शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
2
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
3
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
4
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
5
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
6
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
7
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
8
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
9
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
10
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
11
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
12
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
13
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
14
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
15
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
16
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
17
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
18
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
19
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
20
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी

दीक्षाभूमीला बौद्ध अनुयायांचे नमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 01:00 IST

‘मी हिंदू म्हणून जन्माला आलो, पण हिंदू म्हणून मरणार नाही’अशी घोषणा केल्यानंतर २१ वर्षांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ आॅक्टोबर १९५६ रोजी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली.

ठळक मुद्देधम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त उसळला जनसागर : संविधान चौकातही अभिवादन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘मी हिंदू म्हणून जन्माला आलो, पण हिंदू म्हणून मरणार नाही’अशी घोषणा केल्यानंतर २१ वर्षांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ आॅक्टोबर १९५६ रोजी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्या ऐतिहासिक क्रांतीचा ६१ वा अनुवर्तन दिन उत्साहात साजरा झाला. यानिमित्त दीक्षाभूमीला हजारो बौद्ध अनुयायांनी नमन केले. धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून अनुयायांनी भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.विशेषत: १४ आॅक्टोबरला शहरातील अनुयायी मोठ्या संख्येने दीक्षाभूमीला येत असतात. त्यामुळे शनिवारी बौद्ध अनुयायांचे पाय दीक्षाभूमीकडे वळले होते. सकाळपासूनच स्तुपाच्या परिसरात लोकांनी गर्दी केली होती. येणाºया अनुयायांची गर्दी लक्षात घेता यावेळीही नित्याप्रमाणे व्यवस्था करण्यात आली होती. रांगेत लागून अनुयायांनी बाबासाहेब व तथागताच्या अस्थिकलशाला अभिवादन केले. भिक्खू संघाचीही यावेळी उपस्थिती होती. कुणी कुटुंबासह पोहचले तर विविध सामाजिक संघटना व विविध वस्त्यातील नागरिकांनी पायदळ रॅली काढली. मोठ्या संख्येने युवक मोटरसायकल रॅली काढून दीक्षाभूमीपर्यंत पोहचले. यामुळे तथागत बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमला होता. शेकडो उपासक-उपासिकांनी दीक्षाभूमी परिसरात असलेल्या विहारात भदन्त सुगत बोधी यांच्या नेतृत्वात पंचशील ग्रहण केले व २२ प्रतिज्ञांची शपथ घेतली. अनुयायांनी मिठाई वितरित करून एकमेकांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यादरम्यान दीक्षाभूमी परिसरात बौद्ध साहित्याचे स्टॉल लावण्यात आले होते. विशेषत: दरवेळीप्रमाणे पुस्तकांच्या स्टॉलवर गर्दी दिसत होती. तथागत बुद्ध व डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमांसह प्रतिकांची खरेदी मोठ्या प्रमाणात करण्यात आली.१५० लोकांनी घेतली दीक्षाडॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमीच्यावतीने समितीचे अध्यक्ष व धम्मसेनानायक भदन्त आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या नेतृत्वात धम्मदीक्षा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी १५० पेक्षा अधिक लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा देण्यात आली. दीक्षार्थींना धम्म दीक्षेचे प्रमाणपत्र व चिवरदान करण्यात आले. भिक्खू संघातील ५० पेक्षा जास्त भिक्खू यावेळी उपस्थित होते. यावेळी पंचशील ग्रहण करून बाबासाहेब व तथागत बुद्धांचा जयघोष करण्यात आला. कार्यक्रमात भदंत नागघोष, भदंत नागसेन, भदंत नागधम्म, भदंत धम्मविजय, भदंत धम्मप्रकाश, भिक्खूनी संघप्रिया, चंद्रशीला, यशोधरा, धम्मसुधा, बोधीप्रिया, शीलानंदा आदी उपस्थित होते.वंदना करायलाही मनाई अनुयायांनी व्यक्त केली नाराजीधम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शनिवारी मोठ्या संख्येने बौद्ध-आंबेडकरी अनुयायी दीक्षाभूमीवर अभिवादन करण्यासाठी आले होते. परंतु मध्यवर्ती स्मारकामध्ये तैनात पोलीस आणि सुरक्षा रक्षकांकडून अनुयायांना वंदना करण्यास मनाई केली जात होती. ‘दर्शन घ्या आणि पुढे चला’, असा आदेश सोडला जात होता. अनेक अनुयायांशी वाद सुद्धा घातले जात होते. हा एकूणच संतापजनक प्रकार पाहून अनेक अनुयायांनी नाराजी व्यक्त केली. दीक्षाभूमीवर येणारे अनुयायी हे काही केवळ दर्शनासाठी येत नाहीत तर कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी येतात. मध्यवर्ती स्मारकामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पवित्र अस्थिकलश व तथागत गौतम बुद्धांची मूर्ती आहे. दर्शनासाठी येणारे अनुयायी त्रिशरण पंचशीलसह बुद्ध वंदना घेऊन अभिवादन करतात. परंतु त्यांना साथी वंदनाही करू दिली जात नव्हती. दुसरीकडे स्मारकामध्ये अनुयायी बसणार नाही, याची पूर्ण व्यवस्था करण्यात आली होती. ठिकठिकाणी कठडे बांधण्यात आले होते. याबाबत अनुयायांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली. स्मारक समितीने याकडे विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी अनेक अनुयायांनी केली.परिसरातच घेतले भोजनशहरातील शेकडो लोक कुटुंबासह भोजनाचे साहित्य घेऊन दीक्षाभूमीवर पोहचले होते. नागरिकांनी या परिसरातील हिरवळीवर सहकुटुंब भोजनाचा आस्वाद घेतला. दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी शेकडो कुटुंब सहभोजनाचा आनंद घेत असल्याने अलौकिक भावना निर्माण होत आहे. यासोबतच बुद्ध भीम गीतांची मेजवानीही या उत्साहात भर घालत असते. यामुळे एक वेगळे वातावरण दीक्षाभूमी परिसरात दिसून येत असते.पोलीस व समता सैनिक दलातर्फे सुरक्षा१४ आॅक्टोबरला दरवर्षी बौद्ध अनुयायांची गर्दी येथे होत असते. त्यामुळे पोलीस प्रशासनाकडून सुरक्षा व्यवस्थेचे उपाय केले जातात. रामदास पेठ ते संत चोखामेळा वसतिगृहापर्यंतचा मार्ग चार चाकी वाहनांसाठी बंद करण्यात आला होता. पोलिसांसह समता सैनिक दलाचे सैनिकही सुरक्षेसाठी तैनात होते. दलाच्या सैनिकांकडूनही अनुयायांना अनेक प्रकारची मदत केली जात होती.