शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचा नारा, नको सेनेला थारा

By admin | Updated: July 5, 2016 02:51 IST

गेल्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढल्यानेच चौथ्या क्रमांकावर राहणारा भाजप ‘नंबर वन’ झाला. आता तर

 महापालिका स्वबळावर लढा : नेत्यांचे ‘एकला चलोरे’नागपूर : गेल्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढल्यानेच चौथ्या क्रमांकावर राहणारा भाजप ‘नंबर वन’ झाला. आता तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात गेल्या पावनेदोन वर्षाच्या कार्यकाळात उपराजधानीचा चौफेर विकास होत आहे. त्यामुळे भाजपची ताकद वाढली आहे. अशा राजकीय परिस्थितील आपला घास दुसऱ्याला कशासाठी द्यायचा, असा विचार भाजप नेत्यांनी मांडला आहे. यातूनच महापालिका निवडणुकीत शिवसेनेसोबत युती न करता ‘एकला चलोरे’ चा नारा भाजपच्या नागपूर महानगर कार्यसमितीच्या बैठकीत देण्यात आला.महापालिकेच्या निवडणुकीला सहा-सात महिन्यांचाच कालावधी शिल्लक असल्याने भाजपने निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून शहर कार्यसमितीची बैठक आयोजित करण्यात आली. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप नेत्यांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी युती तुटली तर भाजपला मोठा फटका बसेल असे अंदाज लावले जात होते. मात्र, अंदाज चुकले. भाजपचे सर्वाधिक आमदार निवडून आले. याच धर्तीवर महापालिका निवडणूक स्वबळावर लढल्यास एकहाती सत्ता येईल, असा सूर पदाधिकारी व आमदारांचा होता.भाजपचे सरकार सत्तारूढ झाल्यापासून सत्तेत सहभागी असूनही शिवसेना टीका करून सरकारची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करीत आहे. एवढेच नव्हेतर शिवसेना कार्यकर्त्यांची मजल भाजप नेत्यांचे पुतळे जाळण्यापर्यंत गेली आहे. याला जशास तसे उत्तर देण्याचा इशारा आमदार कृष्णा खोपडे यांनी दिला. आमदार सुधाकर देशमुख यांनी स्वबळावर निवडणुका लढवून महापालिकेत तिसऱ्यांदा कमळ फुलविण्याचा संकल्प जाहीर केला.गेल्या निवडणुकीतही महापालिकेत भाजपने शिवसेनेला बाजूला सारून अपक्ष व छोट्या पक्षाच्या नगरसेवकांना सोबत घेऊ न सत्ता आणली. आता राजकीय परिस्थिती बदलली आहे. केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे भाजप नेत्यांनी ‘मिशन १००’ हाती घेतले असून महापालिकेत १५१ पैकी १०० ते १२० जागा निवडून आणण्याची तयारी सुरू केली आहे. ३० आॅगस्टपर्यंत मतदार नोंदणीचा धडक कार्यक्रम राबविण्याचा निर्णय कार्यसमितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. नागपूर महापालिकेत भाजपची सत्ता असल्याने गल्ली ते दिल्ली भाजप सरकार हे स्वप्न साकार झालेले आहे. महापालिके ची आर्थिक स्थिती चांगली नसताना अनेक अडचणींचा सामना करून शहराला वेगळे स्वरूप देण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा संदेश सर्वसामान्यापर्यंत पोहचवण्यासाठी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आवाहन करण्यात आले. कृष्णा खोपडे यांनी पालकमंत्र्यांच्याच उपस्थितीत एसएनडीएल कंपनीवर हल्लाबोल केला. याला कार्यकर्त्यांनी चांगलीच दाद दिली. परंतु भाजपची चौफेर सत्ता असूनही खोपडे यांनी जनतेच्या मनातील भावना मांडल्याने सर्वकाही ठीकठाक नसल्याचा इशारा मिळाला.(प्रतिनिधी)शिवसेनेला ग्लुकोज कशासाठी ?नागपुरात तशीही शिवसेना शेवटच्या घटका मोजत आहे. अशात युती करून सेनेला ग्लुकोज कशासाठी द्यायचे, असा सवाल भाजप नेत्यांनी केला आहे. शिवसेना युती करताना जिंकणाऱ्या जागांवर अडून बसते. त्यामुळे भाजपच्या निष्ठावान व जिंकण्याची क्षमता असलेल्या कार्यकर्त्यांना वंचित रहावे लागते. या वेळी युती न करता तेवढया जागांवर भाजप कार्यकर्त्यांना प्राधान्य दिले जावे, अशी भाजप नेत्यांची भूमिका आहे. पद नसल्याने कार्यकर्ते नाराजसर्वच कार्यकर्त्यांना निवडणुक ीत संधी मिळणे शक्य नसते. त्यामुळे संधी न मिळालेल्या कार्यकर्त्यांची विविध समित्यावर नियुक्ती केली जाते. परंतु आमदारांनी सुचविलेल्या यादीतील नावे जाचक निकषामुळे वगळली जातात. कार्यकारी अधिकारी दंडाधिकारी यासारखे लहान पदही न मिळाल्याने नाराजी आहे. याचा फटका निवडणुकीत बसण्याचे संकेतही काही वक्त्यांनी दिल्याने वाटते तितकी ही निवडणूक सोपी नसल्याचे स्पष्ट झाले.