस्वस्थ : मुंबईकडे लक्ष, दिवसभर विचारणानागपूर: शिवसेना-भाजप यांची २५ वर्षापासूनची युती तुटणार, अशा बातम्या शुक्रवार सकाळपासूनच वृत्तवाहिन्या देऊ लागल्याने अस्वस्थ झालेले दोन्ही पक्षाचे स्थानिक कार्यकर्ते दिवसभर युतीच्या भवितव्याबाबत मुंबईतील नेत्यांशी संपर्कात होते. ‘तुटली का ?’असा सवाल फक्त युतीतीलच कार्यकर्ते विचारत होते असे नव्हे तर आघाडीतूनही याबाबत विचारणा होत होती.जागा वाटपाच्या मुद्यावरून दोन्ही पक्षात गेल्या एक आठवड्यापासून असलेला तणाव काही दिवसात अधिक वाढला. युतीचे काय होणार असा प्रश्न निर्माण झाला असतानाच शुक्रवारी सकाळपासूनच युती तुटली अशा बातम्या वृत्तवाहिन्या प्रश्नार्थक चिन्ह लावून देऊ लागल्याने स्थानिक कार्यकर्त्यांची अस्वस्थता अधिक वाढली. शनिवारपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होण्याच्या एक दिवस आधी अशी स्थिती निर्माण झाल्याने युती तुटली तर पुढे काय यावरही चर्चा सुरू झाली. भाजपमधील स्थानिक नेते प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात होते तर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शेखर सावरबांधे हे मुंबईत असल्याने शिवसैनिक त्यांच्याशी संपर्क ठेवून होते. काय झाले, युती राहणार की भंगणार, असा सवाल दर तासागणिक कार्यकर्ते परस्परांशी करीत होते. मुंबईतील नेत्यांशी बोलणी होत होती. मात्र दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून याबाबत संदिग्ध उत्तरे मिळत असल्याने कार्यकर्त्यांमधील अस्वस्थता आणखी वाढत चालली होती. सायंकाळ नंतर हा प्रकार किंचित निवळला. मुंबईत गेलेले स्थानिक नेते बोलू लागले. अद्याप स्थिती हाताबाहेर गेली नाही, काळजी करू नका असा त्यांच्या बोलण्याचा सूर होता. मात्र त्याच वेळी युती होणारच असे ते स्पष्टपणे सांगतही नव्हते. त्यामुळे सायंकाळपर्यंत तरी ‘तुटली का रे’ यावरील उत्तर सध्या तरी नाही एवढेच होते. (प्रतिनिधी)सन्मानजनक तोडगा काढावामहायुती कायम राहावी ही भाजपची प्रामाणिक इच्छा आहे. मात्र शिवसेनेने त्यांच्या भूमिकेत थोडा बदल करण्याची गरज आहे. भाजपच्या शक्तीत झालेली वाढ त्यांनी मान्य करावी आणि थोडं मोठ मन करावे. भाजप युतीसाठी नेहमीच अनुकूल आहे. कृष्णा खोपडे, शहर अध्यक्ष, भाजपा स्थिती निवळेलभगव्या झेंड्याखाली काम करणाऱ्या दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांचे युतीशी भावनिक संबंध जुळले आहेत. सेना आणि भाजप हे भावंडाप्रमाणे आहेत. त्यांच्यात मतभेद असले तरी मनभेद नाही. त्यामुळे परिवर्तनासाठी दोन्ही बाजूंच्या नेत्यांकडून प्रयत्न केले जातील.शेखर सावरबांधेजिल्हा प्रमुख, शिवसेना