शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

धर्माच्या भिंती तोडा, सेतू बांधा

By admin | Updated: September 12, 2014 00:48 IST

धर्माबद्दल असलेला अहंकारामुळेच आज जगात अशांततेचे वातावरण पसरले आहे. देशातच नव्हे तर जगात शांतता निर्माण करायची असेल तर धर्माच्या भिंती तोडून सेतू बांधण्याची गरज आहे, असे आवाहन माजी

विश्वबंधूत्व दिन : अरविंद खांडेकर यांचे आवाहन नागपूर : धर्माबद्दल असलेला अहंकारामुळेच आज जगात अशांततेचे वातावरण पसरले आहे. देशातच नव्हे तर जगात शांतता निर्माण करायची असेल तर धर्माच्या भिंती तोडून सेतू बांधण्याची गरज आहे, असे आवाहन माजी प्राचार्य अरविंद खांडेकर यांनी केले. विवेकानंद केंद्र कन्याकुमारी शाखा नागपूरतर्फे विश्वबंधुत्व दिनानिमित्त गुरुवारी साई सभागृह येथे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी खांडेकर हे मुख्य वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रसिद्ध उद्योजक विलास काळे होते तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी पदाधिकारी विजय सवनकर हे मुख्य अतिथी होते. ‘विश्वबंधुत्वाचा आधार-परिवार’ या विषयावर बोलताना अरविंद खांडेकर म्हणाले, विश्वबंधुत्वचा आधारा हा मुळातच कुटुंब हाच आहे. संस्कार हे कुटुंबातूनेच मिळत असतात. संस्कारक्षम अशी आपली भारतीय संस्कृती होती. परंतु आजच्या उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबव्यवस्थेमुळे ही संस्कृती धोक्यात आली आहे. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. जगाने कितीही प्रगती केली असली तरी स्नेह व प्रेम हे विकत घेता येत नाही. ते कुटुंबातूनच मिळत असते. दीप प्रज्वलन करून कुठल्याही कामाची सुरुवात करण्याची आपली परंपरा होती. परंतु सध्या दिवा विझवून वाढदिवस साजरा करण्याची प्रथा सुरू झाली आहे, असा चिमटा सुद्धा त्यांनी यावेळी काढला. कोणताही धर्म श्रेष्ठ नाही, सर्वच धर्म श्रेष्ठ आहेत, असा संदेश दिला. माझे बंधू आणि भगिनींनो असे संबोधून भारतीय संस्कृतीचे जगाला दर्शन घडवून दिले, असेही त्यांनी स्पष्ट केले. विलास काळे यांनी स्वामी विवेकानंदांच्या विचारांमुळे आपल्या जीवनात आमूलाग्र बदल झाला असून आज आपण आनंदाने व समाधानाने जगत असल्याचा विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी दहावी व बारावीच्या परीक्षेत यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. मानसी व वैदेही यांनी गीत सादर केले. गीताताई केळकर यांनी कार्यक्रमाची पार्श्वभूमी विषद केली. मंगेश गिरी यांनी प्रास्ताविक केले. अर्चना लपालकर यांनी संचालन केले. विवेकानंद केंद्राच्या नगरप्रमुख गौरीताई खेर यांनी आभार मानले. तर वेदवती खेर यांनी सादर केलेल्या वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता झाली. (प्रतिनिधी)