शहरं
Join us  
Trending Stories
1
पडळकर-आव्हाड समर्थक राडा प्रकरणी अहवाल सादर; "'त्या' कार्यकर्त्यांना २ दिवस कारावास अन्..."
2
विनेश फोगाटचा यू-टर्न! पुन्हा कुस्तीच्या आखाड्यात परतणार, निवृत्तीचा निर्णय रद्द, कारण...
3
CBSE अभ्यासक्रमात छत्रपती शिवरायांचा इतिहास फक्त ६८ शब्दांत, सत्यजीत तांबेंचा विधानसभेत संताप
4
भारतात येत असताना...! विनफास्ट अमेरिकेत डीलरशीप बंद करू लागली; संख्या दोन डझनांखाली आली...
5
व्हेनेजुएला-अमेरिका वादात रशियाची उडी; मादुरोंच्या मदतीला पुतिन धावले, ट्रम्पना धक्का...
6
’सोयाबीन खरेदीचे केंद्र सुरू करण्यासाठी मंत्र्यांचे ओएसडी तीन लाख घेत आहेत’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप  
7
‘स्लीपर वंदे भारत’वर मोठी अपडेट! १ हजार किमी अंतर ८ तासात, १६० प्रति तास वेग; पहिली सेवा...
8
रिलेशिनशिप कन्फर्म केल्यानंतर पहिल्यांदा एकत्र दिसले गौरव कपूर-कृतिका कामरा, व्हिडीओ व्हायरल
9
इंस्टाग्रामच्या कंटाळवाण्या रील्सला म्हणा 'बाय बाय'! फक्त एका सेटिंगने बदला फीडचा अल्गोरिदम
10
Gujarat Flyover Collapse: गुजरातमध्ये निर्माणाधीन पूल कोसळला! ४ कामगार गंभीर जखमी, एक बेपत्ता
11
"माझ्या एका सिगारेटने दिल्लीच्या प्रदूषणात फरक पडणार नाही"; TMC खासदाराचं भाजपाला प्रत्युत्तर
12
Rahul Gandhi: "लाखो मुलांचे भविष्य उद्ध्वस्त होत आहे" लोकसभेत राहुल गांधींचं महत्वाच्या मुद्द्यावर भाष्य!
13
मुंबईतील ७० टक्के मुस्लीम बहुल भागात एकनाथ शिंदेंना पसंती; भाजपाच्या सर्व्हेतून काय आलं समोर?
14
टेस्लाला मोठा झटका! जागतिक विक्री ४ वर्षांतील नीचांकी पातळीवर; भारतात तर डोकेही वर निघेना...
15
इंडिगोचं विमान ऐनवेळी रद्द, मुलाची परीक्षा चुकू नये म्हणून वडिलांनी रात्रभर चालवली कार, अखेरीस... 
16
"ज्येष्ठ नेते शिवराज पाटील यांच्या निधनाने अनुभवी, अभ्यासू व सुसंकृत नेतृत्व हरपले’’,  हर्षवर्धन सपकाळ यांनी वाहिली श्रद्धांजली
17
Garud Puran: गरुड पुराणानुसार विवाह बाह्य संबंध ठेवणाऱ्यांना मिळते 'ही' भयानक शिक्षा!
18
या अभिनेत्रीचे वडील उरीमध्ये दहशतवाद्यांशी लढताना झाले होते शहीद, ८०० कोटींच्या सिनेमातून रातोरात झाली लोकप्रिय
19
नात्याला काळीमा! इस्रायलचं स्वप्न, विम्याच्या रकमेसाठी लेक झाला हैवान; वडिलांचा काढला काटा
20
मोठी बातमी! वेनेझुएलावर अमेरिकेने हल्ला केलाच, रशिया संरक्षण करणार; मादुरो यांना पुतीन यांचा फोन गेला...
Daily Top 2Weekly Top 5

देशातील घडामोडींसाठी यापुढे ब्रिटिशांना दोष देता येणार नाही : मोहन भागवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 22:48 IST

