शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
3
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
4
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
5
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
6
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
7
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
8
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
9
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
10
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
11
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
12
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
13
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
14
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
15
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
16
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
17
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
18
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
19
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
20
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?

राज्यातील राष्ट्रीय महामार्गांच्या विस्ताराला ‘बूस्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 10:25 IST

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारातून राज्यामध्ये साडे २१ हजार कोटींहून अधिक निधीच्या कामांचे वाटप झाले असून एकूण मार्गाची लांबी ही पाऊणेचार हजार किलोमीटरहून अधिक राहणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

ठळक मुद्देवर्षभरात साडे २१ हजार कोटींहून अधिकच्या कामांचे वाटप केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाचा धडाका

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयातर्फे महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गांच्या कामासंदर्भात बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. २०१७-१८ या आर्थिक वर्षात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारातून प्रत्यक्षात हजारो कोटींच्या कामांचे वाटप झाले असून बांधकामाला सुरुवातदेखील झाली आहे. वर्षभरात राज्यामध्ये साडे २१ हजार कोटींहून अधिक निधीच्या कामांचे वाटप झाले असून एकूण मार्गाची लांबी ही पाऊणेचार हजार किलोमीटरहून अधिक राहणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान नितीन गडकरी यांनी देशातील सर्वात जास्त रस्ते निर्मितीचे काम महाराष्ट्रातच होत असल्याची माहिती लोकसभेत दिली होती. २०१७-१८ या कालावधीत मंत्रालयाकडून महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गांच्या निर्मितीसाठी प्रत्यक्षात किती कामाचे वाटप करण्यात आले याची माहिती ‘लोकमत’ला उपलब्ध झाली आहे. मंत्रालयातर्फे एकूण ३ हजार ७६९ किलोमीटर लांबीच्या महामार्गांसाठी २१ हजार ९३१ कोटी ६९ लाख रुपयांच्या कामाचे वाटप करण्यात आले आहे. कामाचे वाटप हे सार्वजनिक बांधकाम विभाग (राष्ट्रीय महामार्ग) आणि ‘एनएचएआय’ (नॅशनल हायवे आॅथोरिटी आॅफ इंडिया) यांना करण्यात आले. ३ हजार २१ किलोमीटर लांबीच्या महामार्गासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला ७ हजार ८४१ कोटींचे काम देण्यात आले आहे. ‘एनएचएआय’कडे ७४८ किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामाची जबाबदारी देण्यात आली असून यासाठी १४ हजार ९० कोटी ४९ लाख रुपयांचा खर्च लागणार आहे.

१४ महामार्गांचे चौपदरीकरणकेंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयातर्फे ‘एनएचएआय’ला देण्यात आलेल्या कामांमध्ये प्रामुख्याने राष्ट्रीय महामार्गांचे चौपदरीकरण व सहापदरी रुंदीकरण यांचा समावेश आहे. सोलापूर-बिजापूर (१०९.०८ किमी), औरंगाबाद-कोराडी (३०.२१५ किमी), कोराडी-तेलवाडी (५५.६१ किमी), औसा-चाकूर (५८.५१ किमी), चाकूर-लोहा (७४.३४५ किमी), लोहा-वारंगा (५६.५६९ किमी), सांगली-बोरगाव (४१.४४४ किमी), बोरगाव-वाटंबरे (५२ किमी), वाटंबरे-मंगलवेढा (५६.५० किमी), मेडशी-वाशीम (४४.५० किमी), वाशीम-पांगरे (४२.३ किमी), अक्कलकोटी-सोलापूर (३८.९५२ किमी) या मार्गांचे चौपदरीकरण होणार आहे. तर पिंपळगाव-नाशिक-गोंडे (३.८१ किमी उर्वरित काम), पिंपळगाव-नाशिक-गोंडे (७.५७ किमी अतिरिक्त काम) या मार्गाचे सहा पदरी रुंदीकरण करण्याची जबाबदारी ‘एनएचएआय’कडे आहे. तर ठाणे-वडापे (२३.४६५ किमी) या मार्गाचे सहा ते आठ पदरी रुंदीकरण होणार आहे.६५ मार्गांचा समावेशकेंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयातर्फे सार्वजनिक बांधकाम विभाग (राष्ट्रीय महामार्ग), ‘एनएचएआय’ आणि ‘एमएसआरडीसी’ला वाटप करण्यात आलेल्या कामांमध्ये राज्यातील ६५ मार्गांचा समावेश आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ४६, तर ‘एमएचएआय’कडे १९ मार्गांच्या बांधकामाची जबाबदारी देण्यात आली आहे.

टॅग्स :highwayमहामार्ग