शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

ग्रामपंचायतीत भाजपला अपेक्षेपेक्षा जास्त यश, महायुतीच्या कामाला जनतेची पावती - बावनकुळे

By योगेश पांडे | Updated: November 6, 2023 14:06 IST

भाजपची सरकार आणि संघटन ही दोन्ही चाके योग्य पद्धतीने काम करत आहे - बावनकुळे

नागपूर : राज्यातील ग्रामपंचायत निवडणूकांमध्ये महायुतीला समर्थित पॅनल्स आघाडीवर असल्यामुळे तीनही पक्षांच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या यशाचे श्रेय तीनही पक्षांचे असून राज्य शासनाच्या कामाला जनतेने पावती दिल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

आम्हाला ग्रामपंचायतीमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाले आहे. यामुळे आमचा आत्मविश्वास वाढला आहे. लोकसभेत महायुती ४५ हून अधिक जागा जिंकेल तर विधानसभेत सव्वादोनशे जागा जिंकू. त्यातील एकही जागा कमी येणार नाही. राज्यात दोन तृतीयांशहून अधिक जागा आम्हाला मिळतील असा दावा बावनकुळे यांनी केला.

ग्रामपंचायत निवडणूकीत कॉंग्रेसला मोठा फटका बसला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या भंडारा जिल्ह्यातदेखील त्यांना फटका बसला आहे. महाविकासआघाडीकडे अगोदर अठराशे ग्रामपंचायती होत्या. त्या आता महायुतीकडे गेल्या आहेत. राज्यातील महायुतीच्या कामाला जनतेने दिलेली ही पावतीच आहे. महायुतीच्या कार्यकाळात थेट ग्रामपंचायतीपर्यंत पैसे पोहोचत आहेत व विकासकामे सुरू आहेत. आम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाले आहे. भाजपची सरकार आणि संघटन ही दोन्ही चाके योग्य पद्धतीने काम करत आहे. विरोधकांनी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र जनतेला त्यांचे सत्य लक्षात आले आहे. उद्यादेखील निवडणूक झाली तरी महायुतीचेच वर्चस्व असेल, असे बावनकुळे म्हणाले.

उद्धव ठाकरेंची बेईमानी जनतेसमोर उघड

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद मिळविण्यासाठी किती बेईमानी केली हे जनतेला कळाले आहे. त्याचेच चित्र निकालांमध्ये दिसले आहे. विधानसभा, लोकसभा निवडणूकींत जागा वाटपावरून भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीत कुठलीही अडचण येणार नाही. तीनही पक्षांचे नेते जे ठरवेल त्यांनाच जागा मिळेल. कुणीही उमेदवार असला तरी भाजप महायुतीतील इतर पक्षांना पूर्ण सहकार्य करू, असे प्रतिपादन बावनकुळे यांनी केले.

टॅग्स :PoliticsराजकारणChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेBJPभाजपाgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक