शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

नागपुरात वीजसंकटाविरोधात भाजप उतरली रस्त्यावर; राज्य सरकारला दाखवला 'कंदील'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2022 13:23 IST

या सौम्य आंदोलनाने सरकारने धोरण बदलले नाही तर प्रत्येक जिल्ह्यात हजारो नागरिक व शेतकरी यांना घेऊन मोर्चे काढण्यात येतील, असा इशारा भाजप नेत्यांनी दिला.

ठळक मुद्देअनामत रकमेचा निर्णय मागे घेतला नाही तर प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन

नागपूर : राज्यात सुरू असलेले वीजसंकट, अनामत रकमेचा अतिरिक्त बोजा यांच्याविरोधात भारतीय जनता पक्षाने रविवारी ‘कंदील’ आंदोलन केले. राज्य शासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे जनतेला हाती कंदील घ्यायची वेळ आली असून, वीजटंचाईचा देखावा निर्माण करून भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप यावेळी भाजप नेत्यांनी केला.

मागील सरकारच्या काळात राज्य लोडशेडिंगमुक्त होते. मात्र महाविकास आघाडी शासनात ऊर्जा मंत्रालयात भ्रष्टाचार शिगेला पोहोचला आहे. राज्य सरकारने वीजबिलात २५ टक्क्यांची भीषण दरवाढ केली. दुसरीकडे अतिरिक्त अनामत रकमेचा भुर्दंडदेखील ग्राहकांच्या माथी मारला आहे. सरकारचा निषेध म्हणून दोन ते तीन दिवसांत राज्यातील मंत्र्यांकडे कंदील पाठवून निषेध करण्यात येईल. या सौम्य आंदोलनाने सरकारने धोरण बदलले नाही तर प्रत्येक जिल्ह्यात हजारो नागरिक व शेतकरी यांना घेऊन मोर्चे काढण्यात येतील, असा इशारा भाजप नेत्यांनी दिला.

संविधान चौकात झालेल्या आंदोलनात भाजपचे प्रदेश सरचिटणीस आ. चंद्रशेखर बावनकुळे, शहराध्यक्ष आ. प्रवीण दटके, विदर्भ प्रांत संघटनमंत्री उपेंद्र कोठेकर, आ. कृष्णा खोपडे, आ. मोहन मते, माजी महापौर दयाशंकर तिवारी, माजी आमदार मिलिंद माने, संजय भेंडे, जयप्रकाश गुप्ता, भाजयुमो शहराध्यक्ष पारेंद्र पटले इत्यादी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

राज्याकडून कोळशाचे योग्य नियोजन नाही

जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्यांत कोळशाची साठवणूक करण्यास केंद्र सरकार वारंवार महानिर्मितीला सांगत होते. रेल्वे सेवा देण्यास तयार होती. परंतु निधीच नसल्याने महानिर्मितीने कोळशाची उचल केली नाही. राज्य भारनियमनमुक्त असावे यासाठी किमान २२ दिवसांचा कोळसा उपलब्ध ठेवणे गरजेचे आहे. परंतु राज्य सरकारच्या नाकर्त्या धोरणामुळे कोळशाची साठवणूक होऊ शकली नाही. राज्यात आज अडीच हजार मेगावॅटचे घोषित भारनियमन आहे आणि पंधराशे मेगावॅटचे अघोषित भारनियमन सुरू आहे. आपल्या नाकर्तेपणाचे खापर केंद्र शासनावर ढकलले आहे, असा आरोप बावनकुळे यांनी केला.

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाagitationआंदोलन