शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचा नारा, नको सेनेला थारा

By admin | Updated: July 5, 2016 02:51 IST

गेल्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढल्यानेच चौथ्या क्रमांकावर राहणारा भाजप ‘नंबर वन’ झाला. आता तर

 महापालिका स्वबळावर लढा : नेत्यांचे ‘एकला चलोरे’नागपूर : गेल्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढल्यानेच चौथ्या क्रमांकावर राहणारा भाजप ‘नंबर वन’ झाला. आता तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात गेल्या पावनेदोन वर्षाच्या कार्यकाळात उपराजधानीचा चौफेर विकास होत आहे. त्यामुळे भाजपची ताकद वाढली आहे. अशा राजकीय परिस्थितील आपला घास दुसऱ्याला कशासाठी द्यायचा, असा विचार भाजप नेत्यांनी मांडला आहे. यातूनच महापालिका निवडणुकीत शिवसेनेसोबत युती न करता ‘एकला चलोरे’ चा नारा भाजपच्या नागपूर महानगर कार्यसमितीच्या बैठकीत देण्यात आला.महापालिकेच्या निवडणुकीला सहा-सात महिन्यांचाच कालावधी शिल्लक असल्याने भाजपने निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून शहर कार्यसमितीची बैठक आयोजित करण्यात आली. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप नेत्यांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी युती तुटली तर भाजपला मोठा फटका बसेल असे अंदाज लावले जात होते. मात्र, अंदाज चुकले. भाजपचे सर्वाधिक आमदार निवडून आले. याच धर्तीवर महापालिका निवडणूक स्वबळावर लढल्यास एकहाती सत्ता येईल, असा सूर पदाधिकारी व आमदारांचा होता.भाजपचे सरकार सत्तारूढ झाल्यापासून सत्तेत सहभागी असूनही शिवसेना टीका करून सरकारची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करीत आहे. एवढेच नव्हेतर शिवसेना कार्यकर्त्यांची मजल भाजप नेत्यांचे पुतळे जाळण्यापर्यंत गेली आहे. याला जशास तसे उत्तर देण्याचा इशारा आमदार कृष्णा खोपडे यांनी दिला. आमदार सुधाकर देशमुख यांनी स्वबळावर निवडणुका लढवून महापालिकेत तिसऱ्यांदा कमळ फुलविण्याचा संकल्प जाहीर केला.गेल्या निवडणुकीतही महापालिकेत भाजपने शिवसेनेला बाजूला सारून अपक्ष व छोट्या पक्षाच्या नगरसेवकांना सोबत घेऊ न सत्ता आणली. आता राजकीय परिस्थिती बदलली आहे. केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे भाजप नेत्यांनी ‘मिशन १००’ हाती घेतले असून महापालिकेत १५१ पैकी १०० ते १२० जागा निवडून आणण्याची तयारी सुरू केली आहे. ३० आॅगस्टपर्यंत मतदार नोंदणीचा धडक कार्यक्रम राबविण्याचा निर्णय कार्यसमितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. नागपूर महापालिकेत भाजपची सत्ता असल्याने गल्ली ते दिल्ली भाजप सरकार हे स्वप्न साकार झालेले आहे. महापालिके ची आर्थिक स्थिती चांगली नसताना अनेक अडचणींचा सामना करून शहराला वेगळे स्वरूप देण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा संदेश सर्वसामान्यापर्यंत पोहचवण्यासाठी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आवाहन करण्यात आले. कृष्णा खोपडे यांनी पालकमंत्र्यांच्याच उपस्थितीत एसएनडीएल कंपनीवर हल्लाबोल केला. याला कार्यकर्त्यांनी चांगलीच दाद दिली. परंतु भाजपची चौफेर सत्ता असूनही खोपडे यांनी जनतेच्या मनातील भावना मांडल्याने सर्वकाही ठीकठाक नसल्याचा इशारा मिळाला.(प्रतिनिधी)शिवसेनेला ग्लुकोज कशासाठी ?नागपुरात तशीही शिवसेना शेवटच्या घटका मोजत आहे. अशात युती करून सेनेला ग्लुकोज कशासाठी द्यायचे, असा सवाल भाजप नेत्यांनी केला आहे. शिवसेना युती करताना जिंकणाऱ्या जागांवर अडून बसते. त्यामुळे भाजपच्या निष्ठावान व जिंकण्याची क्षमता असलेल्या कार्यकर्त्यांना वंचित रहावे लागते. या वेळी युती न करता तेवढया जागांवर भाजप कार्यकर्त्यांना प्राधान्य दिले जावे, अशी भाजप नेत्यांची भूमिका आहे. पद नसल्याने कार्यकर्ते नाराजसर्वच कार्यकर्त्यांना निवडणुक ीत संधी मिळणे शक्य नसते. त्यामुळे संधी न मिळालेल्या कार्यकर्त्यांची विविध समित्यावर नियुक्ती केली जाते. परंतु आमदारांनी सुचविलेल्या यादीतील नावे जाचक निकषामुळे वगळली जातात. कार्यकारी अधिकारी दंडाधिकारी यासारखे लहान पदही न मिळाल्याने नाराजी आहे. याचा फटका निवडणुकीत बसण्याचे संकेतही काही वक्त्यांनी दिल्याने वाटते तितकी ही निवडणूक सोपी नसल्याचे स्पष्ट झाले.