शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

धर्माच्या भिंती तोडा, सेतू बांधा

By admin | Updated: September 12, 2014 00:48 IST

धर्माबद्दल असलेला अहंकारामुळेच आज जगात अशांततेचे वातावरण पसरले आहे. देशातच नव्हे तर जगात शांतता निर्माण करायची असेल तर धर्माच्या भिंती तोडून सेतू बांधण्याची गरज आहे, असे आवाहन माजी

विश्वबंधूत्व दिन : अरविंद खांडेकर यांचे आवाहन नागपूर : धर्माबद्दल असलेला अहंकारामुळेच आज जगात अशांततेचे वातावरण पसरले आहे. देशातच नव्हे तर जगात शांतता निर्माण करायची असेल तर धर्माच्या भिंती तोडून सेतू बांधण्याची गरज आहे, असे आवाहन माजी प्राचार्य अरविंद खांडेकर यांनी केले. विवेकानंद केंद्र कन्याकुमारी शाखा नागपूरतर्फे विश्वबंधुत्व दिनानिमित्त गुरुवारी साई सभागृह येथे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी खांडेकर हे मुख्य वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रसिद्ध उद्योजक विलास काळे होते तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी पदाधिकारी विजय सवनकर हे मुख्य अतिथी होते. ‘विश्वबंधुत्वाचा आधार-परिवार’ या विषयावर बोलताना अरविंद खांडेकर म्हणाले, विश्वबंधुत्वचा आधारा हा मुळातच कुटुंब हाच आहे. संस्कार हे कुटुंबातूनेच मिळत असतात. संस्कारक्षम अशी आपली भारतीय संस्कृती होती. परंतु आजच्या उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबव्यवस्थेमुळे ही संस्कृती धोक्यात आली आहे. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. जगाने कितीही प्रगती केली असली तरी स्नेह व प्रेम हे विकत घेता येत नाही. ते कुटुंबातूनच मिळत असते. दीप प्रज्वलन करून कुठल्याही कामाची सुरुवात करण्याची आपली परंपरा होती. परंतु सध्या दिवा विझवून वाढदिवस साजरा करण्याची प्रथा सुरू झाली आहे, असा चिमटा सुद्धा त्यांनी यावेळी काढला. कोणताही धर्म श्रेष्ठ नाही, सर्वच धर्म श्रेष्ठ आहेत, असा संदेश दिला. माझे बंधू आणि भगिनींनो असे संबोधून भारतीय संस्कृतीचे जगाला दर्शन घडवून दिले, असेही त्यांनी स्पष्ट केले. विलास काळे यांनी स्वामी विवेकानंदांच्या विचारांमुळे आपल्या जीवनात आमूलाग्र बदल झाला असून आज आपण आनंदाने व समाधानाने जगत असल्याचा विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी दहावी व बारावीच्या परीक्षेत यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. मानसी व वैदेही यांनी गीत सादर केले. गीताताई केळकर यांनी कार्यक्रमाची पार्श्वभूमी विषद केली. मंगेश गिरी यांनी प्रास्ताविक केले. अर्चना लपालकर यांनी संचालन केले. विवेकानंद केंद्राच्या नगरप्रमुख गौरीताई खेर यांनी आभार मानले. तर वेदवती खेर यांनी सादर केलेल्या वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता झाली. (प्रतिनिधी)