शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

कर्नाटक, कोल्हापूरला ब्रेक, आता लागले केरळचे वेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 22:14 IST

महिला व बाल कल्याण आणि स्वच्छता व पाणी पुरवठा विभागातर्फे कर्नाटक व कोल्हापूर अशा अभ्यास दौऱ्यांचे नियोजन करण्यात आले होते. पण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर काढण्यात येत असलेल्या दौऱ्यांवरून टीकेची चांगलीच झोड उठली होती. त्यामुळे या दोन दौऱ्यांना कसाबसा ब्रेक लागला असताना, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या केरळ दौऱ्याचे पत्र विभागाला प्राप्त झाले आहे. त्यामुळे आता जि.प.च्या सत्ताधाऱ्यांना केरळच्या दौऱ्याचे वेध लागले आहे. पण या दौऱ्यांवरून जिल्हा परिषदेत चांगलीच चर्चा रंगते आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेच्या दौऱ्यांची रंगतेय चर्चा : सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महिला व बाल कल्याण आणि स्वच्छता व पाणी पुरवठा विभागातर्फे कर्नाटक व कोल्हापूर अशा अभ्यास दौऱ्यांचे नियोजन करण्यात आले होते. पण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर काढण्यात येत असलेल्या दौऱ्यांवरून टीकेची चांगलीच झोड उठली होती. त्यामुळे या दोन दौऱ्यांना कसाबसा ब्रेक लागला असताना, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या केरळ दौऱ्याचे पत्र विभागाला प्राप्त झाले आहे. त्यामुळे आता जि.प.च्या सत्ताधाऱ्यांना केरळच्या दौऱ्याचे वेध लागले आहे. पण या दौऱ्यांवरून जिल्हा परिषदेत चांगलीच चर्चा रंगते आहे.दौऱ्याचे पत्र प्राप्त झाल्यानंतर स्वत: जिल्हा परिषद अध्यक्षांनी मर्जीतील काही सदस्यांना फोन करून तयारी करावी, अशा सूचना केल्यात़ त्यामुळे सत्ता पक्षांची हौस संपता संपत नसल्याचे या सर्व प्रकारावरून दृष्टिपथास येत आहे़ दुष्काळाची पार्श्वभूमी आणि मान्सूनचा विलंब त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य चिंतेत आहे़ ग्रामीण जनता जिल्हा परिषदेला समस्या सोडविण्यासाठी जाब विचारत आहे़ दौऱ्याला ब्रेक लागण्याच्या कारणांची माहिती घेतली असता, पाणीपुरवठा व स्वच्छता मिशनतर्फे जि.प. सदस्य कोल्हापूरच्या दौऱ्यावर जाणार होते. परंतु दौऱ्यासाठी तरतूद करण्यात आलेली रक्कम कमी पडत असल्याने ती वाढवून पुन्हा निविदा बोलावण्याची प्रक्रिया करण्यात येत आहे़ महिला बालकल्याणच्या दौऱ्याला कंत्राटदार मिळत नसल्याने त्याची ही तारीख वाढविणे सुरू आहे़ या दौऱ्यावरून प्रसारमाध्यमांत टीका झाल्यानंतर सीईओ संजय यादव यांनी सर्व नियमात राहून करा अन्यथा दौरा रद्द करण्याच्या सूचना केल्या आहेत़ त्यामुळे दोन्ही दौरे अडचणीत सापडले आहे़ आता केरळ दौऱ्याचे पत्र प्राप्त झाल्याने केरळ दौऱ्याकडे मोर्चा वळविला आहे. १५ सदस्य या दौऱ्यांमध्ये सहभागी होणार असून जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती व सदस्यांचा यात समावेश राहणार आहे़ या दौऱ्यावर ५ लाख २० हजार रुपयांची तरतूद राहणार असून २५ ते २८ जून, असा हा दौरा राहील़ हा दौरा केवळ महिला सदस्यांसाठीच असावा, असेही महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या सीईओ आऱ. विमला यांनी आदेशात स्पष्ट बजावले आहे़ केरळ राज्यात तेथील कुटुंबश्री संस्थेमार्फत होत असलेली कार्यक्रमाची अंमलबजावणी आपल्या जिल्ह्यात करण्याचे हेतूने हा दौरा आयोजित आहे़दौऱ्यांचा मोह कशाला?सत्तापक्षाने मागील सहा महिन्यांत जवळपास सहा दौरे केले आहे़ या दौऱ्यातून केवळ पर्यटन होते, हे अधिक स्पष्ट आहे़ अभ्यास दौऱ्यातील एकही संकल्पना नागपूर जिल्ह्यात सत्तापक्षाने राबविली नाही़ आता विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागायला दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे़ त्यामुळे पुढे मिळते की नाही या तत्त्वावर सत्तापक्ष ही सर्व उठाठेव करीत असल्याचे समोर येत आहे़

 

टॅग्स :Nagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूरtourismपर्यटन