शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

उत्तरपत्रिकांच्या वाहतुकीसाठी बोर्डाने मागितली पोलिसांना परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 11:39 IST

कोरोनाचा फटका यंदा बोर्डाच्या निकालाला बसणार आहे. लॉकडाऊनच्या डोकेदुखीमुळे बोर्डाचे काम थांबले आहे. उत्तरपत्रिका तपासून तयार असल्या तरी बोर्डापर्यंत आणण्याचा कुठलाही पर्याय नसल्याने बोर्डाच्या सचिवांनी उत्तरपत्रिकांच्या वाहतुकीची परवानगी नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे मागितली आहे.

ठळक मुद्देदहावीच्या उत्तरपत्रिका अजूनही परीक्षकांकडेलॉकडाऊनचा बोर्डाच्या निकालाला फटका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाचा फटका यंदा बोर्डाच्या निकालाला बसणार आहे. लॉकडाऊनच्या डोकेदुखीमुळे बोर्डाचे काम थांबले आहे. उत्तरपत्रिका तपासून तयार असल्या तरी बोर्डापर्यंत आणण्याचा कुठलाही पर्याय नसल्याने बोर्डाच्या सचिवांनी उत्तरपत्रिकांच्या वाहतुकीची परवानगी नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे मागितली आहे.यंदा बारावीची परीक्षा १८ मार्च रोजी संपली. तर दहावीची परीक्षा २३ मार्चला संपणार होती. परंतु २३ मार्चपासूनच देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. पुढे त्यात आणखी वाढ झाल्याने बोर्डाने दहावीचा शेवटचा भूगोलाचा पेपरही रद्द केला. सरकारने ३ मेपर्यंत लॉकडाऊन घोषित केले. परंतु राज्यात कोरोना पॉझिटिव्हची वाढती संख्या लक्षात घेता, पुन्हा लॉकडाऊनची अवधी वाढण्याची शक्यता आहे. दरवर्षी मेच्या शेवटच्या आठवड्यात बारावीचा व जूनच्या पहिल्या आठवड्यात दहावीचा निकाल लागतो. बोर्डाचे बारावीच्या निकालाचे काम ७० टक्के जवळपास झाले आहे. म्हणजेच बारावीच्या ७० टक्के उत्तरपत्रिका बोर्डात पोहचल्या आहेत. तर दहावीच्या उत्तरपत्रिका अजूनही परीक्षकांकडेच आहेत. परीक्षक पेपर तपासून तो नियमकाकडे (मॉडरेटर) सादर करतो. एका नियमकाच्या नियंत्रणात ७ परीक्षक असतात. सध्या दहावीच्या उत्तारपत्रिकांची तपासणी पूर्ण झाली आहे. पण लॉकडाऊनमुळे नियमकांकडे त्या पोहचल्या नाहीत. नियमक त्या उत्तरपत्रिका बोर्डात पोहचवितात. त्यानंतर बोर्डाची निकालाची पुढची प्रक्रिया सुरू होते. लॉकडाऊनमुळे हे पूर्ण काम ठप्प पडले आहे. वाहतूकच बंद असल्याने उत्तरपत्रिका परीक्षकांकडेच पडल्या आहेत.निकालाचे काम लवकरात लवकर व्हावे म्हणून नागपूर बोर्डाच्या विभागीय सचिवांनी नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांना पत्र देऊन काही विशेष परवानगी मागितली आहे. यात परीक्षकांना नियमकांकडे जाण्यास व नियमकांना उत्तरपत्रिका सादर करण्यासाठी बोर्डात येण्यासंदर्भात सवलत द्यावी. त्याचबरोबर परीक्षेसंबंधी गोपनीय साहित्य नियमकांकडे जमा आहे. हे साहित्य सहाही जिल्ह्यांतून संकलन करण्याची मंडळाला परवानगी द्यावी.- बारावीच्या ७० टक्के उत्तरपत्रिका बोर्डात जमा झाल्या आहेत. तर दहावीच्या उत्तरपत्रिका अजूनही परीक्षकांकडे आहेत. त्या नियमकांच्या माध्यमातून बोर्डात जमा करायच्या आहेत. दहावीच्या परीक्षेसाठी १२०० नियमकांची नियुक्ती करण्यात आली होती. या नियमकांना बोर्डात येण्याची सवलत मिळावी म्हणून २७ एप्रिल रोजी नागपूर परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांना पत्र पाठविले आहे. अद्याप परवानगी मिळालेली नाही. लवकरात लवकर परवानगी मिळाल्यास त्याचा निकालावर विशेष परिणाम होणार नाही.- रविकांत देशपांडे, विभागीय सचिव, नागपूर विभागीय मंडळ

 

टॅग्स :ssc examदहावीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस