शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

उत्तरपत्रिकांच्या वाहतुकीसाठी बोर्डाने मागितली पोलिसांना परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 11:39 IST

कोरोनाचा फटका यंदा बोर्डाच्या निकालाला बसणार आहे. लॉकडाऊनच्या डोकेदुखीमुळे बोर्डाचे काम थांबले आहे. उत्तरपत्रिका तपासून तयार असल्या तरी बोर्डापर्यंत आणण्याचा कुठलाही पर्याय नसल्याने बोर्डाच्या सचिवांनी उत्तरपत्रिकांच्या वाहतुकीची परवानगी नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे मागितली आहे.

ठळक मुद्देदहावीच्या उत्तरपत्रिका अजूनही परीक्षकांकडेलॉकडाऊनचा बोर्डाच्या निकालाला फटका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाचा फटका यंदा बोर्डाच्या निकालाला बसणार आहे. लॉकडाऊनच्या डोकेदुखीमुळे बोर्डाचे काम थांबले आहे. उत्तरपत्रिका तपासून तयार असल्या तरी बोर्डापर्यंत आणण्याचा कुठलाही पर्याय नसल्याने बोर्डाच्या सचिवांनी उत्तरपत्रिकांच्या वाहतुकीची परवानगी नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे मागितली आहे.यंदा बारावीची परीक्षा १८ मार्च रोजी संपली. तर दहावीची परीक्षा २३ मार्चला संपणार होती. परंतु २३ मार्चपासूनच देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. पुढे त्यात आणखी वाढ झाल्याने बोर्डाने दहावीचा शेवटचा भूगोलाचा पेपरही रद्द केला. सरकारने ३ मेपर्यंत लॉकडाऊन घोषित केले. परंतु राज्यात कोरोना पॉझिटिव्हची वाढती संख्या लक्षात घेता, पुन्हा लॉकडाऊनची अवधी वाढण्याची शक्यता आहे. दरवर्षी मेच्या शेवटच्या आठवड्यात बारावीचा व जूनच्या पहिल्या आठवड्यात दहावीचा निकाल लागतो. बोर्डाचे बारावीच्या निकालाचे काम ७० टक्के जवळपास झाले आहे. म्हणजेच बारावीच्या ७० टक्के उत्तरपत्रिका बोर्डात पोहचल्या आहेत. तर दहावीच्या उत्तरपत्रिका अजूनही परीक्षकांकडेच आहेत. परीक्षक पेपर तपासून तो नियमकाकडे (मॉडरेटर) सादर करतो. एका नियमकाच्या नियंत्रणात ७ परीक्षक असतात. सध्या दहावीच्या उत्तारपत्रिकांची तपासणी पूर्ण झाली आहे. पण लॉकडाऊनमुळे नियमकांकडे त्या पोहचल्या नाहीत. नियमक त्या उत्तरपत्रिका बोर्डात पोहचवितात. त्यानंतर बोर्डाची निकालाची पुढची प्रक्रिया सुरू होते. लॉकडाऊनमुळे हे पूर्ण काम ठप्प पडले आहे. वाहतूकच बंद असल्याने उत्तरपत्रिका परीक्षकांकडेच पडल्या आहेत.निकालाचे काम लवकरात लवकर व्हावे म्हणून नागपूर बोर्डाच्या विभागीय सचिवांनी नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांना पत्र देऊन काही विशेष परवानगी मागितली आहे. यात परीक्षकांना नियमकांकडे जाण्यास व नियमकांना उत्तरपत्रिका सादर करण्यासाठी बोर्डात येण्यासंदर्भात सवलत द्यावी. त्याचबरोबर परीक्षेसंबंधी गोपनीय साहित्य नियमकांकडे जमा आहे. हे साहित्य सहाही जिल्ह्यांतून संकलन करण्याची मंडळाला परवानगी द्यावी.- बारावीच्या ७० टक्के उत्तरपत्रिका बोर्डात जमा झाल्या आहेत. तर दहावीच्या उत्तरपत्रिका अजूनही परीक्षकांकडे आहेत. त्या नियमकांच्या माध्यमातून बोर्डात जमा करायच्या आहेत. दहावीच्या परीक्षेसाठी १२०० नियमकांची नियुक्ती करण्यात आली होती. या नियमकांना बोर्डात येण्याची सवलत मिळावी म्हणून २७ एप्रिल रोजी नागपूर परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांना पत्र पाठविले आहे. अद्याप परवानगी मिळालेली नाही. लवकरात लवकर परवानगी मिळाल्यास त्याचा निकालावर विशेष परिणाम होणार नाही.- रविकांत देशपांडे, विभागीय सचिव, नागपूर विभागीय मंडळ

 

टॅग्स :ssc examदहावीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस