शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
4
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
5
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
6
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
7
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
8
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
9
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
10
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
11
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
12
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
13
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
14
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
15
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
16
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
17
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
18
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
19
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
20
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

व्हॅटअंतर्गत ‘मिसमॅच’ समाधान योजना आणावी ;शासनाकडे ‘कॅट’ची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 00:13 IST

राज्य शासनाने व्हॅटअंतर्गत व्यापाऱ्यांना दिलासा देणारी ‘मिसमॅच’ समाधान योजना आणावी, अशी मागणी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) केली आहे.

ठळक मुद्देविक्रीकर विभागातर्फे रिटेल व्यापाऱ्यांना त्रास

लोकमत न्यूज नेटवर्क                 नागपूर : राज्य शासनाने व्हॅटअंतर्गत व्यापाऱ्यांना दिलासा देणारी ‘मिसमॅच’ समाधान योजना आणावी, अशी मागणी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) केली आहे.‘कॅट’च्या सेंट्रल एव्हेन्यू येथील सभागृहात आयोजित एका कार्यक्रमात ‘कॅट’चे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया म्हणाले, महाराष्ट्रात व्हॅटमधील नोंदणीकृत रिटेल व्यापारी व्हॅट भरून माल खरेदी करतात, पण कंपन्यांचे विक्रेते सरकारी खजिन्यात कराची रक्कम जमा करीत नाहीत. त्यामुळे सरकार नोंदणीकृत व्यापाऱ्यांना वस्तूंच्या पूर्ण किमतीवर व्हॅट भरण्यास सांगते. तसे पाहता वितरकांतर्फे खरेदी केलेल्या मालावर एमआरपीच्या जवळपास ८० टक्के किमतीवर व्हॅट पूर्वीच गोळा होतो. पण खरेदीवेळी नोंदणीकृत रिटेल व्यापाऱ्यांनी पूर्ण व्हॅट भरल्याचे सरकार विसरते. अशास्थितीत रिटेल व्यापाऱ्यांना त्रास देणे हा अन्याय आहे. अनेक रिटेल व्यापारी कम्पोझिशन स्कीममध्ये असून त्यांच्याकडून सरकारला कराचा पूर्ण पैसा मिळाला आहे. त्यानंतरही वसुलीच्या भूमिकेत विक्रीकर विभागाच्या अधिकाऱ्यांचे व्यापाऱ्यांना त्रास देणे सुरूच आहे.नागपूर चिल्लर किराणा व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख म्हणाले, विक्रीकर विभाग ज्या लोकांनी कर वा रिटर्न भरला नाही, अशांना सोडून इमानदार रिटेल व्यापाऱ्यांना त्रास देत आहे. त्यामुळे विभागाची प्रतिमा व्यापाऱ्यांमध्ये खराब होत आहे. त्यामुळे व्यापारी कायद्यापासून दूर जात आहेत.रिटेल व्यापारी मोठ्या कंपन्यांचा माल त्यांनी नियुक्त केलेल्या विक्रेत्यांकडून खरेदी करतात. अशास्थितीत जर विक्रेता संग्रहित केलेला व्हॅट सरकारकडे भरत नसतील तर त्याची जबाबदारी कंपन्यांनी घ्यावी, असे अनिल नागपाल म्हणाले.ज्ञानेश्वर रक्षक म्हणाले, ही बाब विक्रीकर विभागाच्या सहआयुक्तांसमोर वारंवार मांडली. लेखी निवेदनही दिले, पण त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. उलट रिटेल व्यापाऱ्यांवर दंड आकारला. विभागाच्या नोटीसने व्यापारी त्रस्त असून तोडगा न निघाल्यास आंदोलनाची भूमिका राहील.कार्यक्रमात ‘कॅट’चे चेअरमन गोपाल अग्रवाल, अध्यक्ष किशोर धाराशिवकर, महासचिव फारुखभाई अकबानी, सुभाष जोबनपुत्रा, राजकुमार गुप्ता, निखिलेश ठाकर, रवींद्र गुप्ता, रवींद्र पडगिलवार, मोरेश्वर काकडे, मधुसूदन त्रिवेदी, विजय गुप्ता, रमेश उमाठे, सतीश बंग, आरिफ खान, स्वर्णिमा सिन्हा, छाया शर्मा, मीना वसाक, ज्योती अवस्थी, जयश्री गुप्ता, एस.बी. भुतोलिया, रेखा चतुर्वेदी आणि संजीवनी चौधरी उपस्थित होते.

टॅग्स :nagpurनागपूर