शहरं
Join us  
Trending Stories
1
टोल कंपनीने ११०० रुपये बोनस दिला; टोल प्लाझावरील कर्मचाऱ्यांनी असा बदला घेतला, १० हजार गाड्या फ्रीमध्ये सोडल्या...
2
नवी मुंबईत अग्नितांडव! वाशीतील आगीत ६ वर्षांच्या मुलीसह ४ जणांचा मृत्यू, १० जण जखमी
3
२०४७ पर्यंतचा विकासाचा रोडमॅप, व्हिजन डॉक्युमेंटचा मसुदा मंजूर, CM फडणवीस स्वतः घेणार आढावा
4
नवी मुंबईत भीषण आगीत होरपळून माय-लेकीचा मृत्यू; सिलिंडर स्फोटानंतर इतर बाहेर पडले पण दोघी अडकल्या
5
आजचे राशीभविष्य २१ ऑक्टोबर २०२५ : धनप्राप्ती होईल, लक्ष्मी पुजनाच्या दिवशी कोणाच्या राशीत काय लिहिलेय...
6
लष्करातील समन्वयामुळे पाकिस्तानने गुडघे टेकले; PM मोदी यांचे भारतीय सैन्याबद्दल कौतुकोद्गार
7
रात्री पार्टी, बहिणीला व्हिडीओ कॉल अन् पहाटे पत्नीचा मृत्यू; मृतदेह सोडून विधानसभा अध्यक्षांचा पुतण्या फरार
8
भारत नक्षलवादाच्या समूळ उच्चाटनाच्या उंबरठ्यावर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास
9
आता उद्धव ठाकरे म्हणाले... मी पुन्हा येईन, महापालिकेवर भगवा फडकवीन; मतांची चोरी पकडली
10
'हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं'... डायलॉग अजरामर करणारे अभिनेते असरानी कालवश
11
महसूलमधील ‘पदोन्नती’चा अनुशेष तीन महिन्यांत भरणार; ४७ अधिकाऱ्यांना पदोन्नतीची दिवाळी भेट
12
महाराष्ट्र देशात अव्वल; पण ‘माहितीचा अधिकार’ अधांतरी, चार लाखांहून अधिक अपिले रखडली
13
बिहार निवडणूक २०२५: काँग्रेसची विचित्र स्थिती, उमेदवारी वाटपात गोंधळ; जुनी पोस्ट व्हायरल, अन्…
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिली पुन्हा धमकी; रशियाकडून तेल आयात थांबवा अन्यथा...
15
मुंबईमध्ये दिवाळीच्या धामधुमीत ३ दिवसांत आगीच्या २५ घटना; वाहन बॅटरीचा स्फोट, एकाचा मृत्यू
16
ऐन दिवाळीत थंडी गायब; अजून काही दिवस उष्म्याचे, इतक्यात तरी पारा घसरायची चिन्हे नाहीत! 
17
लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला चांदी एक हजाराने स्वस्त; सोनेही घटले 
18
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
19
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
20
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."

कर्नाटक, कोल्हापूरला ब्रेक, आता लागले केरळचे वेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 22:14 IST

