शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
2
निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
3
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
4
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
5
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
6
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
7
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
8
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
9
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
10
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
11
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...
12
"या हॉटेलवर डॉक्टर तरुणीला का बोलावलं होतं?"; सुषमा अंधारे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे नाव घेत काय म्हणाल्या?
13
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
14
Orkla India IPO च्या जीएमपीमध्ये मोठी तेजी; 'या' तारखेपासून लावू शकणार बोली, केव्हा होणार लिस्टिंग?
15
वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकसाठी बांगलादेशात 'पायघड्या'; भारतात आहे MOST WANTED
16
ढासू परतावा...! ₹100 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, 5 वर्षांती दिला 6455% परतावा; आता रेल्वेकडून मिळाली मोठी ऑर्डर
17
Mumbai Pune Mumbai 4: स्वप्नील-मुक्ताची जोडी पुन्हा एकत्र, 'मुंबई पुणे मुंबई ४'ची घोषणा, बघा व्हिडीओ
18
श्रेयस अय्यरला झालेली दुखापत किती गंभीर, आता कशी आहे प्रकृती? बीसीसीआयने दिली महत्त्वाची माहिती
19
युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला! १९३ ड्रोनमधून गोळीबार, मॉस्कोतील दोन विमानतळ बंद
20
Mid-Size SUV: २० लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये घरी आणा 'या' ५ जबरदस्त मिड- साइज एसयूव्ही कार!

देशातील घडामोडींसाठी यापुढे ब्रिटिशांना दोष देता येणार नाही : मोहन भागवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 22:48 IST

गुलाम होतो तेव्हा कसेही वागलेले चालले, आता विचारपूर्वक वागावे लागेल. यापुढच्या कोणत्याही गोष्टींसाठी ब्रिटिशांना दोषी धरता येणार नाही, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देरा.स्व. संघाचा नवोत्सव कार्यक्रम

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : राजकीय दृष्टीने खंडित असला तरी आपला देश आता स्वतंत्र झाला आहे. आता देशाचे स्वातंत्र्य टिकविणे, राज्य सुचारुपणे चालविणे ही आपली जबाबदारी आहे. यापुढे देशाचे जे काही चांगले वाईट होईल, त्यासाठी आपण जबाबदार असू. गुलाम होतो तेव्हा कसेही वागलेले चालले, आता विचारपूर्वक वागावे लागेल. यापुढच्या कोणत्याही गोष्टींसाठी ब्रिटिशांना दोषी धरता येणार नाही, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले.

रा. स्व. संघाच्या नागपूर महानगरच्यावतीने 'नवोत्सव २०२०' हा गुणवत्ता प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम गुरुवारी यशवंत स्टेडियम येथे आयोजित करण्यात आला. या अंतर्गत सामूहिक शारीरिक प्रात्यक्षिक व स्पर्धेचेआयोजन करण्यात आले. याप्रसंगी संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी, विदर्भ प्रांत संघचालक राम हरकरे, नागपूर महानगर संघचालक राजेश लोया, महानगर सहसंघचालक श्रीधर गाडगे आदी उपस्थित होते. यावेळी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना डॉ. भागवत म्हणाले, रा. स्व. संघाच्या या गुणवत्ता प्रात्यक्षिक कार्यक्रमातूनच अनुशासन व स्वयंसेवकांमध्ये गुणनिर्मिती होते. संघाच्या या कार्यक्रमातून वैयक्तिक नाही तर सामूहिकतेची भावना वाढते. अनुशासन, भक्ती आणि विवेक जागवून  राष्ट्रबांधणीसाठी कार्य करण्याची भावना या उपक्रमातून होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांची भावना प्रत्यक्ष आचरण करण्याची साधना आहे.  राष्ट्र आणि मानवतेच्या उत्थानासाठी कार्य करण्याची प्रेरणा यातून मिळते. ज्ञान म्हणजे माहितीचा योग्य उपयोग करण्याची दिशा आणि लक्ष्य निर्धारीत करण्याची पद्धत होय. यातून संपूर्ण समाजाला एकत्रित करून विश्वाला मानवता देणारा भारत निर्माण करायचा आहे. समाजात ज्या प्रकारचे परिवर्तन हवे आहे, त्या प्रकारचे आपले आचरण असायला हवे. दैनंदिन जीवनात नागरिकता अनुशासनाचे पालन करणे हीच देशभक्तीची अभिव्यक्ती होय. त्यामुळे नागरिक आणि सामाजिक अनुशासन राखणे ही आपली सवय बनावी. संपूर्ण समाजाचे जीवन व्यवस्थित चालेल या समाजार्पण वृत्तीने कार्य करावे लागेल आणि या आधारावरच आपला देश परमवैभवसंपन्न होईल, अशी भावना डॉ. भागवत यांनी व्यक्त केली.
यावेळी सोमलवाडा भागाच्या तीन गणांनी गणसमानताचे प्रात्यक्षिक सादर केले. मोहिते भागाने नियुद्ध कला, इतवारी भागाने सामूहिक गन समता, लालगंज भागाने पदविन्यास कला, सदर-गिट्टीखदान भागाने योगासन, त्रिमूर्तीनगर भागाने दंड क्रमिक, अयोध्या भागाने योगासन, नंदनवन भागाच्य स्वयंसेवकांनी विनाशस्त्र नियुद्ध कला व अजनी भागाने गीताचे सादरीकरण केले. प्रास्ताविक करताना महानगर संघचालक राजेश लोया यांनी स्पर्धेचे निकाल जाहीर केले. स्पर्धेत प्रथम क्रमांक घोष, द्वितीय नंदनवन भाग व तृतीय क्रमांक धरमपेठ आणि सोमलवाडा भागांनी संयुक्तरीत्या पटकाविला.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMohan Bhagwatमोहन भागवत