शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

BrahMos Information Leak: पाकिस्तानने खेळला दुहेरी डाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2018 10:43 IST

दहशतवाद्यांच्या माध्यमातून भारताच्या हृदयस्थळी हल्ला करण्याचे अनेक वर्षांपासून कलुषित मनसुबे बाळगणाऱ्या पाकिस्तानने सुंदर ललना आणि डॉलर्सचे आमिष दाखवून पाकिस्तान (आयएसआय)ने एका तरुण शास्त्रज्ञाला फितुरी करण्यास भाग पाडले.

ठळक मुद्देशास्त्रज्ञाला फितवले मिसाईलच्या निर्मितीस्थळी घुसखोरीभारताच्या हृदयस्थळाला छेद देण्याचा प्रयत्न

- नरेश डोंगरे लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दहशतवाद्यांच्या माध्यमातून भारताच्या हृदयस्थळी हल्ला करण्याचे अनेक वर्षांपासून कलुषित मनसुबे बाळगणाऱ्या पाकिस्तानने सुंदर ललना आणि डॉलर्सचे आमिष दाखवून पाकिस्तान (आयएसआय)ने एका तरुण शास्त्रज्ञाला फितुरी करण्यास भाग पाडले. या माध्यमातून आयएसआयने भारताला शह देण्याचा दुहेरी डाव खेळला आहे. एकीकडे भारताच्या सर्वाधिक शक्तिशाली मिसाईलच्या प्लँटमध्ये घुसखोरी केली आहे तर, दुसरीकडे निशांत अग्रवाल नामक हेराच्या माध्यमातून भारताच्या हृदयस्थळालाही आयएसआयने छेदण्याचा प्रयत्न केला आहे. ब्राह्मोस हेरगिरी प्रकरणाचा खळबळजनक उलगडा झाल्याने हादरलेल्या सुरक्षा यंत्रणांमध्ये तपासासोबतच गंभीर मंथनही सुरू झाले आहे.कधी काश्मिरात, कधी सिमेपलिकडून हल्ले करून तर कधी घुसखोरी करून उपद्र्रवी पाकिस्तान भारतात नेहमी अस्वस्थता निर्माण करण्याच्या प्रयत्नात असतो. भारतातील अन्य काही शहरांप्रमाणे भारताचे हृदयस्थळ अर्थात् नागपूर, पाकिस्तान आणि आयएसआयच्या हस्तक असलेल्या दहशतवादी संघटनांच्या आधीपासूनच हिटलिस्टवर आहे. हृदयावरचा हल्ला संपूर्ण शरीरावर गंभीर परिणाम करणारा ठरतो. हे जाणून असल्यामुळे पाकिस्तानने नागपुरातील संवेदनशील स्थळांना आधीच टार्गेट (अधोरेखित) केलेले आहे. दहा वर्षांपूर्वी पाकिस्तानी अतिरेक्यांनी संघ मुख्यालयावर हल्ला चढवला होता. हा हल्ला परतवून पाकिस्तान तसेच दहशतवाद्यांना भारतीय सुरक्षा यंत्रणांनी तोंडघशी पाडल्यामुळे नागपुरात हल्ला करण्याचे कट वेगवेगळ्या पद्धतीने रचले जात आहे. डीआरडीओच्या ब्रह्मोस एअरोस्पेस प्लँटमध्ये आपला हेर घुसवून पाकिस्तानने दुहेरी डाव साधला आहे. जाणते-अजानतेपणाने निशांत अग्रवालकडून पाकिस्तानने भारतासोबत फितुरी करण्याचे पातक घडवून आणले आहे. निशांत त्याचा हैदराबादेतील मित्र अब्राहम तसेच कानपुरातील पुन्हा एक वरिष्ठ महिला अधिकारी यांच्याकडून ब्रह्मोस संदर्भात अत्यंत संवेदनशील माहिती आयएसआयने काढून घेतली आहे. त्याची जबर किंमत भारतीय शास्त्रज्ञ आणि सुरक्षा दलाला मोजावी लागणार आहे. दरम्यान, निशांत अग्रवालला उत्तर प्रदेश एटीएसचे पथक आज नागपुरातून लखनौला घेऊन गेले. तिकडे उत्तर प्रदेशमधील अलीपूरद्वार जिल्ह्यातील आणखी एका एजंटला बुधवारी तपास यंत्रणांनी ताब्यात घेतले आहे. कानपुरातील एका महिला अधिकाऱ्याकडून जप्त करण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणातील कोडवर्डमधील गुपित जाणून घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात असल्याचे संबंधित सूत्रांचे सांगणे आहे.

महाराष्ट्राच्या सुरक्षा यंत्रणांची गोचीनेहमीच दबावतंत्राचा वापर करून भारताला दडपण्याचे धोरण अवलंबणारा अमेरिका आणि भारताला सर्वात मोठा शत्रू मानणारा पाकिस्तान महाराष्ट्राच्या उपराजधानीत आपला हेर पेरतात. तो अनेक महिन्यांपासून येथे सक्रिय असतो आणि राज्याच्या तपास यंत्रणांना त्याचा थांगपत्ताही लागत नाही. ही बाब महाराष्ट्राची सुरक्षा यंत्रणा आणि पोलिसांची गोची करणारी ठरली आहे. नागपुरात एसआयडी, सीआयडी, एएनओ तसेच एटीएससारखी तपास पथके आणि त्यांची स्वतंत्र कार्यालये आहेत. मात्र, हेरगिरी करणाऱ्या निशांत अग्रवालकडे कुणाचेच लक्ष गेले नाही. गृह मंत्रालय आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये त्याची गंभीर चर्चा सुरू असल्याचे सांगितले जाते. उत्तर प्रदेशातील तपास यंत्रणांनी पाकिस्तानी हेराला अटक केल्यामुळे राज्याच्या अन् खास करून नागपुरातील तपास यंत्रणा खजिल झाल्यासारख्या झाल्या आहेत. महाराष्ट्रातील सुरक्षा यंत्रणांना का नाही लागला आयएसआयच्या नागपुरातील नेटवर्कचा छडा, अशी विचारणा अनेकांकडे होत आहे. गृह मंत्रालयातून या संबंधाने लवकरच ‘आॅडिट’ केले जाणार असल्याचेही वरिष्ठ सूत्रांचे सांगणे आहे.

टॅग्स :Brahmos Missileब्राह्मोसPakistanपाकिस्तानIndiaभारत