शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

BrahMos Information Leak: पाकिस्तानने खेळला दुहेरी डाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2018 10:43 IST

दहशतवाद्यांच्या माध्यमातून भारताच्या हृदयस्थळी हल्ला करण्याचे अनेक वर्षांपासून कलुषित मनसुबे बाळगणाऱ्या पाकिस्तानने सुंदर ललना आणि डॉलर्सचे आमिष दाखवून पाकिस्तान (आयएसआय)ने एका तरुण शास्त्रज्ञाला फितुरी करण्यास भाग पाडले.

ठळक मुद्देशास्त्रज्ञाला फितवले मिसाईलच्या निर्मितीस्थळी घुसखोरीभारताच्या हृदयस्थळाला छेद देण्याचा प्रयत्न

- नरेश डोंगरे लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दहशतवाद्यांच्या माध्यमातून भारताच्या हृदयस्थळी हल्ला करण्याचे अनेक वर्षांपासून कलुषित मनसुबे बाळगणाऱ्या पाकिस्तानने सुंदर ललना आणि डॉलर्सचे आमिष दाखवून पाकिस्तान (आयएसआय)ने एका तरुण शास्त्रज्ञाला फितुरी करण्यास भाग पाडले. या माध्यमातून आयएसआयने भारताला शह देण्याचा दुहेरी डाव खेळला आहे. एकीकडे भारताच्या सर्वाधिक शक्तिशाली मिसाईलच्या प्लँटमध्ये घुसखोरी केली आहे तर, दुसरीकडे निशांत अग्रवाल नामक हेराच्या माध्यमातून भारताच्या हृदयस्थळालाही आयएसआयने छेदण्याचा प्रयत्न केला आहे. ब्राह्मोस हेरगिरी प्रकरणाचा खळबळजनक उलगडा झाल्याने हादरलेल्या सुरक्षा यंत्रणांमध्ये तपासासोबतच गंभीर मंथनही सुरू झाले आहे.कधी काश्मिरात, कधी सिमेपलिकडून हल्ले करून तर कधी घुसखोरी करून उपद्र्रवी पाकिस्तान भारतात नेहमी अस्वस्थता निर्माण करण्याच्या प्रयत्नात असतो. भारतातील अन्य काही शहरांप्रमाणे भारताचे हृदयस्थळ अर्थात् नागपूर, पाकिस्तान आणि आयएसआयच्या हस्तक असलेल्या दहशतवादी संघटनांच्या आधीपासूनच हिटलिस्टवर आहे. हृदयावरचा हल्ला संपूर्ण शरीरावर गंभीर परिणाम करणारा ठरतो. हे जाणून असल्यामुळे पाकिस्तानने नागपुरातील संवेदनशील स्थळांना आधीच टार्गेट (अधोरेखित) केलेले आहे. दहा वर्षांपूर्वी पाकिस्तानी अतिरेक्यांनी संघ मुख्यालयावर हल्ला चढवला होता. हा हल्ला परतवून पाकिस्तान तसेच दहशतवाद्यांना भारतीय सुरक्षा यंत्रणांनी तोंडघशी पाडल्यामुळे नागपुरात हल्ला करण्याचे कट वेगवेगळ्या पद्धतीने रचले जात आहे. डीआरडीओच्या ब्रह्मोस एअरोस्पेस प्लँटमध्ये आपला हेर घुसवून पाकिस्तानने दुहेरी डाव साधला आहे. जाणते-अजानतेपणाने निशांत अग्रवालकडून पाकिस्तानने भारतासोबत फितुरी करण्याचे पातक घडवून आणले आहे. निशांत त्याचा हैदराबादेतील मित्र अब्राहम तसेच कानपुरातील पुन्हा एक वरिष्ठ महिला अधिकारी यांच्याकडून ब्रह्मोस संदर्भात अत्यंत संवेदनशील माहिती आयएसआयने काढून घेतली आहे. त्याची जबर किंमत भारतीय शास्त्रज्ञ आणि सुरक्षा दलाला मोजावी लागणार आहे. दरम्यान, निशांत अग्रवालला उत्तर प्रदेश एटीएसचे पथक आज नागपुरातून लखनौला घेऊन गेले. तिकडे उत्तर प्रदेशमधील अलीपूरद्वार जिल्ह्यातील आणखी एका एजंटला बुधवारी तपास यंत्रणांनी ताब्यात घेतले आहे. कानपुरातील एका महिला अधिकाऱ्याकडून जप्त करण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणातील कोडवर्डमधील गुपित जाणून घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात असल्याचे संबंधित सूत्रांचे सांगणे आहे.

महाराष्ट्राच्या सुरक्षा यंत्रणांची गोचीनेहमीच दबावतंत्राचा वापर करून भारताला दडपण्याचे धोरण अवलंबणारा अमेरिका आणि भारताला सर्वात मोठा शत्रू मानणारा पाकिस्तान महाराष्ट्राच्या उपराजधानीत आपला हेर पेरतात. तो अनेक महिन्यांपासून येथे सक्रिय असतो आणि राज्याच्या तपास यंत्रणांना त्याचा थांगपत्ताही लागत नाही. ही बाब महाराष्ट्राची सुरक्षा यंत्रणा आणि पोलिसांची गोची करणारी ठरली आहे. नागपुरात एसआयडी, सीआयडी, एएनओ तसेच एटीएससारखी तपास पथके आणि त्यांची स्वतंत्र कार्यालये आहेत. मात्र, हेरगिरी करणाऱ्या निशांत अग्रवालकडे कुणाचेच लक्ष गेले नाही. गृह मंत्रालय आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये त्याची गंभीर चर्चा सुरू असल्याचे सांगितले जाते. उत्तर प्रदेशातील तपास यंत्रणांनी पाकिस्तानी हेराला अटक केल्यामुळे राज्याच्या अन् खास करून नागपुरातील तपास यंत्रणा खजिल झाल्यासारख्या झाल्या आहेत. महाराष्ट्रातील सुरक्षा यंत्रणांना का नाही लागला आयएसआयच्या नागपुरातील नेटवर्कचा छडा, अशी विचारणा अनेकांकडे होत आहे. गृह मंत्रालयातून या संबंधाने लवकरच ‘आॅडिट’ केले जाणार असल्याचेही वरिष्ठ सूत्रांचे सांगणे आहे.

टॅग्स :Brahmos Missileब्राह्मोसPakistanपाकिस्तानIndiaभारत