शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
4
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
5
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
6
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
7
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
8
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
9
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
10
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
11
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
12
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
13
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
14
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
15
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
16
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
17
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
18
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
19
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
20
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात प्रियकराच्या सदनिकेत तरुणीचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 23:37 IST

प्रियकराने दुसरीकडे लग्न जुळविल्याचे कळाल्याने अस्वस्थ झालेल्या एका तरुणीने प्रियकराच्या भाड्याच्या सदनिकेत गळफास लावून घेतला. गुरुवारी दुपारी ही खळबळजनक घटना उघडकीस आली. दरम्यान, मृत तरुणीच्या बहिणीने ही आत्महत्या नव्हे तर हत्या आहे, असा आरोप केल्याने नंदनवन परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

ठळक मुद्देपोलिसांनी नोंदविला गुन्हाआत्महत्येस प्रवृत्त केल्याचा ठपकाप्रियकर गजाआड, नंदनवनमध्ये चर्चेला उधाण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रियकराने दुसरीकडे लग्न जुळविल्याचे कळाल्याने अस्वस्थ झालेल्या एका तरुणीने प्रियकराच्या भाड्याच्या सदनिकेत गळफास लावून घेतला. गुरुवारी दुपारी ही खळबळजनक घटना उघडकीस आली. दरम्यान, मृत तरुणीच्या बहिणीने ही आत्महत्या नव्हे तर हत्या आहे, असा आरोप केल्याने नंदनवन परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.राखी दिगंबर धांडे (वय २२) असे मृत तरुणीचे नाव आहे. ती मूळची माळणी, मांगली (ता.कुही) येथील रहिवासी होती. सध्या ती खरबीतील आदर्शनगरात बेबीताई चौधरी यांच्याकडे भाड्याने राहत होती. एका फार्महाऊसवर ती काम करायची. नंदनवन पोलिसांच्या माहितीनुसार, तिचे अनिल मधुकर पेठे (वय ३६) सोबत प्रेमसंबंध होते. अनिलने उमरेड मार्गावरील चामट चक्की परिसरात असलेल्या साई ताज अपार्टमेंटमध्ये २०३ क्रमांकाची सदनिका भाड्याने घेतली आहे. अनिल आणि त्याच्या मित्रांचा वावर होता. अनेकदा तेथे राखीही जायची. काही दिवसांपूर्वी अनिलने दुसरीकडे लग्न जुळविल्याची कुणकुण राखीला लागली. त्यामुळे अनिलसोबत तिचा वाद वाढला होता. या पार्श्वभूमीवर, बुधवारी घरून गेलेली राखी रात्र झाली तरी परत आली नाही. त्यामुळे रात्री ९.१५ च्या सुमारास बहीण उज्ज्वलाने राखीला फोन लावला. यावेळी तिने थोड्या वेळेत येते, असे सांगितले. त्यानंतर राखीचा मोबाईल बंद झाला. गुरुवारी सकाळी उज्ज्वलाने राखीच्या मोबाईलवर पुन्हा संपर्क केला. यावेळी मोबाईलची रिंग वाजत होती. मात्र, प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे उज्ज्वला अस्वस्थ झाली. तिला सदनिकेची माहिती असल्याने सकाळी ११ च्या सुमारास ती तेथे पोहचली. अनिल तेथे आढळला. पुढे काय झाले कळायला मार्ग नाही. दुपारी १ च्या सुमारास उज्ज्वला नंदनवन ठाण्यात पोहचली. तेथे ती तक्रार देत असतानाच पोलीस ठाण्यात अनिल पेठेचा फोन आला आणि त्याने राखीने आत्महत्या केल्याची माहिती दिल्याचे समजते. त्यामुळे पोलिसांचा ताफा सदनिकेत पोहचला. तेथे राखीचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांनी तो मेडिकलला पाठवला.दरम्यान, राखीने आत्महत्या केली नसून, तिची हत्याच केली असा आरोप उज्ज्वलाने लावला. त्यामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली. पोलिसांनी शवविच्छेदन अहवाल तातडीने देण्याची डॉक्टरांना विनंती केली. तो अहवाल मिळाल्यानंतर पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल करून राखीला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अनिल पेठेला अटक केली. दुसरीसोबत लग्न जुळल्यानंतर अनिल राखीला टाळत होता. तिला त्रास देत होता, असे नंदनवन पोलीस सांगतात.पोलिसांच्या भूमिकेवर संशयया प्रकरणाने नंदनवन परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. राखीने मृत्यूपुर्वी बॉडी लोशनने सदनिकेतील आरशावर मजकूर लिहिला. त्या आधारे आणि शवविच्छेदन अहवालाच्या आधारे अनिलविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, या सदनिकेत मृत्यूपूर्वी राखीसोबत काय झाले, तिच्यावर अत्याचार झाला का, त्यावेळी सदनिकेत कोण कोण होते, त्याबाबत पोलिसांनी माहिती देण्याचे टाळल्याने पोलिसांच्या भूमिकेवरही संशय घेतला जात आहे.

 

 

टॅग्स :Suicideआत्महत्याnagpurनागपूर