शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

पावसामुळे पूल वाहून गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:13 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे रामटेकनजीकच्या हिवरी-हिवरी मार्गातील पूल वाहून गेला. या भागात मंगळवारी (दि.१४) ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे रामटेकनजीकच्या हिवरी-हिवरी मार्गातील पूल वाहून गेला. या भागात मंगळवारी (दि.१४) पाच तासांत ८५ मिमी पाऊस पडला. पावसामुळे पूल खचल्याने जि. प. बांधकाम विभागाने या मार्गावरील चारचाकी वाहतूक बंद केली आहे. केवळ दुचाकी वाहने ये-जा करीत आहेत. मागील वर्षी ९ सप्टेंबर २०२० ला अर्धा अधिक पूल खचला हाेता. त्यावेळी जि. प. बांधकाम विभागाने तात्पुरती दुरुस्ती केली हाेती, हे विशेष.

पूल वाहून गेल्याने मार्गावरील वाहतूक बंद झाली असून, या ठिकाणी अपघाताची शक्यता बळावली आहे. त्यामुळे या ठिकाणी नवीन पुलाची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. तीन वर्षांपूर्वी रामटेक ते हिवरा-हिवरी मार्गावरील नाल्यावर पुलाचे बांधकाम करण्यात आले. या पुलाचे बांधकाम निकृष्ट झाल्याने अल्पवधीतच पुलाला भगदाड पडण्यास सुरुवात झाली. परंतु, संबंधित विभागाने त्याची दखल घेतली नाही. याबाबत ‘लाेकमत’ने वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले हाेते. मात्र, प्रशासन वा लाेकप्रतिनिधींनी त्याकडे लक्षच दिले नाही.

परिसरात १४ सप्टेंबरला जाेरदार पाऊस पडला. पाण्याच्या तेज प्रवाहामुळे अर्धाअधिक पूल एका बाजूच्या भिंतीसह वाहून गेला. या मार्गावर कन्हान, माैदा, नागपूर, तसेच परिसरातील गावात ये-जा करणाऱ्यांची वर्दळ सुरू असते. परंतु, हा पूल खचल्याने चारचाकी वाहतूक बंद झाली आहे. केवळ ३ किमी अंतरावरील रामटेकला चारचाकीने यायचे कसे, शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरची कामे करायची कशी, असे प्रश्न उभे ठाकले आहे. याबाबत जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता पाटील यांना विचारले असता, कार्यकारी अभियंत्यांची मंजुरी घेऊन पाऊस थांबल्यानंतर पुलाच्या दुरुस्तीचे काम करावे लागेल. काम अधिक आहे. सुरक्षेच्या दृष्टीने सध्या चारचाकी वाहतूक बंद केली असून, या ठिकाणी नवीन पूल बांधावा लागेल, अशी माहिती त्यांनी दिली.

या पुलाची तत्काळ दुरुस्ती करून जड वाहतूक बंद करावी, तसेच नवीन पुलाचे बांधकाम करण्याची मागणी सरपंच रेखा मल्लेवार, माजी सरपंच दिलीप काठाेके, उपसरपंच विष्णू काठाेके, माधाे मल्लेवार, लाेकेश डहाके, अण्णाभाऊ चाफले, कमलाकर हिंगे, रमेश नाटकर यांच्यासह गावकऱ्यांनी केली आहे. त्यामुळे प्रशासन आता काय कारवाई करणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.