शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील राष्ट्रीय महामार्गांच्या विस्ताराला ‘बूस्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 10:25 IST

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारातून राज्यामध्ये साडे २१ हजार कोटींहून अधिक निधीच्या कामांचे वाटप झाले असून एकूण मार्गाची लांबी ही पाऊणेचार हजार किलोमीटरहून अधिक राहणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

ठळक मुद्देवर्षभरात साडे २१ हजार कोटींहून अधिकच्या कामांचे वाटप केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाचा धडाका

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयातर्फे महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गांच्या कामासंदर्भात बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. २०१७-१८ या आर्थिक वर्षात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारातून प्रत्यक्षात हजारो कोटींच्या कामांचे वाटप झाले असून बांधकामाला सुरुवातदेखील झाली आहे. वर्षभरात राज्यामध्ये साडे २१ हजार कोटींहून अधिक निधीच्या कामांचे वाटप झाले असून एकूण मार्गाची लांबी ही पाऊणेचार हजार किलोमीटरहून अधिक राहणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान नितीन गडकरी यांनी देशातील सर्वात जास्त रस्ते निर्मितीचे काम महाराष्ट्रातच होत असल्याची माहिती लोकसभेत दिली होती. २०१७-१८ या कालावधीत मंत्रालयाकडून महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गांच्या निर्मितीसाठी प्रत्यक्षात किती कामाचे वाटप करण्यात आले याची माहिती ‘लोकमत’ला उपलब्ध झाली आहे. मंत्रालयातर्फे एकूण ३ हजार ७६९ किलोमीटर लांबीच्या महामार्गांसाठी २१ हजार ९३१ कोटी ६९ लाख रुपयांच्या कामाचे वाटप करण्यात आले आहे. कामाचे वाटप हे सार्वजनिक बांधकाम विभाग (राष्ट्रीय महामार्ग) आणि ‘एनएचएआय’ (नॅशनल हायवे आॅथोरिटी आॅफ इंडिया) यांना करण्यात आले. ३ हजार २१ किलोमीटर लांबीच्या महामार्गासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला ७ हजार ८४१ कोटींचे काम देण्यात आले आहे. ‘एनएचएआय’कडे ७४८ किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामाची जबाबदारी देण्यात आली असून यासाठी १४ हजार ९० कोटी ४९ लाख रुपयांचा खर्च लागणार आहे.

१४ महामार्गांचे चौपदरीकरणकेंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयातर्फे ‘एनएचएआय’ला देण्यात आलेल्या कामांमध्ये प्रामुख्याने राष्ट्रीय महामार्गांचे चौपदरीकरण व सहापदरी रुंदीकरण यांचा समावेश आहे. सोलापूर-बिजापूर (१०९.०८ किमी), औरंगाबाद-कोराडी (३०.२१५ किमी), कोराडी-तेलवाडी (५५.६१ किमी), औसा-चाकूर (५८.५१ किमी), चाकूर-लोहा (७४.३४५ किमी), लोहा-वारंगा (५६.५६९ किमी), सांगली-बोरगाव (४१.४४४ किमी), बोरगाव-वाटंबरे (५२ किमी), वाटंबरे-मंगलवेढा (५६.५० किमी), मेडशी-वाशीम (४४.५० किमी), वाशीम-पांगरे (४२.३ किमी), अक्कलकोटी-सोलापूर (३८.९५२ किमी) या मार्गांचे चौपदरीकरण होणार आहे. तर पिंपळगाव-नाशिक-गोंडे (३.८१ किमी उर्वरित काम), पिंपळगाव-नाशिक-गोंडे (७.५७ किमी अतिरिक्त काम) या मार्गाचे सहा पदरी रुंदीकरण करण्याची जबाबदारी ‘एनएचएआय’कडे आहे. तर ठाणे-वडापे (२३.४६५ किमी) या मार्गाचे सहा ते आठ पदरी रुंदीकरण होणार आहे.६५ मार्गांचा समावेशकेंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयातर्फे सार्वजनिक बांधकाम विभाग (राष्ट्रीय महामार्ग), ‘एनएचएआय’ आणि ‘एमएसआरडीसी’ला वाटप करण्यात आलेल्या कामांमध्ये राज्यातील ६५ मार्गांचा समावेश आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ४६, तर ‘एमएचएआय’कडे १९ मार्गांच्या बांधकामाची जबाबदारी देण्यात आली आहे.

टॅग्स :highwayमहामार्ग