शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

BrahMos Information Leak: पाकिस्तानने खेळला दुहेरी डाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2018 10:43 IST

दहशतवाद्यांच्या माध्यमातून भारताच्या हृदयस्थळी हल्ला करण्याचे अनेक वर्षांपासून कलुषित मनसुबे बाळगणाऱ्या पाकिस्तानने सुंदर ललना आणि डॉलर्सचे आमिष दाखवून पाकिस्तान (आयएसआय)ने एका तरुण शास्त्रज्ञाला फितुरी करण्यास भाग पाडले.

ठळक मुद्देशास्त्रज्ञाला फितवले मिसाईलच्या निर्मितीस्थळी घुसखोरीभारताच्या हृदयस्थळाला छेद देण्याचा प्रयत्न

- नरेश डोंगरे लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दहशतवाद्यांच्या माध्यमातून भारताच्या हृदयस्थळी हल्ला करण्याचे अनेक वर्षांपासून कलुषित मनसुबे बाळगणाऱ्या पाकिस्तानने सुंदर ललना आणि डॉलर्सचे आमिष दाखवून पाकिस्तान (आयएसआय)ने एका तरुण शास्त्रज्ञाला फितुरी करण्यास भाग पाडले. या माध्यमातून आयएसआयने भारताला शह देण्याचा दुहेरी डाव खेळला आहे. एकीकडे भारताच्या सर्वाधिक शक्तिशाली मिसाईलच्या प्लँटमध्ये घुसखोरी केली आहे तर, दुसरीकडे निशांत अग्रवाल नामक हेराच्या माध्यमातून भारताच्या हृदयस्थळालाही आयएसआयने छेदण्याचा प्रयत्न केला आहे. ब्राह्मोस हेरगिरी प्रकरणाचा खळबळजनक उलगडा झाल्याने हादरलेल्या सुरक्षा यंत्रणांमध्ये तपासासोबतच गंभीर मंथनही सुरू झाले आहे.कधी काश्मिरात, कधी सिमेपलिकडून हल्ले करून तर कधी घुसखोरी करून उपद्र्रवी पाकिस्तान भारतात नेहमी अस्वस्थता निर्माण करण्याच्या प्रयत्नात असतो. भारतातील अन्य काही शहरांप्रमाणे भारताचे हृदयस्थळ अर्थात् नागपूर, पाकिस्तान आणि आयएसआयच्या हस्तक असलेल्या दहशतवादी संघटनांच्या आधीपासूनच हिटलिस्टवर आहे. हृदयावरचा हल्ला संपूर्ण शरीरावर गंभीर परिणाम करणारा ठरतो. हे जाणून असल्यामुळे पाकिस्तानने नागपुरातील संवेदनशील स्थळांना आधीच टार्गेट (अधोरेखित) केलेले आहे. दहा वर्षांपूर्वी पाकिस्तानी अतिरेक्यांनी संघ मुख्यालयावर हल्ला चढवला होता. हा हल्ला परतवून पाकिस्तान तसेच दहशतवाद्यांना भारतीय सुरक्षा यंत्रणांनी तोंडघशी पाडल्यामुळे नागपुरात हल्ला करण्याचे कट वेगवेगळ्या पद्धतीने रचले जात आहे. डीआरडीओच्या ब्रह्मोस एअरोस्पेस प्लँटमध्ये आपला हेर घुसवून पाकिस्तानने दुहेरी डाव साधला आहे. जाणते-अजानतेपणाने निशांत अग्रवालकडून पाकिस्तानने भारतासोबत फितुरी करण्याचे पातक घडवून आणले आहे. निशांत त्याचा हैदराबादेतील मित्र अब्राहम तसेच कानपुरातील पुन्हा एक वरिष्ठ महिला अधिकारी यांच्याकडून ब्रह्मोस संदर्भात अत्यंत संवेदनशील माहिती आयएसआयने काढून घेतली आहे. त्याची जबर किंमत भारतीय शास्त्रज्ञ आणि सुरक्षा दलाला मोजावी लागणार आहे. दरम्यान, निशांत अग्रवालला उत्तर प्रदेश एटीएसचे पथक आज नागपुरातून लखनौला घेऊन गेले. तिकडे उत्तर प्रदेशमधील अलीपूरद्वार जिल्ह्यातील आणखी एका एजंटला बुधवारी तपास यंत्रणांनी ताब्यात घेतले आहे. कानपुरातील एका महिला अधिकाऱ्याकडून जप्त करण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणातील कोडवर्डमधील गुपित जाणून घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात असल्याचे संबंधित सूत्रांचे सांगणे आहे.

महाराष्ट्राच्या सुरक्षा यंत्रणांची गोचीनेहमीच दबावतंत्राचा वापर करून भारताला दडपण्याचे धोरण अवलंबणारा अमेरिका आणि भारताला सर्वात मोठा शत्रू मानणारा पाकिस्तान महाराष्ट्राच्या उपराजधानीत आपला हेर पेरतात. तो अनेक महिन्यांपासून येथे सक्रिय असतो आणि राज्याच्या तपास यंत्रणांना त्याचा थांगपत्ताही लागत नाही. ही बाब महाराष्ट्राची सुरक्षा यंत्रणा आणि पोलिसांची गोची करणारी ठरली आहे. नागपुरात एसआयडी, सीआयडी, एएनओ तसेच एटीएससारखी तपास पथके आणि त्यांची स्वतंत्र कार्यालये आहेत. मात्र, हेरगिरी करणाऱ्या निशांत अग्रवालकडे कुणाचेच लक्ष गेले नाही. गृह मंत्रालय आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये त्याची गंभीर चर्चा सुरू असल्याचे सांगितले जाते. उत्तर प्रदेशातील तपास यंत्रणांनी पाकिस्तानी हेराला अटक केल्यामुळे राज्याच्या अन् खास करून नागपुरातील तपास यंत्रणा खजिल झाल्यासारख्या झाल्या आहेत. महाराष्ट्रातील सुरक्षा यंत्रणांना का नाही लागला आयएसआयच्या नागपुरातील नेटवर्कचा छडा, अशी विचारणा अनेकांकडे होत आहे. गृह मंत्रालयातून या संबंधाने लवकरच ‘आॅडिट’ केले जाणार असल्याचेही वरिष्ठ सूत्रांचे सांगणे आहे.

टॅग्स :Brahmos Missileब्राह्मोसPakistanपाकिस्तानIndiaभारत