शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
7
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
8
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
9
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
10
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
11
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
12
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
13
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
14
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
15
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
16
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
17
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
18
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
19
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
20
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर

राज्यातील राष्ट्रीय महामार्गांच्या विस्ताराला ‘बूस्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 10:25 IST

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारातून राज्यामध्ये साडे २१ हजार कोटींहून अधिक निधीच्या कामांचे वाटप झाले असून एकूण मार्गाची लांबी ही पाऊणेचार हजार किलोमीटरहून अधिक राहणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

ठळक मुद्देवर्षभरात साडे २१ हजार कोटींहून अधिकच्या कामांचे वाटप केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाचा धडाका

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयातर्फे महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गांच्या कामासंदर्भात बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. २०१७-१८ या आर्थिक वर्षात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारातून प्रत्यक्षात हजारो कोटींच्या कामांचे वाटप झाले असून बांधकामाला सुरुवातदेखील झाली आहे. वर्षभरात राज्यामध्ये साडे २१ हजार कोटींहून अधिक निधीच्या कामांचे वाटप झाले असून एकूण मार्गाची लांबी ही पाऊणेचार हजार किलोमीटरहून अधिक राहणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान नितीन गडकरी यांनी देशातील सर्वात जास्त रस्ते निर्मितीचे काम महाराष्ट्रातच होत असल्याची माहिती लोकसभेत दिली होती. २०१७-१८ या कालावधीत मंत्रालयाकडून महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गांच्या निर्मितीसाठी प्रत्यक्षात किती कामाचे वाटप करण्यात आले याची माहिती ‘लोकमत’ला उपलब्ध झाली आहे. मंत्रालयातर्फे एकूण ३ हजार ७६९ किलोमीटर लांबीच्या महामार्गांसाठी २१ हजार ९३१ कोटी ६९ लाख रुपयांच्या कामाचे वाटप करण्यात आले आहे. कामाचे वाटप हे सार्वजनिक बांधकाम विभाग (राष्ट्रीय महामार्ग) आणि ‘एनएचएआय’ (नॅशनल हायवे आॅथोरिटी आॅफ इंडिया) यांना करण्यात आले. ३ हजार २१ किलोमीटर लांबीच्या महामार्गासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला ७ हजार ८४१ कोटींचे काम देण्यात आले आहे. ‘एनएचएआय’कडे ७४८ किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामाची जबाबदारी देण्यात आली असून यासाठी १४ हजार ९० कोटी ४९ लाख रुपयांचा खर्च लागणार आहे.

१४ महामार्गांचे चौपदरीकरणकेंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयातर्फे ‘एनएचएआय’ला देण्यात आलेल्या कामांमध्ये प्रामुख्याने राष्ट्रीय महामार्गांचे चौपदरीकरण व सहापदरी रुंदीकरण यांचा समावेश आहे. सोलापूर-बिजापूर (१०९.०८ किमी), औरंगाबाद-कोराडी (३०.२१५ किमी), कोराडी-तेलवाडी (५५.६१ किमी), औसा-चाकूर (५८.५१ किमी), चाकूर-लोहा (७४.३४५ किमी), लोहा-वारंगा (५६.५६९ किमी), सांगली-बोरगाव (४१.४४४ किमी), बोरगाव-वाटंबरे (५२ किमी), वाटंबरे-मंगलवेढा (५६.५० किमी), मेडशी-वाशीम (४४.५० किमी), वाशीम-पांगरे (४२.३ किमी), अक्कलकोटी-सोलापूर (३८.९५२ किमी) या मार्गांचे चौपदरीकरण होणार आहे. तर पिंपळगाव-नाशिक-गोंडे (३.८१ किमी उर्वरित काम), पिंपळगाव-नाशिक-गोंडे (७.५७ किमी अतिरिक्त काम) या मार्गाचे सहा पदरी रुंदीकरण करण्याची जबाबदारी ‘एनएचएआय’कडे आहे. तर ठाणे-वडापे (२३.४६५ किमी) या मार्गाचे सहा ते आठ पदरी रुंदीकरण होणार आहे.६५ मार्गांचा समावेशकेंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयातर्फे सार्वजनिक बांधकाम विभाग (राष्ट्रीय महामार्ग), ‘एनएचएआय’ आणि ‘एमएसआरडीसी’ला वाटप करण्यात आलेल्या कामांमध्ये राज्यातील ६५ मार्गांचा समावेश आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ४६, तर ‘एमएचएआय’कडे १९ मार्गांच्या बांधकामाची जबाबदारी देण्यात आली आहे.

टॅग्स :highwayमहामार्ग