शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मंगल कार्यालयांचे बुकिंग मार्चपर्यंत रद्द : नागपुरातील सभागृहांमध्ये शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 00:44 IST

खबरदारी म्हणून मंगल कार्यालय मालकांनीही मार्चपर्यंतचे सर्व कार्यक्रम रद्द करण्याची घोषणा केली आहे. आलेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी बहुतेक मंगल कार्यालय मालकांनी राज्य शासनाच्या आदेशाला पाठिंबा दर्शविला.

ठळक मुद्देबहुतेकांनी घेतली खबरदारी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. या विषाणूच्या प्रादुर्भावाने विविध व्यवसायांवर प्रभाव पडला आहे. या भीतीचा सर्वाधिक परिणाम लग्नसोहळा आणि त्या प्रकारच्या कार्यक्रमांवर पडला आहे. खबरदारी म्हणून मंगल कार्यालय मालकांनीही मार्चपर्यंतचे सर्व कार्यक्रम रद्द करण्याची घोषणा केली आहे. आलेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी बहुतेक मंगल कार्यालय मालकांनी राज्य शासनाच्या आदेशाला पाठिंबा दर्शविला.मंगल कार्यालय ओनर्स असोसिएशनचे सदस्य सत्यजित सरवटे यांनी प्रशासनाच्या आदेशाला मंगल कार्यालयांचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. नागपूर शहरात जवळपास ५०० च्या आसपास लहानमोठी मंगल कार्यालये आणि लॉन्स आहेत. या सभागृहांमध्ये लग्न सोहळ्यांसह साक्षगंध, मौंज आदी कार्यक्रम होतात. कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता प्रशासनाच्या आदेशानुसार सर्व मंगल कार्यालयांचे कार्यक्रम ३१ मार्चपर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसे मार्च महिन्यात लग्नसोहळे कमीच असतात. या काळात साखरपुडा किंवा याप्रकारचे लहानसहान कार्यक्रम होतात. लग्नाची खरी धामधूम एप्रिल महिन्यापासून सुरू होते. मात्र मार्च महिन्यातील कार्यक्रमही स्थगित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यादरम्यान बुकिंग रद्द केले किंवा तारीख पुढे ढकलली किंवा आयोजकांच्या मागणीनुसार पैसेही परत दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.कोरोना विषाणूचा फैलाव हा एकमेकांच्या संपर्कातून होतो. कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यास हा विषाणू सहज दुसऱ्याच्या शरीरात पोहचू शकतो. त्यामुळे एकमेकांचा संपर्क टाळा व गर्दीपासून दूर राहण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. लग्नसोहळ्यात हजारो लोकांची गर्दी होते आणि नातेवाईक व परिचितांना कार्यक्रमात येण्यापासून रोखताही येत नाही. अशावेळी लग्नसोहळ्यात आलेल्या एखाद्या बाधित व्यक्तीमुळे शेकडो लोकांना याची लागण होण्याचा मोठा धोका उद््भवू शकतो. त्यामुळे अनेक कुटुंबांनी मार्च महिन्यात आपले ठरलेले कार्यक्रम एकतर रद्द केले किंवा पुढे ढकलले आहेत. १९ मार्च हा मुहूर्ताचा दिवस मानला गेला होता व शेकडो कार्यक्रमही यादिवशी ठरले होते. मात्र कोरोनामुळे मंगल कार्यालयांमध्ये शुकशुकाट असल्याचे दिसून आले. काही मंगल कार्यालयांमध्ये ३१ मार्चपर्यंत बुकिंग रद्द करण्यात आल्याचे बोर्ड लावले. बजाजनगर येथील एका लॉनमध्ये १९ मार्च रोजीचा एक लग्नसोहळा रद्द करण्यात आल्याचा बोर्ड झळकला.काहींचा बेजबाबदारपणा कायमबहुतेकांनी निर्देशाचे पालन केले, मात्र काहींचा बेजबाबदारपणा या परिस्थितीतही कायम होता. जगनाडे चौकातील एका मोठ्या मंगल कार्यालयात गुरुवारी एक कार्यक्रम पार पडला. बाहेरून बंद असल्याचे दाखविले, मात्र आतमध्ये कार्यक्रम घेण्यात आला. बहुतेक पाहुणे गुपचूपपणे सभागृहात जात असल्याचे दिसून आले. या परिस्थितीतही असा नतद्रष्टपणा नागरिकांच्या जीवाशी खेळण्यासारखा आहे.जीवापेक्षा पैसा महत्त्वाचा नाहीलोकांच्या जीवापेक्षा पैसा महत्त्वाचा नाही. तशी मार्च महिन्यात लग्नाची धामधूम फार नसते. मात्र आम्ही स्वत: आलेले बुकिंग रद्द केले. ३१ मार्चपर्यंत कुठलेही कार्यक्रम न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिस्थिती सुधारली नाही तर पुढेही कार्यक्रमांचे बुकिंग घेतले जाणार नाही. आलेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी आम्ही सरकारच्या पाठीशी आहोत.सत्यजित सरवटे, मंगल कार्यालय ओनर्स असोसिएशन

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याmarriageलग्न