शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

रक्तरंजित थरार; नागपुरात विद्यार्थ्याची भर रस्त्यावर हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2022 22:37 IST

Nagpur News महाविद्यालयातील वादातून एका विद्यार्थ्याची सेमिनरी हिल्स परिसरात भर रस्त्यावर हल्ला करत हत्या करण्यात आली. तर त्याच्या मित्रावरदेखील प्राणघातक हल्ला करण्यात आला.

ठळक मुद्दे मृतकाच्या मित्रावरदेखील प्राणघातक हल्लाशुल्लक वादातून पाच विद्यार्थ्यांकडूनच हल्ला

नागपूर : महाविद्यालयातील वादातून एका विद्यार्थ्याची सेमिनरी हिल्स परिसरात भर रस्त्यावर हल्ला करत हत्या करण्यात आली. तर त्याच्या मित्रावरदेखील प्राणघातक हल्ला करण्यात आला व त्याची प्रकृतीदेखील गंभीर आहे. हल्ला करणारेदेखील विद्यार्थीच असल्याने या प्रकारामुळे खळबळ उडाली असून पोलिसांनी पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यात काही आरोपी अल्पवयीन असल्याचे वाटत असल्याने त्यांची नावे पोलिसांनी जाहीर केलेली नाही.

हर्ष डांगे (२२, साईनगर,वाडी) असे मृतक विद्यार्थ्याचे नाव असून तो वाडीतील महाविद्यालयातील विद्यार्थी होता, तर अंकित कसर (२०, आडे ले आऊट) हा जखमी झाला असून तो जी.एच.रायसोनी पॉलिटेक्निकचा माजी विद्यार्थी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्ष आणि अनिकेत रायसोनी महाविद्यालयाजवळ दुपारच्या सुमारास गेले होते. तेथे दिपांशू पंडीत (१९, अजनी) हा विद्यार्थीदेखील उभा होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोघांमध्ये लहानशा गोष्टीवरून वाद झाला. दिपांशूचे मित्र जमू शकतात ही बाब लक्षात घेता हर्ष व अनिकेत तेथून दुचाकीने निघून सेमिनरी हिल्स परिसरात पोहोचले. तेथे ते बोलत असतानाच दिपांशू व त्याचे साथीदार पोहोचले. हर्ष काही बोलण्याच्या अगोदरच त्यांनी त्याच्यावर शस्त्राने वार करण्यास सुरुवात केली. यात तो गंभीर जखमी झाला. अनिकेतने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याच्यावरदेखील आरोपींना वार केले. दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहत आरोपी पळून गेले. परिसरातील लोकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी दोघांनाही रुग्णालयात दाखल केले. मात्र अतिरक्तस्त्रावामुळे हर्षचा मृत्यू झाला. अनिकेत गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारीदेखील गिट्टीखदान पोलीस ठाण्यात पोहोचले. चौकशी केली असता दिपांशू व त्याच्या मित्रांचा यात सहभाग असल्याची बाब समोर आली. पोलिसांनी आपल्या नेटवर्कच्या माध्यमातून पाच आरोपींना ताब्यात घेतले.

नेमक्या कारणाचा शोध सुरू

दरम्यान, या हत्येमागचे नेमके कारण काय आहे यासंदर्भात पोलिसांची चौकशी सुरू आहे. त्यांच्यात फार अगोदरपासून वाद होता का या दिशेनेदेखील तपास सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुलीशी निगडीत कारणावरून वाद झाला व त्यात हल्ला झाला. आरोपींकडून गैरसमजातून हल्ला केल्याचा दावा करण्यात येत आहे.

आरोपी अल्पवयीन की दिशाभूल ?

पोलिसांनी आरोपींमधील काही जण अल्पवयीन असल्याचे म्हटले आहे. दिपांशूनेदेखील त्याचे वय १७ वर्ष असल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र तो तिसऱ्या वर्षाचा विद्यार्थी असल्याने तो दिशाभूल करत असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. इतर आरोपी वेगवेगळ्या महाविद्यालयातील विद्यार्थी आहेत. त्यांच्या चौकशीतून हत्येचे नेमके कारण समोर येईल.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी