शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

कुलभूषण जाधव यांना भारतात परत आणू : अ‍ॅड. हरीश साळवे यांचा विश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 00:15 IST

पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना एक दिवस परत आणू, असा विश्वास माजी सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया व सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील अ‍ॅड. हरीश साळवे यांनी शनिवारी दत्तोपंत ठेंगडी व्याख्यानमालेत व्यक्त केला.

ठळक मुद्देसंपूर्ण जगाचे लक्ष असल्यामुळे पाकिस्तानवर दबाव

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना एक दिवस परत आणू, असा विश्वास माजी सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया व सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील अ‍ॅड. हरीश साळवे यांनी शनिवारी दत्तोपंत ठेंगडी व्याख्यानमालेत व्यक्त केला. ते लंडन येथून ऑनलाईन बोलले.  अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेच्यावतीने हे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. ‘आंतरराष्ट्रीय न्यायालयातील कुलभूषण जाधव प्रकरणाचे विश्लेषण व माझे अनुभव’ हा व्याख्यानाचा विषय होता. पाकिस्तानने कुलभूषण जाधव प्रकरणात सुरुवातीपासूनच व्हिएन्ना कन्व्हेन्शन व मानवाधिकाराचे पालन केले नाही. पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने जाधव यांना हेरगिरी व दहशतवादी कारवायाच्या आरोपाखाली दोषी ठरवून फाशीची शिक्षा दिल्यानंतर आपण आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागून विजय मिळवला. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने भारताचे मुद्दे उचलून धरून जाधव यांना हेरगिरी व दहशतवादी कारवायाच्या आरोपाखाली दोषी ठरविण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचा व तेव्हापर्यंत फाशीची शिक्षा स्थगित ठेवण्याचा आदेश पाकिस्तानला दिला. तसेच, जाधव यांना भारत कायदेशीर मदत करेल असेही स्पष्ट केले. हा भारताचा मोठा विजय आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निर्णय लक्षात घेता पाकिस्तानने जाधव यांना आतापर्यंत मानवतेच्या आधारावर सोडायला हवे होते. यासाठी भारताने पाकिस्तानला पाच-सहा पत्रेही पाठवली आहेत. परंतु, पाकिस्तानमध्ये अहंकार ठासून भरला आहे. सध्या ते जाधव यांना सोडतील असे दिसत नाही. त्यामुळे आपण पुन्हा आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाण्याचा विचार करीत आहोत असे अ‍ॅड. साळवे यांनी सांगितले.पाकिस्तानमधील न्यायालयाने भारतीय नागरिक सरबजितसिंग यांनाही फाशीची शिक्षा सुनावली होती. दरम्यान, कारागृहातील एका बंदिवानाने प्राणघातक हल्ला केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. याकडे एका प्रश्नाद्वारे अ‍ॅड. साळवे यांचे लक्ष वेधले असता, त्यांनी कुलभूषण जाधव यांच्यासंदर्भात असे होणार नाही असे मत व्यक्त केले. हे प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयात चालल्यामुळे त्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. परिणामी, पाकिस्तान एवढा वाईट वागणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.  

जगाला भारतीय परंपरेची ओळख करून दिलीजाधव यांचे प्रकरण सुरू असताना पाकिस्तानचे वकील कुरैशी यांनी धमकी देणारे पत्र लिहिले होते. तसेच, न्यायालयातही भारतासंदर्भात आक्षेपार्ह शब्दांचा उपयोग केला होता. परंतु, आपण त्यांना अत्यंत संयमाने उत्तर दिले. आपण न्यायालयाचा आदर करतो व भारतीय परंपरा अशा पद्धतीने वागण्याची अनुमती देत नाही हे आपण जगाला दाखवनू दिले. प्रकरण संपल्यानंतर न्यायालयाच्या व्यवस्थापकांनी भारताच्या संयमी वागण्याची प्रशंसा केली, असे अ‍ॅड. साळवे यांनी अभिमानाने सांगितले.पाकिस्तानने अवैध पद्धतीने प्रकरण तयार केलेपाकिस्तानने कुलभूषण जाधव यांच्याविरुद्ध अवैध पद्धतीने प्रकरण तयार केले हे जागोजागी दिसून येते. जाधव यांचा मोघम पद्धतीचा कबुलीजबाब तयार करण्यात आला. त्यात विशिष्ट प्रसंगाचा उल्लेख नव्हता. तारखा बरोबर नव्हत्या. यासह विविध त्रुटी होत्या. त्या आधारावर कबुलीजबाब निरर्थक ठरतो. त्यानंतर प्रकरणात काहीच वाचत नाही. जाधव यांच्याकडे बनावट पासपोर्ट होता हे मान्य केले तरी, त्यासाठी फाशीची शिक्षा दिली जाऊ शकत नाही. याशिवाय जाधव यांच्याविरुद्ध वेगवेगळे गुन्हे दाखविण्यात आले आहेत. परंतु, त्याकरिता वेगवेगळे एफआयआर नोंदविण्यात आले नाही व स्वतंत्र खटले चालविण्यात आले नाही. भारताला जाधव यांच्या अटकेची माहिती खूप उशिरा देण्यात आली. त्यानंतर जाधव यांना कायदेशीर मदत करण्याची अनुमतीही देण्यात आली नाही. या सर्वांचे समाधानकारक उत्तर पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय न्यायालयात देता आले नाही, अशी माहिती अ‍ॅड. साळवे यांनी दिली.

टॅग्स :Kulbhushan Jadhavकुलभूषण जाधवPakistanपाकिस्तान