शहरं
Join us  
Trending Stories
1
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
2
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
3
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
4
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
5
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
6
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
7
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
8
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
9
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
10
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
11
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
12
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!
13
गोळी मारली, १५ फुटांवरुन रायफलसह उडी मारली अन्... चार्ली कर्कची हत्या करणाऱ्याचा VIDEO समोर
14
पैसे तयार ठेवा! ऑक्टोबरमध्ये येणार 'टाटा'चा बहुप्रतिक्षित आयपीओ; अधिक माहिती काय?
15
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
16
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
17
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
18
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
19
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
20
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?

भाजपचा नारा, नको सेनेला थारा

By admin | Updated: July 5, 2016 02:51 IST

गेल्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढल्यानेच चौथ्या क्रमांकावर राहणारा भाजप ‘नंबर वन’ झाला. आता तर

 महापालिका स्वबळावर लढा : नेत्यांचे ‘एकला चलोरे’नागपूर : गेल्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढल्यानेच चौथ्या क्रमांकावर राहणारा भाजप ‘नंबर वन’ झाला. आता तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात गेल्या पावनेदोन वर्षाच्या कार्यकाळात उपराजधानीचा चौफेर विकास होत आहे. त्यामुळे भाजपची ताकद वाढली आहे. अशा राजकीय परिस्थितील आपला घास दुसऱ्याला कशासाठी द्यायचा, असा विचार भाजप नेत्यांनी मांडला आहे. यातूनच महापालिका निवडणुकीत शिवसेनेसोबत युती न करता ‘एकला चलोरे’ चा नारा भाजपच्या नागपूर महानगर कार्यसमितीच्या बैठकीत देण्यात आला.महापालिकेच्या निवडणुकीला सहा-सात महिन्यांचाच कालावधी शिल्लक असल्याने भाजपने निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून शहर कार्यसमितीची बैठक आयोजित करण्यात आली. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप नेत्यांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी युती तुटली तर भाजपला मोठा फटका बसेल असे अंदाज लावले जात होते. मात्र, अंदाज चुकले. भाजपचे सर्वाधिक आमदार निवडून आले. याच धर्तीवर महापालिका निवडणूक स्वबळावर लढल्यास एकहाती सत्ता येईल, असा सूर पदाधिकारी व आमदारांचा होता.भाजपचे सरकार सत्तारूढ झाल्यापासून सत्तेत सहभागी असूनही शिवसेना टीका करून सरकारची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करीत आहे. एवढेच नव्हेतर शिवसेना कार्यकर्त्यांची मजल भाजप नेत्यांचे पुतळे जाळण्यापर्यंत गेली आहे. याला जशास तसे उत्तर देण्याचा इशारा आमदार कृष्णा खोपडे यांनी दिला. आमदार सुधाकर देशमुख यांनी स्वबळावर निवडणुका लढवून महापालिकेत तिसऱ्यांदा कमळ फुलविण्याचा संकल्प जाहीर केला.गेल्या निवडणुकीतही महापालिकेत भाजपने शिवसेनेला बाजूला सारून अपक्ष व छोट्या पक्षाच्या नगरसेवकांना सोबत घेऊ न सत्ता आणली. आता राजकीय परिस्थिती बदलली आहे. केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे भाजप नेत्यांनी ‘मिशन १००’ हाती घेतले असून महापालिकेत १५१ पैकी १०० ते १२० जागा निवडून आणण्याची तयारी सुरू केली आहे. ३० आॅगस्टपर्यंत मतदार नोंदणीचा धडक कार्यक्रम राबविण्याचा निर्णय कार्यसमितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. नागपूर महापालिकेत भाजपची सत्ता असल्याने गल्ली ते दिल्ली भाजप सरकार हे स्वप्न साकार झालेले आहे. महापालिके ची आर्थिक स्थिती चांगली नसताना अनेक अडचणींचा सामना करून शहराला वेगळे स्वरूप देण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा संदेश सर्वसामान्यापर्यंत पोहचवण्यासाठी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आवाहन करण्यात आले. कृष्णा खोपडे यांनी पालकमंत्र्यांच्याच उपस्थितीत एसएनडीएल कंपनीवर हल्लाबोल केला. याला कार्यकर्त्यांनी चांगलीच दाद दिली. परंतु भाजपची चौफेर सत्ता असूनही खोपडे यांनी जनतेच्या मनातील भावना मांडल्याने सर्वकाही ठीकठाक नसल्याचा इशारा मिळाला.(प्रतिनिधी)शिवसेनेला ग्लुकोज कशासाठी ?नागपुरात तशीही शिवसेना शेवटच्या घटका मोजत आहे. अशात युती करून सेनेला ग्लुकोज कशासाठी द्यायचे, असा सवाल भाजप नेत्यांनी केला आहे. शिवसेना युती करताना जिंकणाऱ्या जागांवर अडून बसते. त्यामुळे भाजपच्या निष्ठावान व जिंकण्याची क्षमता असलेल्या कार्यकर्त्यांना वंचित रहावे लागते. या वेळी युती न करता तेवढया जागांवर भाजप कार्यकर्त्यांना प्राधान्य दिले जावे, अशी भाजप नेत्यांची भूमिका आहे. पद नसल्याने कार्यकर्ते नाराजसर्वच कार्यकर्त्यांना निवडणुक ीत संधी मिळणे शक्य नसते. त्यामुळे संधी न मिळालेल्या कार्यकर्त्यांची विविध समित्यावर नियुक्ती केली जाते. परंतु आमदारांनी सुचविलेल्या यादीतील नावे जाचक निकषामुळे वगळली जातात. कार्यकारी अधिकारी दंडाधिकारी यासारखे लहान पदही न मिळाल्याने नाराजी आहे. याचा फटका निवडणुकीत बसण्याचे संकेतही काही वक्त्यांनी दिल्याने वाटते तितकी ही निवडणूक सोपी नसल्याचे स्पष्ट झाले.