शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

कुलभूषण जाधव यांना भारतात परत आणू : अ‍ॅड. हरीश साळवे यांचा विश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 00:15 IST

पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना एक दिवस परत आणू, असा विश्वास माजी सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया व सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील अ‍ॅड. हरीश साळवे यांनी शनिवारी दत्तोपंत ठेंगडी व्याख्यानमालेत व्यक्त केला.

ठळक मुद्देसंपूर्ण जगाचे लक्ष असल्यामुळे पाकिस्तानवर दबाव

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना एक दिवस परत आणू, असा विश्वास माजी सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया व सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील अ‍ॅड. हरीश साळवे यांनी शनिवारी दत्तोपंत ठेंगडी व्याख्यानमालेत व्यक्त केला. ते लंडन येथून ऑनलाईन बोलले.  अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेच्यावतीने हे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. ‘आंतरराष्ट्रीय न्यायालयातील कुलभूषण जाधव प्रकरणाचे विश्लेषण व माझे अनुभव’ हा व्याख्यानाचा विषय होता. पाकिस्तानने कुलभूषण जाधव प्रकरणात सुरुवातीपासूनच व्हिएन्ना कन्व्हेन्शन व मानवाधिकाराचे पालन केले नाही. पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने जाधव यांना हेरगिरी व दहशतवादी कारवायाच्या आरोपाखाली दोषी ठरवून फाशीची शिक्षा दिल्यानंतर आपण आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागून विजय मिळवला. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने भारताचे मुद्दे उचलून धरून जाधव यांना हेरगिरी व दहशतवादी कारवायाच्या आरोपाखाली दोषी ठरविण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचा व तेव्हापर्यंत फाशीची शिक्षा स्थगित ठेवण्याचा आदेश पाकिस्तानला दिला. तसेच, जाधव यांना भारत कायदेशीर मदत करेल असेही स्पष्ट केले. हा भारताचा मोठा विजय आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निर्णय लक्षात घेता पाकिस्तानने जाधव यांना आतापर्यंत मानवतेच्या आधारावर सोडायला हवे होते. यासाठी भारताने पाकिस्तानला पाच-सहा पत्रेही पाठवली आहेत. परंतु, पाकिस्तानमध्ये अहंकार ठासून भरला आहे. सध्या ते जाधव यांना सोडतील असे दिसत नाही. त्यामुळे आपण पुन्हा आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाण्याचा विचार करीत आहोत असे अ‍ॅड. साळवे यांनी सांगितले.पाकिस्तानमधील न्यायालयाने भारतीय नागरिक सरबजितसिंग यांनाही फाशीची शिक्षा सुनावली होती. दरम्यान, कारागृहातील एका बंदिवानाने प्राणघातक हल्ला केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. याकडे एका प्रश्नाद्वारे अ‍ॅड. साळवे यांचे लक्ष वेधले असता, त्यांनी कुलभूषण जाधव यांच्यासंदर्भात असे होणार नाही असे मत व्यक्त केले. हे प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयात चालल्यामुळे त्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. परिणामी, पाकिस्तान एवढा वाईट वागणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.  

जगाला भारतीय परंपरेची ओळख करून दिलीजाधव यांचे प्रकरण सुरू असताना पाकिस्तानचे वकील कुरैशी यांनी धमकी देणारे पत्र लिहिले होते. तसेच, न्यायालयातही भारतासंदर्भात आक्षेपार्ह शब्दांचा उपयोग केला होता. परंतु, आपण त्यांना अत्यंत संयमाने उत्तर दिले. आपण न्यायालयाचा आदर करतो व भारतीय परंपरा अशा पद्धतीने वागण्याची अनुमती देत नाही हे आपण जगाला दाखवनू दिले. प्रकरण संपल्यानंतर न्यायालयाच्या व्यवस्थापकांनी भारताच्या संयमी वागण्याची प्रशंसा केली, असे अ‍ॅड. साळवे यांनी अभिमानाने सांगितले.पाकिस्तानने अवैध पद्धतीने प्रकरण तयार केलेपाकिस्तानने कुलभूषण जाधव यांच्याविरुद्ध अवैध पद्धतीने प्रकरण तयार केले हे जागोजागी दिसून येते. जाधव यांचा मोघम पद्धतीचा कबुलीजबाब तयार करण्यात आला. त्यात विशिष्ट प्रसंगाचा उल्लेख नव्हता. तारखा बरोबर नव्हत्या. यासह विविध त्रुटी होत्या. त्या आधारावर कबुलीजबाब निरर्थक ठरतो. त्यानंतर प्रकरणात काहीच वाचत नाही. जाधव यांच्याकडे बनावट पासपोर्ट होता हे मान्य केले तरी, त्यासाठी फाशीची शिक्षा दिली जाऊ शकत नाही. याशिवाय जाधव यांच्याविरुद्ध वेगवेगळे गुन्हे दाखविण्यात आले आहेत. परंतु, त्याकरिता वेगवेगळे एफआयआर नोंदविण्यात आले नाही व स्वतंत्र खटले चालविण्यात आले नाही. भारताला जाधव यांच्या अटकेची माहिती खूप उशिरा देण्यात आली. त्यानंतर जाधव यांना कायदेशीर मदत करण्याची अनुमतीही देण्यात आली नाही. या सर्वांचे समाधानकारक उत्तर पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय न्यायालयात देता आले नाही, अशी माहिती अ‍ॅड. साळवे यांनी दिली.

टॅग्स :Kulbhushan Jadhavकुलभूषण जाधवPakistanपाकिस्तान