गुलाम होतो तेव्हा कसेही वागलेले चालले, आता विचारपूर्वक वागावे लागेल. यापुढच्या कोणत्याही गोष्टींसाठी ब्रिटिशांना दोषी धरता येणार नाही, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देरा.स्व. संघाचा नवोत्सव कार्यक्रम

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : राजकीय दृष्टीने खंडित असला तरी आपला देश आता स्वतंत्र झाला आहे. आता देशाचे स्वातंत्र्य टिकविणे, राज्य सुचारुपणे चालविणे ही आपली जबाबदारी आहे. यापुढे देशाचे जे काही चांगले वाईट होईल, त्यासाठी आपण जबाबदार असू. गुलाम होतो तेव्हा कसेही वागलेले चालले, आता विचारपूर्वक वागावे लागेल. यापुढच्या कोणत्याही गोष्टींसाठी ब्रिटिशांना दोषी धरता येणार नाही, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले.

रा. स्व. संघाच्या नागपूर महानगरच्यावतीने 'नवोत्सव २०२०' हा गुणवत्ता प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम गुरुवारी यशवंत स्टेडियम येथे आयोजित करण्यात आला. या अंतर्गत सामूहिक शारीरिक प्रात्यक्षिक व स्पर्धेचेआयोजन करण्यात आले. याप्रसंगी संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी, विदर्भ प्रांत संघचालक राम हरकरे, नागपूर महानगर संघचालक राजेश लोया, महानगर सहसंघचालक श्रीधर गाडगे आदी उपस्थित होते. यावेळी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना डॉ. भागवत म्हणाले, रा. स्व. संघाच्या या गुणवत्ता प्रात्यक्षिक कार्यक्रमातूनच अनुशासन व स्वयंसेवकांमध्ये गुणनिर्मिती होते. संघाच्या या कार्यक्रमातून वैयक्तिक नाही तर सामूहिकतेची भावना वाढते. अनुशासन, भक्ती आणि विवेक जागवून  राष्ट्रबांधणीसाठी कार्य करण्याची भावना या उपक्रमातून होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांची भावना प्रत्यक्ष आचरण करण्याची साधना आहे.  राष्ट्र आणि मानवतेच्या उत्थानासाठी कार्य करण्याची प्रेरणा यातून मिळते. ज्ञान म्हणजे माहितीचा योग्य उपयोग करण्याची दिशा आणि लक्ष्य निर्धारीत करण्याची पद्धत होय. यातून संपूर्ण समाजाला एकत्रित करून विश्वाला मानवता देणारा भारत निर्माण करायचा आहे. समाजात ज्या प्रकारचे परिवर्तन हवे आहे, त्या प्रकारचे आपले आचरण असायला हवे. दैनंदिन जीवनात नागरिकता अनुशासनाचे पालन करणे हीच देशभक्तीची अभिव्यक्ती होय. त्यामुळे नागरिक आणि सामाजिक अनुशासन राखणे ही आपली सवय बनावी. संपूर्ण समाजाचे जीवन व्यवस्थित चालेल या समाजार्पण वृत्तीने कार्य करावे लागेल आणि या आधारावरच आपला देश परमवैभवसंपन्न होईल, अशी भावना डॉ. भागवत यांनी व्यक्त केली.
यावेळी सोमलवाडा भागाच्या तीन गणांनी गणसमानताचे प्रात्यक्षिक सादर केले. मोहिते भागाने नियुद्ध कला, इतवारी भागाने सामूहिक गन समता, लालगंज भागाने पदविन्यास कला, सदर-गिट्टीखदान भागाने योगासन, त्रिमूर्तीनगर भागाने दंड क्रमिक, अयोध्या भागाने योगासन, नंदनवन भागाच्य स्वयंसेवकांनी विनाशस्त्र नियुद्ध कला व अजनी भागाने गीताचे सादरीकरण केले. प्रास्ताविक करताना महानगर संघचालक राजेश लोया यांनी स्पर्धेचे निकाल जाहीर केले. स्पर्धेत प्रथम क्रमांक घोष, द्वितीय नंदनवन भाग व तृतीय क्रमांक धरमपेठ आणि सोमलवाडा भागांनी संयुक्तरीत्या पटकाविला.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMohan Bhagwatमोहन भागवत