शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

गुजरात व आंध्रातील बोगस बियाणे महाराष्ट्रात शेतकऱ्यांनो सावधान !

By admin | Updated: May 9, 2014 01:47 IST

शेतीतील समस्यांचा फायदा घेऊन गुजरात आणि आंध्र प्रदेशातून महाराष्ट्रात बोगस बियाणे दाखल झालेले आहेत. नानाविध नावाने असलेली ही नकली बियाणे बाजारात नव्हे,

मानवी साखळीच्या मदतीने विक्री

राजेश भोजेकर - वर्धा

शेतीतील समस्यांचा फायदा घेऊन गुजरात आणि आंध्र प्रदेशातून महाराष्ट्रात बोगस बियाणे दाखल झालेले आहेत. नानाविध नावाने असलेली ही नकली बियाणे बाजारात नव्हे, तर मनुष्य साखळीच्या माध्यमातून शेतकर्‍यांच्या माथी मारली जात असल्याची धक्कादायक माहिती आहे. शेतामध्ये मजूर आणि तणाचा गंभीर प्रश्न आवासून उभा आहे. मजूर मिळविणे म्हणजे गड जिंकल्यासारखे झाले आहे. मजुराला वेळोवेळी आमिष देऊन, वाढीव मजुरी देऊन शेतात आणावे लागते. तरीही वेळेवर मजूर मिळत नाही आणि पाहिजे तसे आणि तितके काम होत शेतात होत नाही. त्या शिवाय तणाचा प्रश्नही मोठा आहे.

तण हे मुख्य पिकाशी पाणी, खतद्रव्ये, प्रकाश आणि जागा या बाबतीत स्पर्धा करते. त्यामुळे पिकाचे ५०-७० टक्केपर्यंत नुकसान करते. परिणामी उत्पन्नामध्ये घट येते. याचाच फायदा घेत गुजरात आणि आंध्र प्रदेशातून महाराष्ट्रात नानाविध नावाने खोटे, बेकायदेशीर, बोगस, नकली, नपुंसक बियाणे महाराष्ट्राच्या बाजारात दाखल झाल्याची भीती कृषी विभागाने वर्तविली आहे. हे बियाणे गावागावात दलालामार्फत विकले जात आहे. एकदा वापर करुन बघा, या तत्त्वावर शेतकर्‍यांना घेण्यास बाध्य करीत असल्याचेही कृषी विभागाचे म्हणणे आहे. वर्धेत हे बियाणे आढळल्याचे कृषी विभागाने मान्य केले आहे. हे बियाणे हे कुठल्या तंत्रज्ञानाने बनले आहे ते माहिती नाही. तसेच मान्यताप्राप्त कंपन्यांची बियाणे वगळता इतर कुठल्याही प्रकारचे बियाणे शेतकर्‍यांनी वापरु नये.

या बियाण्यांमुळे शेतावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता दाट आहे. असे बियाणे कुठलीही चाचणी पास केलेले नसते, त्यामुळे ते कितपत खरे आह,े याची काहीही खात्री नाही. कोणतीही व्यक्ती अशा प्रकारचे बियाणे विकत असताना किंवा लागवड करुन असताना आढळल्यास त्यांच्यावर बियाणे नियंत्रण आदेश १९८३ अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे कृषी विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. अशा बियाण्यांबाबत तक्रार नोंदविण्यासाठी राज्यभरासाठी १८००२३३४०००, वर्धा जिल्ह्यासाठी ०७१५२-२५५००९९ हे टोल फ्री क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आले आहे.