महिला व बाल कल्याण आणि स्वच्छता व पाणी पुरवठा विभागातर्फे कर्नाटक व कोल्हापूर अशा अभ्यास दौऱ्यांचे नियोजन करण्यात आले होते. पण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर काढण्यात येत असलेल्या दौऱ्यांवरून टीकेची चांगलीच झोड उठली होती. त्यामुळे या दोन दौऱ्यांना कसाबसा ब्रेक लागला असताना, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या केरळ दौऱ्याचे पत्र विभागाला प्राप्त झाले आहे. त्यामुळे आता जि.प.च्या सत्ताधाऱ्यांना केरळच्या दौऱ्याचे वेध लागले आहे. पण या दौऱ्यांवरून जिल्हा परिषदेत चांगलीच चर्चा रंगते आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेच्या दौऱ्यांची रंगतेय चर्चा : सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महिला व बाल कल्याण आणि स्वच्छता व पाणी पुरवठा विभागातर्फे कर्नाटक व कोल्हापूर अशा अभ्यास दौऱ्यांचे नियोजन करण्यात आले होते. पण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर काढण्यात येत असलेल्या दौऱ्यांवरून टीकेची चांगलीच झोड उठली होती. त्यामुळे या दोन दौऱ्यांना कसाबसा ब्रेक लागला असताना, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या केरळ दौऱ्याचे पत्र विभागाला प्राप्त झाले आहे. त्यामुळे आता जि.प.च्या सत्ताधाऱ्यांना केरळच्या दौऱ्याचे वेध लागले आहे. पण या दौऱ्यांवरून जिल्हा परिषदेत चांगलीच चर्चा रंगते आहे.दौऱ्याचे पत्र प्राप्त झाल्यानंतर स्वत: जिल्हा परिषद अध्यक्षांनी मर्जीतील काही सदस्यांना फोन करून तयारी करावी, अशा सूचना केल्यात़ त्यामुळे सत्ता पक्षांची हौस संपता संपत नसल्याचे या सर्व प्रकारावरून दृष्टिपथास येत आहे़ दुष्काळाची पार्श्वभूमी आणि मान्सूनचा विलंब त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य चिंतेत आहे़ ग्रामीण जनता जिल्हा परिषदेला समस्या सोडविण्यासाठी जाब विचारत आहे़ दौऱ्याला ब्रेक लागण्याच्या कारणांची माहिती घेतली असता, पाणीपुरवठा व स्वच्छता मिशनतर्फे जि.प. सदस्य कोल्हापूरच्या दौऱ्यावर जाणार होते. परंतु दौऱ्यासाठी तरतूद करण्यात आलेली रक्कम कमी पडत असल्याने ती वाढवून पुन्हा निविदा बोलावण्याची प्रक्रिया करण्यात येत आहे़ महिला बालकल्याणच्या दौऱ्याला कंत्राटदार मिळत नसल्याने त्याची ही तारीख वाढविणे सुरू आहे़ या दौऱ्यावरून प्रसारमाध्यमांत टीका झाल्यानंतर सीईओ संजय यादव यांनी सर्व नियमात राहून करा अन्यथा दौरा रद्द करण्याच्या सूचना केल्या आहेत़ त्यामुळे दोन्ही दौरे अडचणीत सापडले आहे़ आता केरळ दौऱ्याचे पत्र प्राप्त झाल्याने केरळ दौऱ्याकडे मोर्चा वळविला आहे. १५ सदस्य या दौऱ्यांमध्ये सहभागी होणार असून जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती व सदस्यांचा यात समावेश राहणार आहे़ या दौऱ्यावर ५ लाख २० हजार रुपयांची तरतूद राहणार असून २५ ते २८ जून, असा हा दौरा राहील़ हा दौरा केवळ महिला सदस्यांसाठीच असावा, असेही महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या सीईओ आऱ. विमला यांनी आदेशात स्पष्ट बजावले आहे़ केरळ राज्यात तेथील कुटुंबश्री संस्थेमार्फत होत असलेली कार्यक्रमाची अंमलबजावणी आपल्या जिल्ह्यात करण्याचे हेतूने हा दौरा आयोजित आहे़दौऱ्यांचा मोह कशाला?सत्तापक्षाने मागील सहा महिन्यांत जवळपास सहा दौरे केले आहे़ या दौऱ्यातून केवळ पर्यटन होते, हे अधिक स्पष्ट आहे़ अभ्यास दौऱ्यातील एकही संकल्पना नागपूर जिल्ह्यात सत्तापक्षाने राबविली नाही़ आता विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागायला दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे़ त्यामुळे पुढे मिळते की नाही या तत्त्वावर सत्तापक्ष ही सर्व उठाठेव करीत असल्याचे समोर येत आहे़

 

टॅग्स :Nagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूरtourismपर्यटन