शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

बोर्डाच्या परीक्षेमुळे निवडणुकीच्या कामातून मिळणार मुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 00:00 IST

राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी व बारावीच्या परीक्षेच्या कामात व्यस्त असलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या कामातून मुक्त केले आहे. यासंदर्भात अप्पर मुख्य सचिव वंदना कृ ष्णा यांनी सर्व जिल्हाधिकारी व निवडणूक अधिकाऱ्यांना यासंदर्भात पत्र पाठविले आहे. या पत्रात परीक्षेचे काम करणाऱ्या शिक्षकांचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे शिक्षकांना दोन्ही कामे करावी लागणार आहे.

ठळक मुद्देसर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश : शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सूट, शिक्षकांना नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी व बारावीच्या परीक्षेच्या कामात व्यस्त असलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या कामातून मुक्त केले आहे. यासंदर्भात अप्पर मुख्य सचिव वंदना कृ ष्णा यांनी सर्व जिल्हाधिकारी व निवडणूक अधिकाऱ्यांना यासंदर्भात पत्र पाठविले आहे. या पत्रात परीक्षेचे काम करणाऱ्या शिक्षकांचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे शिक्षकांना दोन्ही कामे करावी लागणार आहे.वंदना कृष्णा यांनी पाठविलेल्या पत्रामध्ये बोर्डाच्या दहावीच्या प्रॅक्टिकल परीक्षा १० फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. १ मार्चपासून सुरू होणाऱ्या लेखी परीक्षा २२ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. बारावीच्या पॅ्रक्टिकल परीक्षा १८ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. २१ फेब्रुवारीपासून लेखी परीक्षा सुरू होणार असून, २० मार्चपर्यंत चालणार आहे. परीक्षेचे कार्य संवेदनशील आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार परीक्षेनंतर बोर्डाला १० जूनपर्यंत निकाल घोषित करायचा आहे. त्यामुळे परीक्षेचे काम महत्त्वाचे आहे. सध्या बोर्डाकडे कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. हे लक्षात घेता येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्य शिक्षण मंडळाच्या कर्मचाऱ्यांची निवडणुकीच्या कामातून मुक्तता केली आहे.काही दिवसांपूर्वी नागपूर विभागीय कार्यालयाला निवडणुकीच्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र पाठविले होते. निवडणुकीच्या कामासाठी बोर्डातून कर्मचाऱ्यांना पाठविण्याच्या सूचना दिल्या होत्या. परीक्षेचा कालावधी लक्षात घेता बोर्डाच्या विभागीय अधिकाऱ्यांनी मंडळाच्या मुख्यालयाला पत्र पाठविले होते. बोर्डाच्या कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामातून वगळण्याची विनंती केली होती. बोर्डाच्या पत्रानंतर शिक्षण विभागाने राज्य सरकारकडे यासंदर्भात विनंती केली. शिक्षकांना करावेच लागेल दोन्ही कामकृष्णा यांन पत्रात केवळ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाच अधोरेखित केले आहे. यात शिक्षकांचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे शिक्षकांना कुठलीही सवलत मिळणार नाही. त्यांना परीक्षेसोबतच निवडणुकीचे कार्य करावे लागणार आहे.

टॅग्स :Teacherशिक्षकElectionनिवडणूक